शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

बदलत्या निसर्गचक्रामुळे मानवी जीवसृष्टीला पोहोचतोय धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

कुडाळ : वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जगामध्ये तापमानवृद्धी आणि त्याच्याशी निगडित हवामान यामध्ये बदल घडत आहे. याला मानवी चुकांची साथ ...

कुडाळ : वाढत्या प्रदूषणामुळे संपूर्ण जगामध्ये तापमानवृद्धी आणि त्याच्याशी निगडित हवामान यामध्ये बदल घडत आहे. याला मानवी चुकांची साथ असल्याने आज आपल्याला निसर्ग बदललेला आहे. यामुळे होणाऱ्या नैसर्गिक बदलांना सध्या सामोरे जावे लागत आहे.

पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला असून, वादळ, ढगफुटी, अवेळी पडणारा पाऊस, आदींसारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे. विकासाच्या नावाखाली मानव निसर्गालाच आव्हान देत आहे. मानवाच्या या अविवेकी विचारबुद्धीमुळे निसर्गाचा समतोल ढासळताना पाहायला मिळत आहे. भरभरून देणाऱ्या या निसर्गाची आपल्या अविचाराने हानी करून आपले अस्तित्व संपवायला कारणीभूत होत आहोत.

या धरतीवर जोपर्यंत निसर्गसंपदा आहे, तोपर्यंतच सजीवसृष्टी अबाधित राहू शकते. आपल्या पूर्वजांनाही पर्यावरणाचं महत्त्व आणि रक्षण यांची जाणीव होती. आता मात्र केवळ आपल्या ऐहिक सुखासाठी आपण चालविलेला निसर्गाचा संहार सजीवसृष्टीला विनाशाकडे घेऊन चालला आहे. अमर्याद वृक्षतोड, वाढते सिमेंटचे जंगल, मोठ्या प्रमाणावर होणारी रासायनिक शेती, याचीच साक्ष देत आहे. एकीकडे तापमानात होणारी प्रचंड वाढ, अतिवृष्टी यामुळे शहरी आणि ग्रामीण जीवनाबरोबरच संपूर्ण जीवसृष्टीलाच धोका निर्माण झाला आहे. निसर्गतः निर्मित घटकांचा मानवाने आपली जीवनशैली बदलण्याच्या प्रयत्नात विनाशाकडे पाऊल टाकत आहोत. याचाच परिणाम आपण गेली कित्येक वर्षांपासून अनुभवत आहोत. वर्षभर कधीही पावसाळा तर मध्येच थंडीची लाट, कडक उष्णता अनुभवायला मिळत आहे. यामुळे निसर्गचक्र पुरते बदलले असून, सजीवसृष्टीवर याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धनाची मोहीम प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर होणे आवश्यक आहे, तरच या भूतलावर जीवसृष्टीचे अस्तित्व अबाधित राहील. अन्यथा अतिरेकामुळे सारं काही संपुष्टात येऊन मानवजातीचा संहार घडून येईल.