शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

व्यापाऱ्यांचं हित जोपासणाऱ्या केंद्राचा कारभार धोकादायक

By admin | Updated: November 19, 2015 00:42 IST

पृथ्वीराज चव्हाण : आचरेवाडीत विविध विकासकामांचे उद्घाटन

ढेबेवाडी : ‘शेतकऱ्यांच्या दु:खापेक्षा व्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्या केंद्रशासनाची चातुर्यवर्णाकडे वाटचाल चालू आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून देशाला पेशवाईकडे घेऊन चाललेल्या शासनाचा कारभार धोकादायक असल्याची भीती,’ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी देशात लोकाभिमूख सहकारची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आचरेवाडी-काळगाव, ता. पाटण येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे प्रांतीक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राहुल चव्हाण, मधुकर पाटील, अभिजित पाटील उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘दुष्काळावर मात करण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवाराची संकल्पना आणली. राज्यातील वाड्या-वस्त्यांना टँकर दिले. दहा लाख जनावरांना छावण्यांद्वारे जीवदान दिले. स्मार्ट शहराची घोषणा करणाऱ्या शासनाने जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली असून, काळ्या पैशाचे आश्वासन कोठे गेले? असा सवालही त्यांनी केला.’ वंदना आचरे यांनी प्रास्ताविक केले. संजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) सिंचन घोटाळ्यावर केले भाष्य... चार वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा प्रवास सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘आघाडी शासन चालविताना कसरत करावी लागते. जनतेचे हित आणि पारदर्शकता आणताना काही मंडळी दुखावली तरीसुध्दा ‘सिंचन’ आणि ‘राज्य शिखर बँकेचे संचालक मंडळ’ बरखास्त करण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरले. या दोन्ही प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.’