शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

संकट संपता संपेना, डेंगूचाही व्हायरस बदलतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: कोरोनाचे थैमान आता कुठे कमी होऊ लागले असतानाच डेंग्यूचा इतरत्र हाहाकार पाहायला मिळत आहे. धक्कादायक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: कोरोनाचे थैमान आता कुठे कमी होऊ लागले असतानाच डेंग्यूचा इतरत्र हाहाकार पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोरोना व्हायरससारखा डेंग्यूही ही आपलं रूप आता बदलत आहे. रुग्णांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आल्यानंतर ही रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. प्रशासनाच्या चिंतेत यामुळे भर पडली असून, हा डेंग्यूचा नवा स्ट्रेन असल्याचंदेखील म्हटले जात आहे.

डेंग्यू रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षण आढळून येत असल्याने डॉक्टर अक्षरशः हैराण झाले आहेत. कोरोनासारखा डेंगू वायरसदेखील बदलत आहे ज्या रुग्णांमध्ये कोणतीच लक्षण नाहीत, त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह येत आहे. त्यामुळे ही धोक्याची घंटा असून नागरिकांनी वेळीच टेस्ट करून घेणे गरजेचे असल्याचे मत वैदिक अधिकारी व्यक्त करत आहेत. चालढकल केल्यास जीवावरही बेतण्यासारखा हा प्रकार असून डेंग्यूची लक्षणे आढळल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

कोट :

जास्त रुग्णांमध्ये तापासोबतच डेंग्यूची लक्षणे पाहायला मिळत आहेत. पण त्यांच्या प्लेटलेट्स नॉर्मल आहेत. कदाचित चांगली प्रतिकारशक्ती असल्याने प्लेटलेट्समध्ये घट होत नसावी. पण हा संशोधनाचा विषय आहे.

एचडी. माने, पॅथॉलॉजिस्ट, सातारा

चौकट: हे बदल काळजी वाढवणारे...

ताप नसताना पॉझिटिव

अनेक जणांना ताप नसताना ते पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचे कारण वैद्यकीय अधिकारी सांगतायत कदाचित त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती चांगली असू शकते. वायरसने आपला बदल केला असला तरी एखाद्याच्या शरीरात त्याचा बदल म्हणजे त्याचा टिकाव लागत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे दुर्मिळातील दुर्मिळ रुग्णही डेंग्यूचे अलीकडे आढळून येत आहेत.

चौकट: प्लेटलेट्स कमी नाही तरी पॉझिटिव्ह

रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरही रुग्णांच्या प्लेटलेट्समध्ये घट होत नाही. त्यामुळे हा डेंग्यूचा वेगळा स्ट्रेन चिंतेचा विषय बनला आहे. यावर डॉक्टरही ठोस सांगू शकत नाहीत. आपल्याला कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तपासणी करून घेणे गरजेचे असल्याचे केवळ डॉक्टर सांगतायत.

कोट : डेंग्यूचा नवा व्हायरस जरी बदलत असला तरी आपल्या सातारा जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी आहे. अशा प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण फार कमी आढळून आले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार केल्यामुळे हे सर्व रुग्ण बरे झाले आहेत. मात्र रुग्णांनी आपल्या शरीरात झालेले बदल अवगत करून तत्काळ तपासणी करून घेणे गरजेचे आहे. काही वेळेला ताप किंवा अंगदुखी यासारखे प्रकारही होत नाहीत. पण आतून आपल्या शरीरातून बदल आपल्याला जाणवतात. त्यावेळी मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

डॉक्टर सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा