शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जिल्ह्यात सव्वाचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:41 IST

सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील ...

सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील पिकांची सर्वाधिक हानी झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये भात, नाचणी, सोयाबीन, ऊस, भाजीपाल्याचा समावेश आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वर, कोयना भागात धुवाधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका सर्वाधिक महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड आणि पाटण तालुक्याला बसला. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील जमिनी वाहून गेल्या. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान महाबळेश्वर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील नजरअंदाजे १०५० हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय. यामध्ये भात, नाचणी या पिकांचा समावेश आहे, तर यानंतर पाटण तालुक्यात ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पाटणमध्येही भात आणि नाचणी पिकांचीच हानी झाली आहे. जावळी तालुक्यात ८०६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. जावळीत भात, नाचणीबरोबरच सोयाबीन पिकांना फटका बसला आहे.

कऱ्हाड तालुक्यातही नजरअंदाजे ७६७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या तालुक्यात भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाठीमागे झालेल्या पावसातही कऱ्हाड तालुक्यात भाजीपाल्याला अधिक फटका बसलेला. वाई तालुक्यात ५५० हेक्टरवरील भात, नाचणी आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातही २५० हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले. साताऱ्यात भात, नाचणी आणि सोयाबीन पिकांची हानी झाली आहे.

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनामे करण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, असा अंदाज आहे. त्यानंतर पीक नुकसानीचा खरा आकडा समोर येणार आहे.

चौकट :

७८६ हेक्टर शेतजमीन बाधित...

अतिवृष्टीचा पिकांनाच फटका बसला नाही, तर शेत जमिनीचीही हानी झाली आहे. जिल्ह्यातील नजरअंदाजे एकूण ७८६ हेक्टर शेत जमीन बाधित झाली. यामध्ये पाटण तालुक्यातील ३५० हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले. यानंतर महाबळेश्वर तालुका २५० हेक्टर, जावळी ८०, कऱ्हाड तालुका ४६ ,वाई ४० आणि सातारा तालुक्यातील नजरअंदाजे २० हेक्टर शेतजमिनींचे नुकसान झालेले आहे.

.................................................................