शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शामगावच्या घाटात जीवाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:27 IST

शामगाव : येथील घाट अनेक समस्यांचा गर्तेत सापडला आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा ...

शामगाव : येथील घाट अनेक समस्यांचा गर्तेत सापडला आहे. घाटातील संरक्षक कठड्यांची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शामगाव घाट एकेकाळी लूट, मारामारीसाठी बहुचर्चित होता. कालांतराने हे प्रमाण कमी झाले. मात्र, कठड्यांची पडझड झाल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे. काही सामाजिक संघटनांनी त्यावर आवाज उठवला होता. त्यानंतर कठड्यांची दुरुस्ती करण्यात आली. मात्र, मध्यंतरी वारंवार वाहनांच्या धडकेत कठड्यांची पुन्हा मोडतोड झाली आहे.

येळगाव विभागात मोबाईलधारक त्रस्त

कऱ्हाड : येळगाव (ता. कऱ्हाड) परिसरात सध्या वारंवार मोबाईल नेटवर्क खंडित होत असल्याने परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. येवतीसह संपूर्ण विभाग अनेकदा आऊट ऑफ कव्हरेज होत असल्याने येथील इंटरनेटद्वारे केली जाणारी अनेक कामे खोळंबत आहेत. कऱ्हाड दक्षिण विभागातील डोंगरी विभाग म्हणून येवतीसह येळगाव परिसराची ओळख आहे. या परिसरातील ग्राहकांना सध्या मोबाईल असूनही वारंवार इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंटरनेटअभावी बँकेतील पैसे ऑनलाईन पद्धतीने पाठविण्याची कामे करता येणे मुश्किल बनत आहे.

ग्रामीण विभागात एस.टी. सुरू करण्याची मागणी

रामापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाच्यावतीने ग्रामीण भागातील एस.टी. फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. सध्या कोरोनाची स्थिती आटोक्यात असल्यामुळे काही मार्गांवर एस.टी. पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. मात्र, ती पूर्ण क्षमतेने सुरू नाही. ग्रामीण भागात एस.टी. पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवाशांतून होत आहे. पाटण ते कोयना, पाटण ते कुसरुंड, पाटण ते चाफोली, पाटण ते मणदुरे, पाटण ते सणबूर, पाटण ते ढेबेवाडी आदी मार्गावर एस.टी.च्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

डोंगरपायथ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान

रामापूर : पाटण तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असलेल्या शेतीचे वन्यप्राण्यांकडून नुकसान केले जात आहे. रानडुक्कर, वानर, मोर, सायाळ आदी वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस केली जात आहे. अंतर्गत मशागतीसह काही ठिकाणी पेरणीचे काम सुरू आहे. मात्र, शेतात पेरणी केल्यानंतर मोर आणि रानडुकरांकडून नुकसान केले जात आहे. अगोदरच शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. ओढ दिलेल्या पावसाने नुकतीच दमदार सुरूवात केली आहे. अशातच आता वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत असल्यामुळे शेतकरी धायकुतीला आले आहेत.