शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

ग्राउंड रिपोर्ट: वाटाणा सडला; शेतकरी रडला!, अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका

By नितीन काळेल | Updated: September 4, 2025 15:59 IST

रानाचं झालं तळं; पिकाचा चिखल; उत्पन्न शून्य

नितीन काळेलसातारा : दरवर्षीच वाटाणा पीक घेतो. त्यातच महाबळेश्वरच्या वाटाण्याला मुंबईच्या बाजारातही चांगली मागणी. त्यामुळे उत्पन्नही चांगले मिळते; पण यावर्षी सतत पाऊस असल्याने उगवणीलाच वाटाण्यात पाणी साचले. त्यातच अजूनही पाऊस सुरू असल्यानं जमिनीचं तळं अन् पिकाचा चिखल झालाय. त्यामुळे वाटाणा कुजल्याने उत्पन्न मिळणार नाहीच. यातून वर येण्यासाठी शासनानेच तातडीने मदत करावी, अशी आर्त हाक आंब्रळ येथील शेतकरी दिलीप आंब्राळे यांनी दिली आहे.महाबळेश्वर तालुका तसा डोंगर, चढ-उताराचा. तरीही येथील शेतकरी विविध पिके घेऊन समृद्ध होण्याची स्वप्ने पाहतात. येथील स्ट्राॅबेरी जशी प्रसिद्ध तसेच वाटाण्यालाही मागणी राहते. त्यामुळे शेतकरी वाटाणाही लावून मुंबईची बाजारपेठ गाठतात; पण यावर्षी महाबळेश्वर तालुक्यात सतत पाऊस आहेच. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर सतत तीन दिवस अतिवृष्टी झाली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला. यामध्ये दिलीप आंब्राळे यांचाही समावेश आहे.दिलीप आंब्राळे यांची एकूण १२ ते १३ एकर शेती आहे. यामध्ये ते स्ट्राॅबेरी पिकवतात. त्याचबरोबर वाटाणा हे पीकही घेतात. यावर्षीही त्यांनी वाटाणा घेतला; पण उगवणीलाच दणका बसला. त्यातून पुन्हा उभा राहणे शक्य नाही. कारण, सततचा पाऊस आणि पाणी साचल्याने वाटाणा खालील बाजूने कुजलाय. पाऊस कायम राहिल्यास पीक पूर्ण कुजणार आहे.दिलीप आंब्राळे सांगत होते, यावर्षी दोन एकर वाटाणा केला होता. त्यासाठी १४० रुपये किलोने ८० किलो बियाणे आणले. लागवडीनंतर उगवणीलाच पाऊस सुरू झाला. दोन दिवस अतिवृष्टी झाली. जमिनीत पाणी साचले. त्यातच आताही सतत पाऊस पडतोय. त्यामुळे वाटाणा बघायला गेलो तर खालून सडू लागल्याचे दिसत आहे. आता वाटाणा हाती येणारच नाही. त्यामुळे माझ्याबरोबरच अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.दरम्यान, ही व्यथा एकट्या दिलीप आंब्राळे यांची नाही तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे. यासाठी पंचनामे झालेल्या क्षेत्रासाठी लवकर मदत शासनाकडून मिळावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

अतिवृष्टीचा १९९ शेतकऱ्यांना फटका; त्यामधील ११२ महाबळेश्वरमधील..ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सातारा, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यांतील शेतीपिकांचे नुकसान झाले. प्रशासनाकडील नोंदीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १९९ आहे. यामधील ११२ शेतकरी हे महाबळेश्वर तालुक्यातील आहेत.

यावर्षी सतत पाऊस आहे. वाटाण्याला फटका बसला. त्यामुळे उत्पन्नाची आशा संपलेली आहे. तसेच आता पावसामुळे स्ट्राॅबेरी लागवडही काही दिवस पुढे जाणार आहे. त्यामुळे त्याचा स्ट्राॅबेरीच्या उत्पादनावर परिणाम होईल. सततच्या पावसामुळे यावर्षी नुकसान सोसावे लागणार आहे. - दिलीप आंब्राळे, शेतकरी