शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

जिल्ह्यात सव्वाचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील ...

सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील पिकांची सर्वाधिक हानी झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये भात, नाचणी, सोयाबीन, ऊस, भाजीपाल्याचा समावेश आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वर, कोयना भागात धुवाधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका सर्वाधिक महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड आणि पाटण तालुक्याला बसला. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील जमिनी वाहून गेल्या. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान महाबळेश्वर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील नजरअंदाजे १०५० हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय. यामध्ये भात, नाचणी या पिकांचा समावेश आहे, तर यानंतर पाटण तालुक्यात ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पाटणमध्येही भात आणि नाचणी पिकांचीच हानी झाली आहे. जावळी तालुक्यात ८०६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. जावळीत भात, नाचणीबरोबरच सोयाबीन पिकांना फटका बसला आहे.

कऱ्हाड तालुक्यातही नजरअंदाजे ७६७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या तालुक्यात भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाठीमागे झालेल्या पावसातही कऱ्हाड तालुक्यात भाजीपाल्याला अधिक फटका बसलेला. वाई तालुक्यात ५५० हेक्टरवरील भात, नाचणी आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातही २५० हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले. साताऱ्यात भात, नाचणी आणि सोयाबीन पिकांची हानी झाली आहे.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनामे करण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, असा अंदाज आहे. त्यानंतर पीक नुकसानीचा खरा आकडा समोर येणार आहे.

चौकट :

७८६ हेक्टर शेतजमीन बाधित...

अतिवृष्टीचा पिकांनाच फटका बसला नाही, तर शेत जमिनीचीही हानी झाली आहे. जिल्ह्यातील नजरअंदाजे एकूण ७८६ हेक्टर शेत जमीन बाधित झाली. यामध्ये पाटण तालुक्यातील ३५० हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले. यानंतर महाबळेश्वर तालुका २५० हेक्टर, जावळी ८०, कऱ्हाड तालुका ४६ ,वाई ४० आणि सातारा तालुक्यातील नजरअंदाजे २० हेक्टर शेतजमिनींचे नुकसान झालेले आहे.

.................................................................