शहरं
Join us  
Trending Stories
1
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
2
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
3
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?
4
Sri Lanka Bus Accident: पर्यटकांची बस थेट १००० फूट खोल दरीत कोसळली; १५ ठार, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
5
राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ सप्टेंबरला नागपूरमध्ये चिंतन शिबिर; कोणकोणत्या विषयांवर होणार चर्चा?
6
Thane: बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण...
7
एअरटेलचा सर्वात महागडा रिचार्ज प्लॅन; एका वर्षासाठी मिळणार अनलिमिटेड बेनिफिट्स, काय-काय आहे?
8
शनिवारी अनंत चतुर्दशी २०२५: साडेसाती, शनि महादशा सुरू आहे? ‘हे’ उपाय तारतील अन् भरभराट होईल
9
६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस
10
“राज-उद्धव ठाकरे बंधूंच्या घट्ट युतीतून मुंबईत मराठी माणूस महापौर होईल”; संजय राऊतांचा दावा
11
हा खरा गणेशोत्सव! परभणीत गणेश मंडळाकडून जोडप्याचे शुभमंगल, संसारोपयोगी साहित्य भेट!
12
लग्नाला सहा महिनेही झाले नव्हते, अचानक एक दिवस पत्नी बेपत्ता, व्हॉट्सअपवर पतीला फोटो आला...
13
Apple च्या भारतातील गुंतवणूकीवर ट्रम्प नाराज; टिम कुक यांना सर्वांसमोर थेट प्रश्न विचारला...
14
Astro Tips: तुमची ग्रहस्थिती 'ही' असेल तर शेअर मार्केटमध्ये होतो लाभ, अन्यथा सुपडा साफ!
15
अरे बापरे! महाराष्ट्रात वाघांनी घेतला २१८ जणांच्या नरडीचा घोट, देशात सर्वाधिक हल्ले राज्यात
16
प्रताप सरनाईकांनी घेतली देशातील पहिली Tesla Model Y कार; नातवाला दिली भेट, म्हणाले...
17
रणबीर कपूरशी संबंधित 'या' कंपनीच्या शेअरमध्ये मोठी तेजी; ब्लॉक डीलनंतर शेअरने गाठले अप्पर सर्किट
18
दिल्लीहून इंदूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग, विमानात १६१ प्रवासी होते
19
मुस्लीम, शेतकऱ्यांसाठीही मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करा; मनोज जरांगेंच्या मुख्यमंत्र्यांकडे नवीन मागण्या काय?
20
No Cost EMI: फुकट काहीच नाही, समजून घ्या गणित; खरंच व्याज द्यावं लागत नाही का?

ग्राउंड रिपोर्ट: वाटाणा सडला; शेतकरी रडला!, अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका

By नितीन काळेल | Updated: September 4, 2025 15:59 IST

रानाचं झालं तळं; पिकाचा चिखल; उत्पन्न शून्य

नितीन काळेलसातारा : दरवर्षीच वाटाणा पीक घेतो. त्यातच महाबळेश्वरच्या वाटाण्याला मुंबईच्या बाजारातही चांगली मागणी. त्यामुळे उत्पन्नही चांगले मिळते; पण यावर्षी सतत पाऊस असल्याने उगवणीलाच वाटाण्यात पाणी साचले. त्यातच अजूनही पाऊस सुरू असल्यानं जमिनीचं तळं अन् पिकाचा चिखल झालाय. त्यामुळे वाटाणा कुजल्याने उत्पन्न मिळणार नाहीच. यातून वर येण्यासाठी शासनानेच तातडीने मदत करावी, अशी आर्त हाक आंब्रळ येथील शेतकरी दिलीप आंब्राळे यांनी दिली आहे.महाबळेश्वर तालुका तसा डोंगर, चढ-उताराचा. तरीही येथील शेतकरी विविध पिके घेऊन समृद्ध होण्याची स्वप्ने पाहतात. येथील स्ट्राॅबेरी जशी प्रसिद्ध तसेच वाटाण्यालाही मागणी राहते. त्यामुळे शेतकरी वाटाणाही लावून मुंबईची बाजारपेठ गाठतात; पण यावर्षी महाबळेश्वर तालुक्यात सतत पाऊस आहेच. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर सतत तीन दिवस अतिवृष्टी झाली. यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पिकांना मोठा फटका बसला. यामध्ये दिलीप आंब्राळे यांचाही समावेश आहे.दिलीप आंब्राळे यांची एकूण १२ ते १३ एकर शेती आहे. यामध्ये ते स्ट्राॅबेरी पिकवतात. त्याचबरोबर वाटाणा हे पीकही घेतात. यावर्षीही त्यांनी वाटाणा घेतला; पण उगवणीलाच दणका बसला. त्यातून पुन्हा उभा राहणे शक्य नाही. कारण, सततचा पाऊस आणि पाणी साचल्याने वाटाणा खालील बाजूने कुजलाय. पाऊस कायम राहिल्यास पीक पूर्ण कुजणार आहे.दिलीप आंब्राळे सांगत होते, यावर्षी दोन एकर वाटाणा केला होता. त्यासाठी १४० रुपये किलोने ८० किलो बियाणे आणले. लागवडीनंतर उगवणीलाच पाऊस सुरू झाला. दोन दिवस अतिवृष्टी झाली. जमिनीत पाणी साचले. त्यातच आताही सतत पाऊस पडतोय. त्यामुळे वाटाणा बघायला गेलो तर खालून सडू लागल्याचे दिसत आहे. आता वाटाणा हाती येणारच नाही. त्यामुळे माझ्याबरोबरच अनेक शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.दरम्यान, ही व्यथा एकट्या दिलीप आंब्राळे यांची नाही तर परिसरातील अनेक शेतकऱ्यांची झालेली आहे. यासाठी पंचनामे झालेल्या क्षेत्रासाठी लवकर मदत शासनाकडून मिळावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.

अतिवृष्टीचा १९९ शेतकऱ्यांना फटका; त्यामधील ११२ महाबळेश्वरमधील..ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सातारा, वाई आणि महाबळेश्वर तालुक्यांतील शेतीपिकांचे नुकसान झाले. प्रशासनाकडील नोंदीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १९९ आहे. यामधील ११२ शेतकरी हे महाबळेश्वर तालुक्यातील आहेत.

यावर्षी सतत पाऊस आहे. वाटाण्याला फटका बसला. त्यामुळे उत्पन्नाची आशा संपलेली आहे. तसेच आता पावसामुळे स्ट्राॅबेरी लागवडही काही दिवस पुढे जाणार आहे. त्यामुळे त्याचा स्ट्राॅबेरीच्या उत्पादनावर परिणाम होईल. सततच्या पावसामुळे यावर्षी नुकसान सोसावे लागणार आहे. - दिलीप आंब्राळे, शेतकरी