शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लोकसेवा केंद्रांचे कोट्यवधी रखडले, शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज भरून दोन महिने झाले

By दीपक देशमुख | Updated: October 5, 2023 14:27 IST

सातारा जिल्ह्यातील २ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी भरला विमा

दीपक देशमुखसातारा : खरीप हंगामातील पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया घेण्यात आला. उर्वरित पीक विम्याचे पैसे शासन भरणार होते. त्यानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा एक रुपया देऊन सीएससी चालकांनी भरून घेतला. यासाठी सामान्य सेवा केंद्रांना प्रत्येक विम्यासाठी ४० रुपये शुल्क देण्याचे ठरले होते. परंतु, दाेन महिने झाले तरी हे पैसे या केंद्रांना अद्याप मिळालेले नाहीत. १२६१ चालकांचे तब्बल १ कोटी १० लाख ४६ हजार ६०० रुपये रखडले असून ही रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी होत आहे.

शासनाने बाह्यस्रोताद्वारे अनेक शासकीय कामे करण्यासाठी सेतू कार्यालये, सीएससी सेंटर सुरू केली आहेत. यातून हजारो युवकांना रोजगारही मिळत आहे. परंतु, त्यांची बिले महिना-महिना रखडत असल्याने आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सीएससी केंद्र चालकांनाही याचा फटका बसला आहे.महाराष्ट्रात या वर्षीपासून राज्य सरकारने सर्वसमावेशक पीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबविण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पीक विमा भरण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार सीएससी चालकांनी शेतकऱ्यांकडून १ रुपया घेऊन पीक विमा भरून घेतला. मात्र, सीएससी चालकांना पैसे दिले नाहीत. जिल्ह्यात एकूण ४२८७ सीएससी आहेत. यापैकी आजघडीला १२६१ केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांवरून २ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी विमा भरला आहे. त्यापोटी १ कोटी १० लाख ४६ हजार ६०० इतकी रक्कम सीएससी चालकांना देय आहे. ३ ऑगस्टला विमा भरण्याचे काम पूर्ण झाले. आत दोन महिने झाले तरी ही बिले अद्याप अदा करण्यात आली नाहीत.

२ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी भरला विमाजिल्ह्यात २ लाख ७६ हजार १६५ शेतकऱ्यांनी विम्यासाठी अर्ज केला आहे. यामुळे १ लाख १० हजार ८२९ हेक्टरवरील पिके संरक्षित झाली आहेत. तथापि, १ कोटी १० लाख ४६ हजार ६०० इतकी रक्कम रखडली आहे. त्यामुळे लवकरात लवकर बिल मिळावे, अशी मागणी सीएससी चालकांकडून होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी