शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दहिवडीची बाजारपेठ अर्धवेळ उघडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST

दहिवडी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे त्रिशतक गाठलेल्या दहिवडीमध्ये गेल्या तीन दिवसात कोरोनाचा वेग मंदावला असून, सलग सोळा दिवसांच्या लॉकडाऊननंतर ...

दहिवडी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे त्रिशतक गाठलेल्या दहिवडीमध्ये गेल्या तीन दिवसात कोरोनाचा वेग मंदावला असून, सलग सोळा दिवसांच्या लॉकडाऊननंतर सोमवारी दहिवडी शहर अर्धवेळ उघडण्यास माण-खटावचे प्रांताधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याने दहिवडीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

येथील दुकाने सोमवारपासून सकाळी ११ ते ४ यावेळेत उघडली जाणार आहेत. प्रशासनाकडून वेळेचे निर्बंध घालण्यात आले असून, सर्व ती खबरदारी घेऊन दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. सोमवारचा आठवडा बाजार मात्र बंद राहणार आहे. पहिल्या टप्प्यात दहिवडीत कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात दहिवडी शहर हाॅटस्पाॅट बनले होते.

फेब्रुवारी महिन्यात २००पेक्षा जास्त रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण होते. सुरुवातीला २० फेब्रुवारीपासून २२ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसांचे लॉकडाऊन होते. त्यानंतर ते दहा दिवसांनी वाढविण्यात आले. त्यानंतर संपूर्ण शहराचे एकाचवेळी रॅपिड सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये १५,९१७ लोकसंख्या असलेली जवळपास ३,००० कुटुंब व शासकीय कार्यालये यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यासाठी १५० जणांनी काम केले. दहिवडी शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण कोडलकर, डाॅ. हेमंत जगदाळे, डाॅ. मयुरी शेळके, डाॅ. विनायक कुलकर्णी, डाॅ. सुनील काशीद यांनी नियोजनबद्ध आखणी केली. वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका यांची २८ पथके ८ सुपरवायझर मोबाईल व्हॅनसह अद्ययावत केली होती. याकाळात जवळपास १,३०० चाचण्या करण्यात आल्या. व्यापारी, दुकानदार, ज्येष्ठ नागरिक तसेच ज्यांना ताप, खोकला, सर्दी असेल अशा लोकांसाठी सिद्धनाथ मंदिर, चावडी चौक, आंधळी पुनर्वसन शाळा, सावरकर स्मरणिका याठिकाणी तपासणी करण्याची सोय केली होती. त्यामुळे याकाळात वेळीच उपचार मिळाल्याने एकही रुग्ण दगावला नाही. गेल्या तीन दिवसात अवघे सातजण पाॅझिटिव्ह आल्याने कोरोना वाढीचा वेग मंदावल्यामुळेच सोमवारपासून सर्व व्यवहार बंधने पाळत सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

कोट..

सोमवारपासून सकाळी ११ ते ४ यावेळेत दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली असून, शेतकऱ्यांची सुगी लक्षात घेता त्यांच्या मागणीवरून सकाळी ९ ते ५ अशी दुकानांना परवानगी मिळावी, यासाठी आम्ही आग्रही असून, प्रांताधिकारी यांच्याकडे तशी मागणी करणार आहे.

- धनाजी जाधव, नगराध्यक्ष, दहिवडी