शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
4
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
5
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
6
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
7
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
8
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
9
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
10
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
11
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
12
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
13
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
14
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
15
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
16
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
17
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
18
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
19
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
20
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...

थंडीचा स्ट्रॉबेरीसह भाजीपाल्याला फटका -शेतकºयांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 18:12 IST

आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाºया महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत.

ठळक मुद्देनीचांकी तापमानाने थंडीचा जोर वाढला

महाबळेश्वर : आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाºया महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत. त्यामुळे अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे फेकून देण्यात आली आहेत. शेतकºयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

महाबळेश्वर परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून अचानक वाढलेल्या थंडीने विक्रमच केला. वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरातील नीचांकी तापमान ० ते उणे २ पर्यंत गेले होते. रविवारी सकाळी मळेधारक स्ट्रॉबेरीची फळे तोडण्यासाठी आपल्या मळ्यात गेले तेव्हा तेथील फळांची गंभीर परिस्थिती पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. 

थंडीचा कडका व हिमकणांमुळे स्ट्रॉबेरी, फळभाज्या, पालेभाज्या व फूल शेती करणाºया शेतकºयांची रोपे गारठून मरू लागली आहे. त्यामुळे बाजार आणलेल्या स्ट्रॉबेरी फळे ही नासलेली आढळून आली. तसेच त्यांचा आकार व बेचव लागत आहेत. अशीच परिस्थिती फळ, पाले भाज्या व शोभिवंत फूल शेतीची झाली आहे. त्याच्या मळ्यातील तूतू (मलबेरी), जांभूळ,पेरूची झाडे थंडीमुळे पूर्णपणे काळी पडली आहेत. वांगी, वाटणा, फारशी, मिरची, कोबी, फ्लॉवर आदीची रोपेही जाळून गेली आहेत. झेंडू, गुलाब, जरबेरी, कर्दळ, सदाफुली, बिगोनिया आदी शोभिवंत फुलांची आजची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे.

कडाक्याच्या थंडीने जळून व कुजून गेल्याने अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे रस्त्याकडेला फेकून देण्याची वेळ मळेधारकांवर आली आहे. हीच परिस्थिती वाटाणा, कोबी, फ्लॉवर फळ, पालेभाज्या व फूल शेती करणाºया शेतकºयांची असून, त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे मळेधारक हवालदिल झाला असून, हातातोंडाला आलेल्या फळांचे अचानक नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर जणू शोककळाच पसरली आहे.

हंगाम गेला वाया.. 

 

महाबळेश्वर म्हटंले की स्ट्रॉबेरीची मधुर फळे डोळ््यासमोर येतात. परिसरातून दररोज हजारो टन स्ट्रॉबेरी देशभरात पाठविली जातात. मात्र, थंडीच्या कडाक्याने रोपेच जळाल्याने यंदाचा हंगामच वाया गेला आहे. त्यामुळे आता पुन्हा नवीन रोपे लावणे व त्यांना फळे येण्यासाठी पुन्हा एक ते दीड महिने थांबावे लागणार आहे. शिवाय एप्रिल-मे महिन्यांत काही भागात पाण्याची कमतरता भासत असल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नाही.  

 

एवढी मेहनत करून, रात्रंदिवस पहारा करून गव्यापासून त्याचे रक्षण केले. मात्र आजच्या अचानकच्या संकटामुळे तयार फळे फेकण्याची वेळ आली आहे. शासनाने खास बाब म्हणून तातडीची मदत करावी.

- आसिफभाई मुलाणी,  मळेधारक शेतकरी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी