शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

ग्राउंड रिपोर्ट: वाटाणा सडला; शेतकरी रडला!, अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका

By नितीन काळेल | Updated: September 4, 2025 15:59 IST

रानाचं झालं तळं; पिकाचा चिखल; उत्पन्न शून्य

नितीन काळेलसातारा : दरवर्षीच वाटाणा पीक घेतो. त्यातच महाबळेश्वरच्या वाटाण्याला मुंबईच्या बाजारातही चांगली मागणी. त्यामुळे उत्पन्नही चांगले मिळते; पण यावर्षी सतत पाऊस असल्याने उगवणीलाच वाटाण्यात पाणी साचले. त्यातच अजूनही पाऊस सुरू असल्यानं जमिनीचं तळं अन् पिकाचा चिखल झालाय. त्यामुळे वाटाणा कुजल्याने उत्पन्न मिळणार नाहीच. यातून वर येण्यासाठी शासनानेच तातडीने मदत करावी, अशी आर्त हाक आंब्रळ येथील शेतकरी दिलीप आंब्राळे यांनी दिली आहे.महाबळेश्वर तालुका तसा डोंगर, चढ-उताराचा. तरीही येथील शेतकरी विविध पिके घेऊन समृद्ध होण्याची स्वप्ने पाहतात. येथील स्ट्राॅबेरी जशी प्रसिद्ध तसेच वाटाण्यालाही मागणी राहते. त्यामुळे शेतकरी वाटाणाही लावून मुंबईची बाजारपेठ गाठतात; पण यावर्षी महाबळेश्वर तालुक्यात सतत पाऊस आहेच. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर सतत तीन दिवस अतिवृष्टी झाली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला. यामध्ये दिलीप आंब्राळे यांचाही समावेश आहे.दिलीप आंब्राळे यांची एकूण १२ ते १३ एकर शेती आहे. यामध्ये ते स्ट्राॅबेरी पिकवतात. त्याचबरोबर वाटाणा हे पीकही घेतात. यावर्षीही त्यांनी वाटाणा घेतला; पण उगवणीलाच दणका बसला. त्यातून पुन्हा उभा राहणे शक्य नाही. कारण, सततचा पाऊस आणि पाणी साचल्याने वाटाणा खालील बाजूने कुजलाय. पाऊस कायम राहिल्यास पीक पूर्ण कुजणार आहे.दिलीप आंब्राळे सांगत होते, यावर्षी दोन एकर वाटाणा केला होता. त्यासाठी १४० रुपये किलोने ८० किलो बियाणे आणले. लागवडीनंतर उगवणीलाच पाऊस सुरू झाला. दोन दिवस अतिवृष्टी झाली. जमिनीत पाणी साचले. त्यातच आताही सतत पाऊस पडतोय. त्यामुळे वाटाणा बघायला गेलो तर खालून सडू लागल्याचे दिसत आहे. आता वाटाणा हाती येणारच नाही. त्यामुळे माझ्याबरोबरच अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.दरम्यान, ही व्यथा एकट्या दिलीप आंब्राळे यांची नाही तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे. यासाठी पंचनामे झालेल्या क्षेत्रासाठी लवकर मदत शासनाकडून मिळावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

अतिवृष्टीचा १९९ शेतकऱ्यांना फटका; त्यामधील ११२ महाबळेश्वरमधील..ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सातारा, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यांतील शेतीपिकांचे नुकसान झाले. प्रशासनाकडील नोंदीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १९९ आहे. यामधील ११२ शेतकरी हे महाबळेश्वर तालुक्यातील आहेत.

यावर्षी सतत पाऊस आहे. वाटाण्याला फटका बसला. त्यामुळे उत्पन्नाची आशा संपलेली आहे. तसेच आता पावसामुळे स्ट्राॅबेरी लागवडही काही दिवस पुढे जाणार आहे. त्यामुळे त्याचा स्ट्राॅबेरीच्या उत्पादनावर परिणाम होईल. सततच्या पावसामुळे यावर्षी नुकसान सोसावे लागणार आहे. - दिलीप आंब्राळे, शेतकरी