शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

कार्वेत पिके पाण्याअभावी होरपळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:43 IST

कार्वे : कार्वे, ता. कऱ्हाड परिसरात गत काही दिवसांपासून कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके होरपळत असून शेतकरी ...

कार्वे : कार्वे, ता. कऱ्हाड परिसरात गत काही दिवसांपासून कडक उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पाण्याअभावी पिके होरपळत असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

जुलै महिन्यात विभागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला होता. त्यानंतर पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली. अतिवृष्टीमध्ये शेतात साचलेल्या पाण्याचा पूर्णपणे निचरा होऊन सध्या शिवार कोरडे पडले आहे. त्यातच जुलै महिन्यातील अतिवृष्टीत अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरमध्ये तांत्रिक बिघाड झालेला आहे. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. मात्र, बिघाड दुरुस्त केल्यानंतर पुन्हा होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. काही ठिकाणी पावसामुळे विद्युत वाहिन्या नादुरुस्त झाल्या आहेत. तर काही ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहेत. या परिस्थितीमुळे शिवारात अखंडित वीजपुरवठा होत नाही. त्यामुळे विहिरीत पाणी असूनही शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही. परिणामी, सध्या खरीप हंगामातील भुईमूग, सोयाबीन, ऊस ही पिके पाण्याअभावी होरपळत आहेत. या पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र, गरज असतानाच पावसाने दडी मारली असून यंदा खरिपातील उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

खरीप हंगामातील उत्पादनावर शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. या हंगामात उत्पादन घटले तर पुढील हंगामापर्यंत शेतकऱ्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो. सध्या खताचे दर वाढले आहेत. त्याबरोबरच शेती उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यातच निसर्गाने शेतकऱ्यांना आणखी संकटात टाकले आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही ठिकाणी शेतीसह पिके वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या. या सर्व परिस्थितीतून शेतकरी सावरत असताना पावसाने पाठ फिरवल्यामुळे सध्या पिके पाण्याअभावी होरपळत असून शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.