शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

जिल्ह्यात सव्वाचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील ...

सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील पिकांची सर्वाधिक हानी झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये भात, नाचणी, सोयाबीन, ऊस, भाजीपाल्याचा समावेश आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वर, कोयना भागात धुवाधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका सर्वाधिक महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड आणि पाटण तालुक्याला बसला. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील जमिनी वाहून गेल्या. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान महाबळेश्वर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील नजरअंदाजे १०५० हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय. यामध्ये भात, नाचणी या पिकांचा समावेश आहे, तर यानंतर पाटण तालुक्यात ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पाटणमध्येही भात आणि नाचणी पिकांचीच हानी झाली आहे. जावळी तालुक्यात ८०६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. जावळीत भात, नाचणीबरोबरच सोयाबीन पिकांना फटका बसला आहे.

कऱ्हाड तालुक्यातही नजरअंदाजे ७६७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या तालुक्यात भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाठीमागे झालेल्या पावसातही कऱ्हाड तालुक्यात भाजीपाल्याला अधिक फटका बसलेला. वाई तालुक्यात ५५० हेक्टरवरील भात, नाचणी आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातही २५० हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले. साताऱ्यात भात, नाचणी आणि सोयाबीन पिकांची हानी झाली आहे.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनामे करण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, असा अंदाज आहे. त्यानंतर पीक नुकसानीचा खरा आकडा समोर येणार आहे.

चौकट :

७८६ हेक्टर शेतजमीन बाधित...

अतिवृष्टीचा पिकांनाच फटका बसला नाही, तर शेत जमिनीचीही हानी झाली आहे. जिल्ह्यातील नजरअंदाजे एकूण ७८६ हेक्टर शेत जमीन बाधित झाली. यामध्ये पाटण तालुक्यातील ३५० हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले. यानंतर महाबळेश्वर तालुका २५० हेक्टर, जावळी ८०, कऱ्हाड तालुका ४६ ,वाई ४० आणि सातारा तालुक्यातील नजरअंदाजे २० हेक्टर शेतजमिनींचे नुकसान झालेले आहे.

.................................................................