शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

पावसामुळे कडधान्यासह सोयाबीन-भुईमुगाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेले चार दिवस वरचे वर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पडत असलेल्या पावसामुळे ...

मलकापूर : मलकापूरसह परिसरात गेले चार दिवस वरचे वर जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पडत असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणीच पाणी साचल्यामुळे सोयाबीन व भुईमुगाचे पीक धोक्यात आले आहे. कडधान्याच्या पिकांचे वाटोळे झाले, तर हायब्रीड काळे पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच भात पिकासह भाजीपाला पिकांच्या शेतातही पाणी साचल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

यावर्षी खरीप हंगामात काही महिने सलग पडलेल्या हंगामी पावसामुळे सर्वत्र पिके चांगली आली आहेत. काही ठिकाणी पूर आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. काही दिवसांची उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेले चार दिवस पडत असलेल्या जोरदार पावसामुळे ओढे-नाले पुन्हा दुथडी भरून वाहत असल्यामुळे ठिकठिकाणी उपमार्ग जलमय बनले आहेत, तर बहुतांशी शेतकऱ्यांच्या शेतातील पिकामध्ये पाणीच पाणी साचल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. रानात काही ठिकाणी काढणीयोग्य, तर काही ठिकाणी काढलेल्या कडधान्याची पिके भिजून शेतातच कुजल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह भुईमूग पिकाच्या पूर्ण तयार झालेल्या शेगांना काही ठिकाणी कोंब आले आहेत. तसेच हायब्रीड ज्वारीचे पीक ऐन हुरड्यात आहे, पण सतत पडत असलेल्या पावसामुळे हे पीक काळे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.

चौकट..

भाज्यांवर किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता

पालक, मेथी, कोथिंबिर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारली ही वेलवर्गीय पिके घेतली जातात. या पिकांतही पाणी साचून नुकसान झाले आहे. तसेच भेंडी, गवारी यांसारख्या शेंगवर्गीय भाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चार दिवसांतील वरचे वर पडत असलेल्या पावसामुळे रानात पाणी साचल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

फोटो कॅप्शन

१६मलकापूर

मलकापूर परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी पहिल्या पेरणीतील सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान होत आहे. (छाया : माणिक डोंगरे)

160921\img-20210914-wa0027.jpg

फोटो कॕप्शन

गैली चार दिवस सततधार पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पहिल्या पेरणीतील सोयाबीन च्या शेतात पाणी साचल्यामुळे नुकसान होत आहे.(छाय माणिक डोंगरे)