शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
3
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
4
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
5
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
6
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
7
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
8
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
9
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
10
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
11
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
12
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
13
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
14
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
15
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
16
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
17
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
18
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
19
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
20
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?

water shortage : सातारा जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:31 IST

गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम खटाव तालुक्यात सुरुवात झाली. सध्या चार तालुक्यांतील ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झालेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरूटंचाईला प्रारंभ : चार तालुक्यांत सहा टँकर; गतवर्षी १८९

सातारा : गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम खटाव तालुक्यात सुरुवात झाली. सध्या चार तालुक्यांतील ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झालेत.जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. सुरुवातीला मान्सूनचा, त्यानंतर परतीचा तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला. म्हणजे एकणूच पाच महिने पाऊस जिल्ह्यात होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव पूर्ण भरून वाहिले. दुष्काळी भागातही पावसामुळे दैना उडाली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईला उशिरा सुरुवात झाली आहे.दरवर्षी जिल्ह्यात जानेवारीपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असते; पण आता एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यात टँकर सुरू झालेत. जिल्ह्यात सुरुवातीला खटाव तालुक्यात १४ एप्रिलला टँकर सुरू झाला. गारवडी (आवळे पठार) येथे हा टँकर सुरू झाला आहे. यावर १४९ ग्रामस्थ आणि १०५ पशुधन अवलंबून आहे. यानंतर पाटण, वाई आणि माण तालुक्यात टँकर सुरू झाले.माण तालुक्यातील एक गाव आणि पाच वाड्यांसाठी एक टँकर सुरू आहे. यावर एक हजार लोक अवलंबून आहेत. हा टँकर मलवडी सर्कलमधील वारुगडसाठी सुरू झाला आहे. वाई तालुक्यातही मांढरदेवसाठी एक टँकर सुरू करण्यात आला आहे.

यावर १ हजार ४५५ ग्रामस्थ आणि ४५३ पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरी, अंब्रुळकरवाडी (भोसगाव) व चव्हाणवाडी (नाणेगाव), शिद्रुकवाडी, शिद्रुकवाडी वरची या गावांसाठी टँकर सुरू करण्यात आला आहे. पाटणमध्ये दान गावे चार वाड्यांसाठी तीन टँकर आहेत. यावर २ हजार ३०२ ग्रामस्थ आणि १ हजार ७४ पशुधन अवलंबून आहे.जिल्ह्यात सध्या ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झाले आहेत. यावर ४ हजार ८६१ ग्रामस्थ आणि १ हजार ६३२ पशुधन अवलंबून आहेत. आगामी काळात टँकरची संख्या वाढणार आहे. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.गतवर्षी तीन लाख लोकांना पाणीपुरवठा२०१८ मध्ये पाऊस कमी झाला होता. त्यामुळे २०१९ मध्ये टंचाईची स्थिती तीव्र होती. दुष्काळामुळे गावोगावी पाणीपुरवठा करावा लागत होता. यामधून एकही तालुका सुटलेला नव्हता. गतवर्षी २१ एप्रिलला जिल्ह्यात १८९ टँकर सुरू होते.

यामाध्यमातून १६० गावे आणि ७३३ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. तर ३ लाख ३ हजार नागरिक आणि १ लाख १५ हजार पशुधनाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी सर्वाधित गावे आणि लोकसंख्या ही माण तालुक्यात होती. गतवर्षी २१ एप्रिल रोजी माणमध्ये ९५ टँकर सुरू होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर