शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
2
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
3
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
4
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
5
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
6
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
7
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
8
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
9
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
10
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
11
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
12
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...
13
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
14
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
15
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
16
'माझ्या बायकोला तू पळवून लावलंस!'; रागाच्या भरात भावाने बहिणीची केली निर्घृण हत्या
17
"लग्न नाही, फॅमिली नाही विचार करा...", फुकटचा सल्ला देणाऱ्या चाहत्याला जुईचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "अशा माणसांची..."
18
नवरात्रीतील विनायक चतुर्थी २०२५: 'या' ८ राशींसाठी जुळून आले ३ महाशुभ योग; मिळेल विशेष धनलाभ!
19
मुलाला तुरुंगवास, धक्का बसलेल्या वडिलांनी संपवलं जीवन, अंत्यसंस्कारावेळी घडलं असं काही, ७ पोलीस निलंबित
20
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत

बदलत्या निसर्गचक्रामुळे मानवी जीवसृष्टीला पोहोचतोय धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

कुडाळ : वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जगामध्ये तापमानवृद्धी आणि त्याच्याशी निगडित हवामान यामध्ये बदल घडत आहे. याला मानवी चुकांची साथ ...

कुडाळ : वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जगामध्ये तापमानवृद्धी आणि त्याच्याशी निगडित हवामान यामध्ये बदल घडत आहे. याला मानवी चुकांची साथ असल्याने आज आपल्याला निसर्ग बदललेला आहे. यामुळे होणाऱ्या नैसर्गिक बदलांना सध्या सामोरे जावे लागत आहे.

पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून, वादळ, ढगफुटी, अवेळी पडणारा पाऊस, आदींसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली मानव निसर्गालाच आव्हान देत आहे. मानवाच्या या अविवेकी विचारबुद्धीमुळे निसर्गाचा समतोल ढासळताना पाहायला मिळत आहे. भरभरून देणाऱ्या या निसर्गाची आपल्या अविचाराने हानी करून आपले अस्तित्व संपवायला कारणीभूत होत आहोत.

या धरतीवर जोपर्यंत निसर्गसंपदा आहे, तोपर्यंतच सजीवसृष्टी अबाधित राहू शकते. आपल्या पूर्वजांनाही पर्यावरणाचं महत्त्व आणि रक्षण यांची जाणीव होती. आता मात्र केवळ आपल्या ऐहिक सुखासाठी आपण चालविलेला निसर्गाचा संहार सजीवसृष्टीला विनाशाकडे घेऊन चालला आहे. अमर्याद वृक्षतोड, वाढते सिमेंटचे जंगल, मोठ्या प्रमाणावर होणारी रासायनिक शेती, याचीच साक्ष देत आहे. एकीकडे तापमानात होणारी प्रचंड वाढ, अतिवृष्टी यामुळे शहरी आणि ग्रामीण जीवनाबरोबरच संपूर्ण जीवसृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे. निसर्गतः निर्मित घटकांचा मानवाने आपली जीवनशैली बदलण्याच्या प्रयत्नात विनाशाकडे पाऊल टाकत आहोत. याचाच परिणाम आपण गेली कित्येक वर्षांपासून अनुभवत आहोत. वर्षभर कधीही पावसाळा तर मध्येच थंडीची लाट, कडक उष्णता अनुभवायला मिळत आहे. यामुळे निसर्गचक्र पुरते बदलले असून, सजीवसृष्टीवर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर होणे आवश्यक आहे, तरच या भूतलावर जीवसृष्टीचे अस्तित्व अबाधित राहील. अन्यथा अतिरेकामुळे सारं काही संपुष्टात येऊन मानवजातीचा संहार घडून येईल.