शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सव्वाचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील ...

सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील पिकांची सर्वाधिक हानी झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये भात, नाचणी, सोयाबीन, ऊस, भाजीपाल्याचा समावेश आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वर, कोयना भागात धुवाधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका सर्वाधिक महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड आणि पाटण तालुक्याला बसला. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील जमिनी वाहून गेल्या. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान महाबळेश्वर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील नजरअंदाजे १०५० हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय. यामध्ये भात, नाचणी या पिकांचा समावेश आहे, तर यानंतर पाटण तालुक्यात ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पाटणमध्येही भात आणि नाचणी पिकांचीच हानी झाली आहे. जावळी तालुक्यात ८०६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. जावळीत भात, नाचणीबरोबरच सोयाबीन पिकांना फटका बसला आहे.

कऱ्हाड तालुक्यातही नजरअंदाजे ७६७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या तालुक्यात भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाठीमागे झालेल्या पावसातही कऱ्हाड तालुक्यात भाजीपाल्याला अधिक फटका बसलेला. वाई तालुक्यात ५५० हेक्टरवरील भात, नाचणी आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातही २५० हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले. साताऱ्यात भात, नाचणी आणि सोयाबीन पिकांची हानी झाली आहे.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनामे करण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, असा अंदाज आहे. त्यानंतर पीक नुकसानीचा खरा आकडा समोर येणार आहे.

चौकट :

७८६ हेक्टर शेतजमीन बाधित...

अतिवृष्टीचा पिकांनाच फटका बसला नाही, तर शेत जमिनीचीही हानी झाली आहे. जिल्ह्यातील नजरअंदाजे एकूण ७८६ हेक्टर शेत जमीन बाधित झाली. यामध्ये पाटण तालुक्यातील ३५० हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले. यानंतर महाबळेश्वर तालुका २५० हेक्टर, जावळी ८०, कऱ्हाड तालुका ४६ ,वाई ४० आणि सातारा तालुक्यातील नजरअंदाजे २० हेक्टर शेतजमिनींचे नुकसान झालेले आहे.

.................................................................