शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पीक विमा कंपन्या मालामाल; ४८ लाख भरले, मिळाले फक्त पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी म्हणावा असा लाभ त्यांना मिळत नाही. यामध्ये कंपन्याच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना असली तरी म्हणावा असा लाभ त्यांना मिळत नाही. यामध्ये कंपन्याच मालामाल होत असल्याचे दिसून आले आहे. सातारा जिल्ह्यात गेल्यावर्षी खरीप हंगामात ८ हजारांवर शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन ४८ लाख रुपये भरले, तर दोन्ही शासनांनी ७ कोटी रक्कम दिली, पण अजूनही कंपन्यांनी लाभार्थी संख्या निश्चित केलेली नाही. फक्त काही शेतकऱ्यांनाच ५ लाख मिळालेत. त्यामुळे शेकडो शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत.

शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागतो. यासाठी विमा योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ठरावीक रक्कम भरावी लागते, तर राज्य आणि केंद्र शासनही आपल्या वाट्याची रक्कम विमा कंपनीकडे जमा करते. मात्र, यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ आदी कारणांनी पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुुंजीच मदत मिळत आहे. त्यामुळे यामधून कंपन्यांच मालमाल होत असल्याचे दिसून आले आहे.

सातारा जिल्ह्याचा विचार करता गेल्यावर्षी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील ३८,६७२ शेतकऱ्यांनी विमा घेतला. यामधून भात, बाजरी, ज्वारी, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूग, कांदा, नाचणी आदी पिकांसाठी हे विमा कवच घेतले. ८,१६६ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले. त्यासाठी ४८ लाख ७७ हजार ५१२ रुपये शेतकऱ्यांनी भरले, तर राज्य आणि केंद्र शासनानेही रक्कम दिली. गेल्यावर्षी खरीप हंगामात दोन ते तीनवेळा अतिवृष्टी झाली. यामध्ये फळबागा, सोयाबीन, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले, पण दुसरा खरीप हंगाम आला तरी शेकडो शेतकऱ्यांना विमा कंपनीने आणखी लाभ दिलेला नाही.

गेल्यावर्षी जून आणि जुलै महिन्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्या अंतर्गत १६५ शेतकऱ्यांनाच आतापर्यंत ५ लाख ६ हजार ९१२ रुपये विमा रक्कम दिली आहे. त्यामुळे इतर शेतकरी अजूनही लाभाच्या प्रतीक्षेतच असल्याचे दिसून येत आहे.

चौकट :

कहर... लाभार्थी शेतकरी

संख्या अद्याप अनिश्चित...

खरीप हंगामात नुकसान झालेल्या पिकांची विमा रक्कम किमान जानेवारी महिन्यानंतर तरी मिळायला हवी, पण आता मे महिना संपत आला. त्यातच नवीन खरीप हंगाम लवकरच सुरू होत आहे. तरीही नुकसान झालेल्या किती शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळणार हे अजूनही निश्चित झालेले नाही. कोणत्या तालुक्यात, किती गावांत ही मदत मिळणार हे समोर आलेले नाही. त्यामुळे कंपन्या एकप्रकारे आमची चेष्टाच करत असल्याची भावना विमा पीक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांची संख्या निश्चित करून लाभ द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

................................

चौकट :

कंपन्याने नाकारले नाही...

जिल्ह्यात खरीप हंगामात गेल्यावर्षी जून आणि जुलै महिन्यात पीक नुकसान झालेल्या अवघ्या १६५ शेतकऱ्यांना ५ लाख ६ हजारांची भरपाई मिळालेली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची नावेच निश्चित झालेली नाहीत. शेतकऱ्यांची भरपाई निश्चित व्हायची आहे. त्यामुळे विमा कंपन्यांनी अद्यापतरी लाभ नाकारलेला नाही, असे सांगण्यात येत आहे.

चौकट :

खरीप हंगाम २०२०-२१

पीक विमा लागवड क्षेत्र

८१६६ हेक्टर

एकूण जमा रक्कम

७३९०६६९४

.......................

एकूण मंजूर पीक विमा - ०००

प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी भरलेले पैसे ४८७७५१२

राज्य शासनाने भरलेले पैसे ३६५५९६६६

केंद्र शासनाने भरलेले पैसे ३२४६९५१५

पीक विमा काढणारे शेतकरी ३८६७२

एकूण लाभार्थी शेतकरी - ०००

कितीजणांना मिळाला विमा १६५

आतापर्यंत वाटप केलेली रक्कम ५०६९१२

..........................................

कोट :

गेल्यावर्षी खरीप हंगामात पीक विमा भरला होता. तसेच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे कृषी विभागाने पंचनामा केला. मात्र, अद्यापही आम्हाला विमा कंपनीकडून लाभ मिळालेला नाही. आता रक्कम मिळाली तर यावर्षीच्या खरीप हंगामासाठी त्याचा उपयोग होईल. यादृष्टीने तातडीने निर्णय होण्याची गरज आहे.

- शांताराम काळे, शेतकरी.

........................................

अतिवृष्टी, दुष्काळात पिके वाया जातात. यासाठी शासनाने पीक विमा योजना आणली. ही योजना फायद्याची ठरत आहे, पण गेल्यावर्षी खरीप हंगामात पिकांचे नुकसान होऊनही लाभ मिळालेला नाही. आम्ही विम्याची रक्कम वेळेत भरतो. त्यामुळे विमा कंपन्याकडून लाभही वेळेत मिळण्याची गरज आहे.

- शामराव पाटील, शेतकरी.

...................................................

गेल्यावर्षी खरीप हंगामात तीनवेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पिकांचा विमा उतरवला होता, पण अजूनही कंपनीकडून विम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे लाभाची रक्कम लवकर मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.

- रामराव पवार, शेतकरी.

............................................................................................