शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

संकट संपता संपेना, डेंगूचाही व्हायरस बदलतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: कोरोनाचे थैमान आता कुठे कमी होऊ लागले असतानाच डेंग्यूचा इतरत्र हाहाकार पाहायला मिळत आहे. धक्कादायक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: कोरोनाचे थैमान आता कुठे कमी होऊ लागले असतानाच डेंग्यूचा इतरत्र हाहाकार पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना व्हायरससारखा डेंग्यूही ही आपलं रूप आता बदलत आहे. रुग्णांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यानंतर ही रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या चिंतेत यामुळे भर पडली असून, हा डेंग्यूचा नवा स्ट्रेन असल्याचंदेखील म्हटले जात आहे.

डेंग्यू रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षण आढळून येत असल्याने डॉक्टर अक्षरशः हैराण झाले आहेत. कोरोनासारखा डेंगू वायरसदेखील बदलत आहे ज्या रुग्णांमध्ये कोणतीच लक्षण नाहीत, त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह येत आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा असून नागरिकांनी वेळीच टेस्ट करून घेणे गरजेचे असल्याचे मत वैदिक अधिकारी व्यक्त करत आहेत. चालढकल केल्यास जीवावरही बेतण्यासारखा हा प्रकार असून डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

कोट :

जास्त रुग्णांमध्ये तापासोबतच डेंग्यूची लक्षणे पाहायला मिळत आहेत. पण त्यांच्या प्लेटलेट्स नॉर्मल आहेत. कदाचित चांगली प्रतिकारशक्ती असल्याने प्लेटलेट्समध्ये घट होत नसावी. पण हा संशोधनाचा विषय आहे.

एचडी. माने, पॅथॉलॉजिस्ट, सातारा

चौकट: हे बदल काळजी वाढवणारे...

ताप नसताना पॉझिटिव

अनेक जणांना ताप नसताना ते पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचे कारण वैद्यकीय अधिकारी सांगतायत कदाचित त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती चांगली असू शकते. वायरसने आपला बदल केला असला तरी एखाद्याच्या शरीरात त्याचा बदल म्हणजे त्याचा टिकाव लागत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे दुर्मिळातील दुर्मिळ रुग्णही डेंग्यूचे अलीकडे आढळून येत आहेत.

चौकट: प्लेटलेट्स कमी नाही तरी पॉझिटिव्ह

रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत नाही. त्यामुळे हा डेंग्यूचा वेगळा स्ट्रेन चिंतेचा विषय बनला आहे. यावर डॉक्टरही ठोस सांगू शकत नाहीत. आपल्याला कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे केवळ डॉक्टर सांगतायत.

कोट : डेंग्यूचा नवा व्हायरस जरी बदलत असला तरी आपल्या सातारा जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. अशा प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण फार कमी आढळून आले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार केल्यामुळे हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. मात्र रुग्णांनी आपल्या शरीरात झालेले बदल अवगत करून तत्काळ तपासणी करून घेणे गरजेचे आहे. काही वेळेला ताप किंवा अंगदुखी यासारखे प्रकारही होत नाहीत. पण आतून आपल्या शरीरातून बदल आपल्याला जाणवतात. त्यावेळी मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

डॉक्टर सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा