शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

पावसामुळे कडधान्यासह सोयाबीन-भुईमुगाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेले चार दिवस वरचे वर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पडत असलेल्या पावसामुळे ...

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेले चार दिवस वरचे वर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणीच पाणी साचल्यामुळे सोयाबीन व भुईमुगाचे पीक धोक्यात आले आहे. कडधान्याच्या पिकांचे वाटोळे झाले, तर हायब्रीड काळे पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच भात पिकासह भाजीपाला पिकांच्या शेतातही पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

यावर्षी खरीप हंगामात काही महिने सलग पडलेल्या हंगामी पावसामुळे सर्वत्र पिके चांगली आली आहेत. काही ठिकाणी पूर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. काही दिवसांची उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेले चार दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे ओढे-नाले पुन्हा दुथडी भरून वाहत असल्यामुळे ठिकठिकाणी उपमार्ग जलमय बनले आहेत, तर बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकामध्ये पाणीच पाणी साचल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. रानात काही ठिकाणी काढणीयोग्य, तर काही ठिकाणी काढलेल्या कडधान्याची पिके भिजून शेतातच कुजल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह भुईमूग पिकाच्या पूर्ण तयार झालेल्या शेगांना काही ठिकाणी कोंब आले आहेत. तसेच हायब्रीड ज्वारीचे पीक ऐन हुरड्यात आहे, पण सतत पडत असलेल्या पावसामुळे हे पीक काळे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

चौकट..

भाज्यांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

पालक, मेथी, कोथिंबिर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारली ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. या पिकांतही पाणी साचून नुकसान झाले आहे. तसेच भेंडी, गवारी यांसारख्या शेंगवर्गीय भाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चार दिवसांतील वरचे वर पडत असलेल्या पावसामुळे रानात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

फोटो कॅप्शन

१६मलकापूर

मलकापूर परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी पहिल्या पेरणीतील सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान होत आहे. (छाया : माणिक डोंगरे)

160921\img-20210914-wa0027.jpg

फोटो कॕप्शन

गैली चार दिवस सततधार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पहिल्या पेरणीतील सोयाबीन च्या शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान होत आहे.(छाय माणिक डोंगरे)