शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

बदलत्या निसर्गचक्रामुळे मानवी जीवसृष्टीला पोहोचतोय धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

कुडाळ : वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जगामध्ये तापमानवृद्धी आणि त्याच्याशी निगडित हवामान यामध्ये बदल घडत आहे. याला मानवी चुकांची साथ ...

कुडाळ : वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जगामध्ये तापमानवृद्धी आणि त्याच्याशी निगडित हवामान यामध्ये बदल घडत आहे. याला मानवी चुकांची साथ असल्याने आज आपल्याला निसर्ग बदललेला आहे. यामुळे होणाऱ्या नैसर्गिक बदलांना सध्या सामोरे जावे लागत आहे.

पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून, वादळ, ढगफुटी, अवेळी पडणारा पाऊस, आदींसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली मानव निसर्गालाच आव्हान देत आहे. मानवाच्या या अविवेकी विचारबुद्धीमुळे निसर्गाचा समतोल ढासळताना पाहायला मिळत आहे. भरभरून देणाऱ्या या निसर्गाची आपल्या अविचाराने हानी करून आपले अस्तित्व संपवायला कारणीभूत होत आहोत.

या धरतीवर जोपर्यंत निसर्गसंपदा आहे, तोपर्यंतच सजीवसृष्टी अबाधित राहू शकते. आपल्या पूर्वजांनाही पर्यावरणाचं महत्त्व आणि रक्षण यांची जाणीव होती. आता मात्र केवळ आपल्या ऐहिक सुखासाठी आपण चालविलेला निसर्गाचा संहार सजीवसृष्टीला विनाशाकडे घेऊन चालला आहे. अमर्याद वृक्षतोड, वाढते सिमेंटचे जंगल, मोठ्या प्रमाणावर होणारी रासायनिक शेती, याचीच साक्ष देत आहे. एकीकडे तापमानात होणारी प्रचंड वाढ, अतिवृष्टी यामुळे शहरी आणि ग्रामीण जीवनाबरोबरच संपूर्ण जीवसृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे. निसर्गतः निर्मित घटकांचा मानवाने आपली जीवनशैली बदलण्याच्या प्रयत्नात विनाशाकडे पाऊल टाकत आहोत. याचाच परिणाम आपण गेली कित्येक वर्षांपासून अनुभवत आहोत. वर्षभर कधीही पावसाळा तर मध्येच थंडीची लाट, कडक उष्णता अनुभवायला मिळत आहे. यामुळे निसर्गचक्र पुरते बदलले असून, सजीवसृष्टीवर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर होणे आवश्यक आहे, तरच या भूतलावर जीवसृष्टीचे अस्तित्व अबाधित राहील. अन्यथा अतिरेकामुळे सारं काही संपुष्टात येऊन मानवजातीचा संहार घडून येईल.