शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

इवल्या दोन ज्योतींच्या डोळ्यांपुढं आता अंधार!

By admin | Updated: August 4, 2015 23:19 IST

विवाहितेची आत्महत्या : आई गेली; उर्वरित कुटुंब पोलिसांच्या ताब्यात

सातारा : वंशाला दिवा हवा. ज्योती मात्र नकोत, ही मानसिकता समाजात आजही कायम आहे. नेमका हाच आरोप वैशाली सुतारच्या माहेरच्यांनी सासरच्या लोकांवर केलाय. दोन मुलीच झाल्या म्हणून तिचा छळ होत असल्याचं तक्रारीत म्हटलंय. वैशालीनं विहीर जवळ केली. घरातल्या बाकीच्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दोन इवल्या ज्योतींच्या डोळ्यापुढं मात्र अंधार झाला.श्रावणी तीन वर्षांची आहे. कार्तिकी तर अवघ्या आठ महिन्यांची. आत्महत्या करणाऱ्या वैशाली सुतारच्या या दोन मुली. वैशालीच्या आई कुसूम वसंत संकपाळ (रा. रेंगडी, ता. जावळी) यांनी फिर्यादीत म्हटलंय की, माहेरून पैसे आणि धान्य आणण्याची मागणी २०१२ पासून वैशालीच्या घरातले वेळोवेळी करीत असत. शिवाय पदरी दुसरी मुलगीच. त्यामुळं जाचहाट वाढला आणि अखेर वैशालीनं आत्महत्येचा मार्ग निवडला.गडकर आळीतील जवाहर कॉलनीत राहणाऱ्या सुतार कुटुंबातल्या सात जणांविरुद्ध ही फिर्याद आहे. वैशालीचा पती मंगेश, सासरा अशोक, सासू मंगल, रूपेश आणि योगेश हे दोन दीर आणि कविता-अमृता या जावांना पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतलं. संतप्त रेंगडी ग्रामस्थ दिवसभर पोलीस ठाण्यात आणि जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून होते. आख्खं गावच साताऱ्यात आलं होतं. वैशालीच्या पार्थिवावर तिच्या सासरच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करणार, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला होता. पोलीस तणावाखाली होते. शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर आणि नंतर जिल्हा रुग्णालयातही अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर ग्रामस्थांना सामोरे गेले. ‘कायदा हातात घेऊ नका. सहकार्य करा. दोषींवर कायद्यानुसार जास्तीत जास्त कडक कारवाई होईल,’ असा विश्वास त्यांनी दिला. आधी ग्रामस्थांनी घातपाताचाच संशय व्यक्त केला होता. रुग्णालयात वैशालीचा मृतदेह पाहिल्यावर आक्रोश आणि संताप वाढला. गडकर आळीतील काही व्यक्तींनीही ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. अखेर ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि तणाव निवळला. एक प्रश्न मात्र कायम राहिला... चिमुकल्या श्रावणी आणि कार्तिकीचं काय?मृत वैशालीबद्दल गावकरी मोठ्या आदरानं बोलत होते. संपूर्ण रेंगडी गावात अत्यंत गुणी मुलगी असा तिचा लौकिक होता. वैशालीला दोन भाऊ आणि एक बहीण. वैशाली सर्वांत थोरली. पाठच्या बहिणीचं लग्न झालंय आणि तीही गडकर आळीतच वास्तव्याला आहे. दोन भाऊ लहान आहेत. (प्रतिनिधी)रविवारीही आले होते गावकरीरेंगडी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या सासरच्या मंडळींनी रविवारी सकाळी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्याच रात्री ‘आमचीही तक्रार घ्या,’ असे म्हणत रेंगडी ग्रामस्थ पोलीस ठाण्यात आले. परंतु तांत्रिकदृष्ट्या एक फिर्याद दाखल असताना दुसरी घेता येणार नाही, असं सांगून पोलिसांनी त्यांना जबाब द्यायला सांगितलं. ‘पहाटेपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यासमोर पावसात होतो,’ असं गावकऱ्यांनी सांगितलं.