शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या निसर्गचक्रामुळे मानवी जीवसृष्टीला पोहोचतोय धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

कुडाळ : वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जगामध्ये तापमानवृद्धी आणि त्याच्याशी निगडित हवामान यामध्ये बदल घडत आहे. याला मानवी चुकांची साथ ...

कुडाळ : वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जगामध्ये तापमानवृद्धी आणि त्याच्याशी निगडित हवामान यामध्ये बदल घडत आहे. याला मानवी चुकांची साथ असल्याने आज आपल्याला निसर्ग बदललेला आहे. यामुळे होणाऱ्या नैसर्गिक बदलांना सध्या सामोरे जावे लागत आहे.

पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून, वादळ, ढगफुटी, अवेळी पडणारा पाऊस, आदींसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली मानव निसर्गालाच आव्हान देत आहे. मानवाच्या या अविवेकी विचारबुद्धीमुळे निसर्गाचा समतोल ढासळताना पाहायला मिळत आहे. भरभरून देणाऱ्या या निसर्गाची आपल्या अविचाराने हानी करून आपले अस्तित्व संपवायला कारणीभूत होत आहोत.

या धरतीवर जोपर्यंत निसर्गसंपदा आहे, तोपर्यंतच सजीवसृष्टी अबाधित राहू शकते. आपल्या पूर्वजांनाही पर्यावरणाचं महत्त्व आणि रक्षण यांची जाणीव होती. आता मात्र केवळ आपल्या ऐहिक सुखासाठी आपण चालविलेला निसर्गाचा संहार सजीवसृष्टीला विनाशाकडे घेऊन चालला आहे. अमर्याद वृक्षतोड, वाढते सिमेंटचे जंगल, मोठ्या प्रमाणावर होणारी रासायनिक शेती, याचीच साक्ष देत आहे. एकीकडे तापमानात होणारी प्रचंड वाढ, अतिवृष्टी यामुळे शहरी आणि ग्रामीण जीवनाबरोबरच संपूर्ण जीवसृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे. निसर्गतः निर्मित घटकांचा मानवाने आपली जीवनशैली बदलण्याच्या प्रयत्नात विनाशाकडे पाऊल टाकत आहोत. याचाच परिणाम आपण गेली कित्येक वर्षांपासून अनुभवत आहोत. वर्षभर कधीही पावसाळा तर मध्येच थंडीची लाट, कडक उष्णता अनुभवायला मिळत आहे. यामुळे निसर्गचक्र पुरते बदलले असून, सजीवसृष्टीवर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर होणे आवश्यक आहे, तरच या भूतलावर जीवसृष्टीचे अस्तित्व अबाधित राहील. अन्यथा अतिरेकामुळे सारं काही संपुष्टात येऊन मानवजातीचा संहार घडून येईल.