शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

व्यापाऱ्यांचं हित जोपासणाऱ्या केंद्राचा कारभार धोकादायक

By admin | Updated: November 19, 2015 00:42 IST

पृथ्वीराज चव्हाण : आचरेवाडीत विविध विकासकामांचे उद्घाटन

ढेबेवाडी : ‘शेतकऱ्यांच्या दु:खापेक्षा व्यापाऱ्यांचे हित जोपासणाऱ्या केंद्रशासनाची चातुर्यवर्णाकडे वाटचाल चालू आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून देशाला पेशवाईकडे घेऊन चाललेल्या शासनाचा कारभार धोकादायक असल्याची भीती,’ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी देशात लोकाभिमूख सहकारची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आचरेवाडी-काळगाव, ता. पाटण येथे विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. आमदार आनंदराव पाटील, काँग्रेसचे प्रांतीक प्रतिनिधी हिंदूराव पाटील, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, राहुल चव्हाण, मधुकर पाटील, अभिजित पाटील उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘दुष्काळावर मात करण्यासाठी आम्ही जलयुक्त शिवाराची संकल्पना आणली. राज्यातील वाड्या-वस्त्यांना टँकर दिले. दहा लाख जनावरांना छावण्यांद्वारे जीवदान दिले. स्मार्ट शहराची घोषणा करणाऱ्या शासनाने जनतेच्या डोळ्यात धुळफेक केली असून, काळ्या पैशाचे आश्वासन कोठे गेले? असा सवालही त्यांनी केला.’ वंदना आचरे यांनी प्रास्ताविक केले. संजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर) सिंचन घोटाळ्यावर केले भाष्य... चार वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा प्रवास सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘आघाडी शासन चालविताना कसरत करावी लागते. जनतेचे हित आणि पारदर्शकता आणताना काही मंडळी दुखावली तरीसुध्दा ‘सिंचन’ आणि ‘राज्य शिखर बँकेचे संचालक मंडळ’ बरखास्त करण्याचा निर्णय ऐतिहासिक ठरले. या दोन्ही प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.’