शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करा

By admin | Updated: November 25, 2015 23:58 IST

अश्विन मुदगल : मुकाबल्यासाठी सज्ज राहण्याचे अधिकाऱ्यांना केले आवाहन

सातारा : ‘आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी तसेच कमी करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा प्रत्येक विभागाने तयार करून येणाऱ्या आपत्तीच्या मुकाबल्यासाठी सज्ज राहावे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने येथील नियोजन भवनमध्ये ‘वातावरणातील बदल आणि आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर उद्बोधन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजीव देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी हणमंत माळी, नगर पालिकांचे जिल्हा प्रशासन अधिकारी किरण यादव आदी उपस्थित होते. सुरुवातीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती आणि उद्बोधन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. माळीणसारख्या दुर्घटना होऊ नयेत, त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्या कार्यशैलीत बदल करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपत्तकालीन २००५ कायदा अंमलात आलेला आहे. आपली तयारी असल्यास आपत्तीपासून होणारे नुकसान निश्चितपणे टाळले जाऊ शकते,’ असेही ते म्हणाले.जिल्हाधिकरी मुदगल म्हणाले, ‘सूत्रबद्धपद्धतीने केली जाणारी उपाययोजना आणि पुनर्वसन हा मोठा विषय आहे. आपत्ती झाल्यानंतर होणारे नुकसान टाळण्यासाठी आपली तयारी असणे आवश्यक आहे. मग ती मानवनिर्मित अथवा नैसर्गिक आपत्ती असो.’ आपत्तीचे तीन प्रकार सांगता येतील, असे म्हणून मुदगल पुढे म्हणाले, ‘काळ निश्चित आणि आपत्ती निश्चित यामध्ये पावसाळा या काळामध्ये पूर प्रवणक्षेत्रात पूर येऊ शकतो. डोंगरी भागात कडे कोसळू शकतात, त्या दृष्टीने आपली तयारी पूर्ण करावी लागते. दुसऱ्या प्रकारामध्ये कालावधी निश्चित; परंतु आपत्ती निश्चित नसते. यामध्ये एलनिनोचा समावेश असू शकतो. दर दहा वर्षांनी एलनिनो येणारच. यामध्ये कालावधी निश्चित आहे. परंतु पूर येणार की दुष्काळ पडणार, याबाबत निश्चिती नसते. तिसऱ्या प्रकारामध्ये काळ आणि आपत्ती दोन्हींही अनिश्चित स्वरूपाची असतात. उदाहरणार्थ अवकाळी पाऊस, अपघात.’ (प्रतिनिधी) वातावरणातील बदलामुळे पावसाची अनिश्चितता पुणे येथील आपत्ती व्यवस्थापक केंद्राचे संचालक मिलिंद वैद्य यांनी या कार्यशाळेत वातावरणात झालेल्या बदलामुळे पावसाची अनिश्चितता, अवेळी पाऊस, गारपीट, ढगफुटी या कारणांमुळे निर्माण झालेली पाणी टंचाई, चारा टंचाई तसेच आर्थिक व सामाजिक नुकसान. आपत्तीमध्ये झालेले नुकसान मूळ पदावर आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व सुरक्षितता याविषयी माहिती दिली.