शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करा

By admin | Updated: November 25, 2015 23:58 IST

अश्विन मुदगल : मुकाबल्यासाठी सज्ज राहण्याचे अधिकाऱ्यांना केले आवाहन

सातारा : ‘आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा प्रत्येक विभागाने तयार करून येणाऱ्या आपत्तीच्या मुकाबल्यासाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने येथील नियोजन भवनमध्ये ‘वातावरणातील बदल आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर उद्बोधन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, नगर पालिकांचे जिल्हा प्रशासन अधिकारी किरण यादव आदी उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती आणि उद्बोधन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. माळीणसारख्या दुर्घटना होऊ नयेत, त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्या कार्यशैलीत बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपत्तकालीन २००५ कायदा अंमलात आलेला आहे. आपली तयारी असल्यास आपत्तीपासून होणारे नुकसान निश्चितपणे टाळले जाऊ शकते,’ असेही ते म्हणाले.जिल्हाधिकरी मुदगल म्हणाले, ‘सूत्रबद्धपद्धतीने केली जाणारी उपाययोजना आणि पुनर्वसन हा मोठा विषय आहे. आपत्ती झाल्यानंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी आपली तयारी असणे आवश्यक आहे. मग ती मानवनिर्मित अथवा नैसर्गिक आपत्ती असो.’ आपत्तीचे तीन प्रकार सांगता येतील, असे म्हणून मुदगल पुढे म्हणाले, ‘काळ निश्चित आणि आपत्ती निश्चित यामध्ये पावसाळा या काळामध्ये पूर प्रवणक्षेत्रात पूर येऊ शकतो. डोंगरी भागात कडे कोसळू शकतात, त्या दृष्टीने आपली तयारी पूर्ण करावी लागते. दुसऱ्या प्रकारामध्ये कालावधी निश्चित; परंतु आपत्ती निश्चित नसते. यामध्ये एलनिनोचा समावेश असू शकतो. दर दहा वर्षांनी एलनिनो येणारच. यामध्ये कालावधी निश्चित आहे. परंतु पूर येणार की दुष्काळ पडणार, याबाबत निश्चिती नसते. तिसऱ्या प्रकारामध्ये काळ आणि आपत्ती दोन्हींही अनिश्चित स्वरूपाची असतात. उदाहरणार्थ अवकाळी पाऊस, अपघात.’ (प्रतिनिधी) वातावरणातील बदलामुळे पावसाची अनिश्चितता पुणे येथील आपत्ती व्यवस्थापक केंद्राचे संचालक मिलिंद वैद्य यांनी या कार्यशाळेत वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाची अनिश्चितता, अवेळी पाऊस, गारपीट, ढगफुटी या कारणांमुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई तसेच आर्थिक व सामाजिक नुकसान. आपत्तीमध्ये झालेले नुकसान मूळ पदावर आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व सुरक्षितता याविषयी माहिती दिली.