शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

सांस्कृतिक विभागाकडून मार्चपर्यंत राज्यात १२०० कार्यक्रम होणार; मंत्री आशिष शेलार यांची घोषणा

By नितीन काळेल | Updated: June 11, 2025 21:54 IST

साताऱ्यातील शाहिरी महोत्सवाचा समारोप 

- नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्याची माती पराक्रम, त्याग, बलिदान आणि समर्पित वृत्तीची आहे. हा परिसर समृध्द, संपन्न असून कला व संस्कृती जपणाराही आहे. त्यामुळे साताऱ्यात शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आता सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने मार्च महिन्यापर्यंत राज्यात १ हजार २०० कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केली.

साताऱ्यातील शाहू कला मंदिरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित शाहिरी महोत्सवाच्या समारोपात मंत्री शेलार बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, आमदार मनोज घोरपडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी नीलेश धुमाळ, भाजप प्रदेश सांस्कृतिक आघाडी सदस्य पंकज चव्हाण, शिरीष चिटणीस आदी उपस्थित होते.

मंत्री आशिष शेलार म्हणाले, आक्रमणे ही युध्दाच्या रुपाने येतात. पण, एेतिहासिक प्रथा, परंपरा, संस्कृती जीवंत राहते तोच देश टिकतो. त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने विविध कार्यक्रम होत असतात. आता मार्च महिन्यापर्यंत चित्रपट, कला, संस्कृती, लोककलांचे १ हजार २०० कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शाहिरी ही उर्जा आणणारी कला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळापासून शाहिरीला सुरूवात झाली. राष्ट्रनिर्मितीतही शाहिरांचे मोठे योगदान राहिले. तर महाराष्ट्राच्या निर्मितीवेळच्या संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्यावेळी शाहिरांनी दिलेले योगदानही आपणाला विसरता येत नाही.जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात शाहिरांचे योगदान मोठे आहे. शहरांचा विकास सांस्कृतिकही असावा. साताऱ्यात शाहिरी महोत्सव झाला. याला सातारकरांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

            लोककला जपल्या पाहिजेत. त्यामुळे शासन त्यांना राजाश्रय देण्याचा प्रयत्न करत आहे. डिजीटल क्रांतीत मात्र, लोककला लोप पावत आहेत. ही संस्कृती आणि आपला इतिहास लोकांसमोर जाण्यासाठी शाहिरीही टिकायला हवी, असे आमदार मनोज घाेरपडे यांनी सांगितले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलार