शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

फसवणुकीचा गुन्हा.. घडतोय पुन्हा-पुन्हा ! : दोन वर्षांत ९० जणांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:57 IST

फसवणुकीचा एक गुन्हा घडल्यानंतर काही तासांत दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांना तपास करताना अक्षरश: नाकीनऊ येत आहे. आॅनलाईनच्या गुन्ह्यांची सूत्रे विशेषत: परराज्यातून हलविली जात असल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे.

दत्ता यादव ।सातारा : फसवणुकीचा एक गुन्हा घडल्यानंतर काही तासांत दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांना तपास करताना अक्षरश: नाकीनऊ येत आहे. आॅनलाईनच्या गुन्ह्यांची सूत्रे विशेषत: परराज्यातून हलविली जात असल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. गेल्या दोन वर्षांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात ९० फसवणुकीचे गुन्हे घडले असून, संबंधितांना सुमारे अडीच कोटींना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे.

मारामारी, चोरी, खून, दरोडा अशा प्रकाच्या गुन्ह्यांचे प्रमाण काही वर्षांपूर्वी सर्वाधिक होते. मात्र, जसा काळ बदलला तसा या गुन्ह्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा समाविष्ट झाला. तो इतका झाला की, बाकीच्या गुन्ह्यांना या गुन्ह्याने मागे टाकले. तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा होत आहे. त्यापेक्षा तोटाच जास्त होत असल्याचे पोलीस डायरीत नोंद असलेल्या फसवणुकीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सध्याचा जमाना हा आॅनलाईन झाला आहे. याचे सर्वसामान्यांना ज्ञान नसल्यामुळे अशा लोकांची फसवणूक होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कर्ज देणे, लॉटरी लागली असल्याचे भासविणे आणि नोकरीच्या आमिषाने फसवणूक होत आहेच; शिवाय तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे, असे सांगूनही पासवर्ड घेतला जात आहे. अशा प्रकारचे गुन्हे घडत असतानाच बँक अकाऊंट हॅक करण्याचे प्रमाणही वाढले असून, हा गुन्हा अत्यंत किचकट आणि आव्हानात्मक आहे. नागरिकांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचे यापूर्वी अनेकदा घडले आहे.

जिल्ह्यात महिन्यातून आठ ते दहा गुन्हे अशा प्रकारचे घडत आहेत. त्यामुळे एका गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांवरील ताण प्रचंड वाढत आहे. गुन्ह्याची व्याप्ती किती आहे, हे ठरवून पोलिसांना तपास करावा लागत आहे. एखाद्याच्या अकाऊंटवरून दहा हजार रुपये गायब झाले अन् आरोपी उत्तरप्रदेशमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दहा हजारांसाठी पोलिसांना उत्तरप्रदेशला जाणे परवडेल का? याचाही विचार केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे कायम तपासावरच राहतात.

अनेकदा रक्कम जास्त असल्यामुळे पोलीस तपासासाठी परराज्यातही जातात. मात्र, त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना तेथील स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. त्यातूनही मिळालेच तर आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याकडून फसवणुकीतील रक्कम वसूल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. तीन-चार दिवस कोठडी मिळाल्यानंतर आरोपी जामिनावर सुटतो. त्यानंतर तो परत महाराष्ट्रात कधीच फिरकत नाही. त्यामुळे ना पोलिसांना समाधान ना ज्याचे पैसे गेलेत त्याला समाधान.प्रत्येकाला शंभर फोनचे टार्गेटलोकांना फोन करून पासवर्ड विचारणारी, बँकेचे खाते हॅक करणारी टोळी ही परराज्यातील असल्याचे अनेकदा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. फोन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेल्या मुलांची नेमणूक केली जाते. प्रत्येक मुलाला शंभर फोन करण्याचे टार्गेट असते. त्यापैकी दहा व्यक्ती तरी आपल्या जाळ्यात ओढल्या जाव्यात, असा त्यांचा अलिखित नियम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनेकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे सिमकार्ड खरेदी केली जात असल्यामुळे याचा तपास लावणे मोठे आव्हान असते.

तालुक्यातील गुन्हेसातारा : १३कोरेगाव : ८वाई : ११कºहाड : १७फलटण : ७पाटण : १३खंडाळा : ९माण : ७म’श्वर : ५

दोन वर्षांत ९० जणांना गंडा : आरोपीला शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हानप्रत्येकाला शंभर फोनचे टार्गेटलोकांना फोन करून पासवर्ड विचारणारी, बँकेचे खाते हॅक करणारी टोळी ही परराज्यातील असल्याचे अनेकदा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. फोन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेल्या मुलांची नेमणूक केली जाते. प्रत्येक मुलाला शंभर फोन करण्याचे टार्गेट असते. त्यापैकी दहा व्यक्ती तरी आपल्या जाळ्यात ओढल्या जाव्यात, असा त्यांचा अलिखित नियम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनेकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे सिमकार्ड खरेदी केली जात असल्यामुळे याचा तपास लावणे मोठे आव्हान असते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरfraudधोकेबाजी