शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : विश्वजीत कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 16:25 IST

Farmar, Vishwajeet Kadam, Satara area अतिवृष्टीमुळे बळीराजाचे शेतातील पीक व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. माण तालुक्यातील देवापूर, पळसावडे व जांभुळणी येथील डाळींब, द्राक्ष व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

ठळक मुद्देपिकांच्या नुकसानीचे पंचनामे शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या : विश्वजीत कदम देवापुर, पळसावडे, जांभुळणी येथील पिकांची पाहणी

म्हसवड : अतिवृष्टीमुळे बळीराजाचे शेतातील पीक व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. माण तालुक्यातील देवापूर, पळसावडे व जांभुळणी येथील डाळींब, द्राक्ष व कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पाहणी केली. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या.गत आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुुळे दुष्काळी माण तालुक्यातील पूर्व भागाला मोठा फटका बसला. या पावसात माण तालुक्यातील बळीराजाची हातातोंडाशी आलेली पिके उध्वस्त झाली तर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले. त्या नुकसानीची कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

देवापूर व पळसावडे परिसरातील फळबागा पावसाने उध्वस्त झाल्या आहेत. कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात वाहून गेले आहे. या पिकांची राज्यमंत्री कदम यांनी पाहणी करतानाच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या.गेल्या चार वर्षांपासून दुष्काळग्रस्त असणाऱ्या माण तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांना केली. मंत्री कदम यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रकांत सानप यांना केल्या.यावेळी महाराष्ट्र कॉँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलासराव ओताडे, सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. विजय जाधव, काँग्रेस सेवादल सातारा जिल्हाध्यक्ष प्रतापसिंह पिसाळ, दादासाहेब काळे, विजय धट, प्रा. विश्वंभर बाबर, भीमराव काळेल, विकास गोजारी, बाबासाहेब माने, अनिल लोखंडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :FarmerशेतकरीVishwajeet Kadamविश्वजीत कदमSatara areaसातारा परिसर