शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Coronavirus: कोरोनाच्या सावटामुळे पालीची यात्रा साधेपणाने साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2022 20:44 IST

Coronavirus: येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पाल ता.कराड येथे तारळी नदीकाठी  गोरज मुहूर्तावर देवाचे मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा यांच्या मूर्तीचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.

उंब्रज -येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत कोरोना महामारीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशाच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत असलेल्या पाल ता.कराड येथे तारळी नदीकाठी  गोरज मुहूर्तावर देवाचे मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थितीत खंडोबा-म्हाळसा यांच्या मूर्तीचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.एरवी भंडार्यात न्हाहून निघाणारी पालनगरी यंदा भंडार्या विना सुनीसुनी दिसत होती.दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घातलेल्या कडक निर्बंधामुळे पारंपारिक व साध्या पद्धतीने ओपन फुलांनी सजवलेल्या जीप मधून सोबत शिवाजी बुवांचा मानाच्या गाड्यासह देवाचे मानकरी व सेवेकरी यांनी यावर्षी मिरवणूक काढली.

आज विवाह सोहळ्याचा मुख्य दिवस असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवत पालनगरीत येणारे सर्व रस्ते बंद करून बाहेरून येणाऱ्या कोणासही प्रवेश दिला नाही. यात्रेच्या अनुषंगाने पाल नगरीत दि.१४ ते १९ पर्यंत व दि.२३ रोजी देवस्थान ट्रस्ट व पाल गावातील मानकरी सोडुन इतर गावातील, जिल्ह्यातील,इतर राज्यातील भाविकांना दर्शनास मनाई करण्याचे आदेश पारीत करण्यात आले होते.तसेच मंदिर परिसरातील ५ किलोमीटर अंतरावरून नागरिकांना आत येण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आला होता.

दुपारी देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्या घराजवळ गावातील मोजकेच मानकरी उपस्थित होते.त्यानंतर मानकरी देवराज पाटील यांचा चिरंजीव तेजराज पाटील यांनी ग्रामप्रदक्षिणा घालत दुपारी खंडोबा मंदिरात आले. यावेळी तेजराज पाटील यांच्या हस्ते देवाची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मानाच्या गाड्यात देवास बसवून अंधार दरवाजापर्यंत देवाची मिरवणूक काढण्यात आली.अंधार दरवाजाजवळ मिरवणूक आल्यानंतर तेजराज पाटील हे पोटास बांधलेल्या श्री खंडोबा व म्हाळसा या देवतांच्या मुखवट्यासह फुलांनी सजवलेल्या ओपन जीप या वाहनात ४.३० वाजता विराजमान झाले.

त्यानंतर मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी 'येळकोट येळकोट...जय मल्हार, सदानंदाचा येळकोट..'चा गजर भंडारा खोबर्याची उधळन केली.या मिरवणुकीत गावातील सासनकाठ्या, मानाचा  गाडा, फुलांनी सजवलेल्या छत्र्या सहभागी झाल्या होत्या. देवालयातून निघालेली मिरवणूक तारळी नदीत उभारण्यात आलेल्या भराव पुलावरून वाळवंटातून नदीच्या पश्चिमेकडील तीरावर पोहोचली.यावेळी मोजक्याच भाविकांनी भंडारा, खोबऱ्याची उधळण करण्यास सुरूवात केली. मानकरी देवाचे मुखवटे बरोबर घेवून जीपमधून विवाह समारंभासाठी ठराविक वऱ्हाडी मंडळीसमवेत विवाह मंडपाकडे निघाले होते. सायंकाळच्या सुमारास मिरवणूक विवाह मंडपात पोहोचली. मानकऱ्यांनी देवास बोहल्यावर चढविल्यानंतर पारंपारिक पध्दतीने सायंकाळी ५.४० या गोरज मुहूर्तावर श्री खंडोबा व म्हाळसाचा विवाह सोहळा विधीवत पार पडला. यावेळी पुन्हा-पुन्हा 'येळकोट..येळकोट'च्या जयघोषात करण्यात आला.

कोरोना महामारीच्या अनुषंगाने प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे तारळी नदी पात्रात दरवर्षी खचाखच भरणारी यात्रा वाळवंटात मोकळी दिसून येत होती.यात्रा शांततेत व प्रशासनाच्या नियमांचे पालन करून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत व उंब्रज पोलीस ठाणे आणि आरोग्य विभाग सतर्क राहिला होता. यात्रा काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.रणजीत पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रजचे सपोनि अजय गोरड यांनी १० पोलिस अधिकारी,७९ पोलिस कर्मचारी तसेच स्वयंस्फूर्तीने होमगार्ड बंदोबस्तात सहभागी झाले होते.यावेळी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील,प्रांताधिकारी उत्तम दिघे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सभापती प्रणव ताटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर