शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे कडधान्यासह सोयाबीन-भुईमुगाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेले चार दिवस वरचे वर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पडत असलेल्या पावसामुळे ...

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेले चार दिवस वरचे वर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणीच पाणी साचल्यामुळे सोयाबीन व भुईमुगाचे पीक धोक्यात आले आहे. कडधान्याच्या पिकांचे वाटोळे झाले, तर हायब्रीड काळे पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच भात पिकासह भाजीपाला पिकांच्या शेतातही पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

यावर्षी खरीप हंगामात काही महिने सलग पडलेल्या हंगामी पावसामुळे सर्वत्र पिके चांगली आली आहेत. काही ठिकाणी पूर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. काही दिवसांची उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेले चार दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे ओढे-नाले पुन्हा दुथडी भरून वाहत असल्यामुळे ठिकठिकाणी उपमार्ग जलमय बनले आहेत, तर बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकामध्ये पाणीच पाणी साचल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. रानात काही ठिकाणी काढणीयोग्य, तर काही ठिकाणी काढलेल्या कडधान्याची पिके भिजून शेतातच कुजल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह भुईमूग पिकाच्या पूर्ण तयार झालेल्या शेगांना काही ठिकाणी कोंब आले आहेत. तसेच हायब्रीड ज्वारीचे पीक ऐन हुरड्यात आहे, पण सतत पडत असलेल्या पावसामुळे हे पीक काळे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

चौकट..

भाज्यांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

पालक, मेथी, कोथिंबिर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारली ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. या पिकांतही पाणी साचून नुकसान झाले आहे. तसेच भेंडी, गवारी यांसारख्या शेंगवर्गीय भाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चार दिवसांतील वरचे वर पडत असलेल्या पावसामुळे रानात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

फोटो कॅप्शन

१६मलकापूर

मलकापूर परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी पहिल्या पेरणीतील सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान होत आहे. (छाया : माणिक डोंगरे)

160921\img-20210914-wa0027.jpg

फोटो कॕप्शन

गैली चार दिवस सततधार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पहिल्या पेरणीतील सोयाबीन च्या शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान होत आहे.(छाय माणिक डोंगरे)