शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

फसवणुकीचा गुन्हा.. घडतोय पुन्हा-पुन्हा ! : दोन वर्षांत ९० जणांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:57 IST

फसवणुकीचा एक गुन्हा घडल्यानंतर काही तासांत दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांना तपास करताना अक्षरश: नाकीनऊ येत आहे. आॅनलाईनच्या गुन्ह्यांची सूत्रे विशेषत: परराज्यातून हलविली जात असल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे.

दत्ता यादव ।सातारा : फसवणुकीचा एक गुन्हा घडल्यानंतर काही तासांत दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांना तपास करताना अक्षरश: नाकीनऊ येत आहे. आॅनलाईनच्या गुन्ह्यांची सूत्रे विशेषत: परराज्यातून हलविली जात असल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण केवळ दोन टक्के आहे. गेल्या दोन वर्षांची आकडेवारी पाहता जिल्ह्यात ९० फसवणुकीचे गुन्हे घडले असून, संबंधितांना सुमारे अडीच कोटींना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे.

मारामारी, चोरी, खून, दरोडा अशा प्रकाच्या गुन्ह्यांचे प्रमाण काही वर्षांपूर्वी सर्वाधिक होते. मात्र, जसा काळ बदलला तसा या गुन्ह्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा समाविष्ट झाला. तो इतका झाला की, बाकीच्या गुन्ह्यांना या गुन्ह्याने मागे टाकले. तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा होत आहे. त्यापेक्षा तोटाच जास्त होत असल्याचे पोलीस डायरीत नोंद असलेल्या फसवणुकीच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. सध्याचा जमाना हा आॅनलाईन झाला आहे. याचे सर्वसामान्यांना ज्ञान नसल्यामुळे अशा लोकांची फसवणूक होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. कर्ज देणे, लॉटरी लागली असल्याचे भासविणे आणि नोकरीच्या आमिषाने फसवणूक होत आहेच; शिवाय तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे, असे सांगूनही पासवर्ड घेतला जात आहे. अशा प्रकारचे गुन्हे घडत असतानाच बँक अकाऊंट हॅक करण्याचे प्रमाणही वाढले असून, हा गुन्हा अत्यंत किचकट आणि आव्हानात्मक आहे. नागरिकांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढल्याचे यापूर्वी अनेकदा घडले आहे.

जिल्ह्यात महिन्यातून आठ ते दहा गुन्हे अशा प्रकारचे घडत आहेत. त्यामुळे एका गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर दुसरा गुन्हा घडत असल्याने पोलिसांवरील ताण प्रचंड वाढत आहे. गुन्ह्याची व्याप्ती किती आहे, हे ठरवून पोलिसांना तपास करावा लागत आहे. एखाद्याच्या अकाऊंटवरून दहा हजार रुपये गायब झाले अन् आरोपी उत्तरप्रदेशमध्ये असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दहा हजारांसाठी पोलिसांना उत्तरप्रदेशला जाणे परवडेल का? याचाही विचार केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे कायम तपासावरच राहतात.

अनेकदा रक्कम जास्त असल्यामुळे पोलीस तपासासाठी परराज्यातही जातात. मात्र, त्या ठिकाणी गेल्यानंतर पोलिसांना तेथील स्थानिक पोलिसांचे सहकार्य मिळत नाही. त्यातूनही मिळालेच तर आरोपीला पकडल्यानंतर त्याच्याकडून फसवणुकीतील रक्कम वसूल करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. तीन-चार दिवस कोठडी मिळाल्यानंतर आरोपी जामिनावर सुटतो. त्यानंतर तो परत महाराष्ट्रात कधीच फिरकत नाही. त्यामुळे ना पोलिसांना समाधान ना ज्याचे पैसे गेलेत त्याला समाधान.प्रत्येकाला शंभर फोनचे टार्गेटलोकांना फोन करून पासवर्ड विचारणारी, बँकेचे खाते हॅक करणारी टोळी ही परराज्यातील असल्याचे अनेकदा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. फोन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेल्या मुलांची नेमणूक केली जाते. प्रत्येक मुलाला शंभर फोन करण्याचे टार्गेट असते. त्यापैकी दहा व्यक्ती तरी आपल्या जाळ्यात ओढल्या जाव्यात, असा त्यांचा अलिखित नियम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनेकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे सिमकार्ड खरेदी केली जात असल्यामुळे याचा तपास लावणे मोठे आव्हान असते.

तालुक्यातील गुन्हेसातारा : १३कोरेगाव : ८वाई : ११कºहाड : १७फलटण : ७पाटण : १३खंडाळा : ९माण : ७म’श्वर : ५

दोन वर्षांत ९० जणांना गंडा : आरोपीला शोधून काढणे पोलिसांसमोर आव्हानप्रत्येकाला शंभर फोनचे टार्गेटलोकांना फोन करून पासवर्ड विचारणारी, बँकेचे खाते हॅक करणारी टोळी ही परराज्यातील असल्याचे अनेकदा पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. फोन करण्यासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेल्या मुलांची नेमणूक केली जाते. प्रत्येक मुलाला शंभर फोन करण्याचे टार्गेट असते. त्यापैकी दहा व्यक्ती तरी आपल्या जाळ्यात ओढल्या जाव्यात, असा त्यांचा अलिखित नियम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अनेकदा मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावे सिमकार्ड खरेदी केली जात असल्यामुळे याचा तपास लावणे मोठे आव्हान असते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरfraudधोकेबाजी