शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

CoronaVirus Lockdown : बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 16:13 IST

बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय प्रसिद्ध आहे. यावरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; पण कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे, तसेच दररोजची देखभालही परवडत नसल्याने बामणोली परिसरातील बोल मालकांनी बोटी जमिनीवर काढल्या आहेत.

ठळक मुद्दे बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्याआर्थिक संकट ; लॉकडाऊन तसेच दररोजची देखभाल करणे परवडेना

बामणोली : बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय प्रसिद्ध आहे. यावरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; पण कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे, तसेच दररोजची देखभालही परवडत नसल्याने बामणोली परिसरातील बोल मालकांनी बोटी जमिनीवर काढल्या आहेत.यंदाच्या पावसाळ्यात इटली, जपान, स्पेन येथील पर्यटकांनी या भागाला भेट देऊन ह्यअमेझिंग प्लेसह्ण असे येथील निसर्गसौंदर्याचे वर्णन केले होते. येथील हिरवागार निसर्ग व शिवसागर जलाशयाचे मनमोहक दृश्य अनेकांना मोहीत करत असते. जलसफारीसाठी तापोळा, बामणोलीला पाच बोट क्लब आहेत. त्यांच्या मोटर लाँच, स्पीड बोट, पेंडल बोट, रोर्इंग बोट तसेच स्कूटर यांची संख्या हजारोंच्या घरात आहेत.

सध्या या लाँचेसना एकही पर्यटक व प्रवासी मिळत नसल्याने पंधरा दिवसांपासून या बोटी जाग्यावरच पाण्यात बांधलेल्या आहेत. परंतु या बोट मालकांना दररोज नदीकिनारी जाऊन बोटीत येणारे पाणी काढावे लागत आहे. तसेच पाण्याची पातळी सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे दररोज तीन ते चार फुटांनी घटत आहे. त्यामुळे दररोज सकाळी नदी बाहेर कोरड्या जागेत असणारी बोट पाण्यात ढकलावी लागत आहे. त्यामुळे दररोज ही अनावश्यक धडपड करावी लागत आहे. अनेक बोट मालकांनी आपल्या बोटी आतापासूनच पाण्यातून बाहेर काढून कोरड्या पात्रात ओढून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यातच नदीपात्र कोरडे पडले होते. त्यामुळे बोटचालकांचा चार महिन्यांचा व्यवसाय बुडाला होता. परंतु यावर्षी पाणी जास्त असूनही केवळ कोरोना संकटामुळे पर्यटक नाहीत. धंदा नाही, त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज व कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? या चिंतेत बोटमालक आहेत. त्यामुळे बोटी बाहेर काढून ठेवलेल्याच बऱ्या या निर्णयापर्यंत अनेक बोट मालक आले आहेत.

गतवर्षी नदीपात्र कोरडे पडले होते. यंदा नदीत पाणीही जास्त आहे. वासोट्यामुळे धंदाही चांगला होत होता. परंतु लॉकडाऊनमुळे पंधरा दिवस दररोज नदीकाठी जाऊन बोटीतील पाणी काढणे व लाँच पाण्यात ढकलणे एवढेच काम करावे लागत आहे. कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? हाच प्रश्न आहे.- आनंदा भोसले,बोट मालक, मुनावळे, ता. जावळी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरKas Patharकास पठार