शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

water shortage : सातारा जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:31 IST

गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम खटाव तालुक्यात सुरुवात झाली. सध्या चार तालुक्यांतील ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झालेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरूटंचाईला प्रारंभ : चार तालुक्यांत सहा टँकर; गतवर्षी १८९

सातारा : गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम खटाव तालुक्यात सुरुवात झाली. सध्या चार तालुक्यांतील ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झालेत.जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. सुरुवातीला मान्सूनचा, त्यानंतर परतीचा तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला. म्हणजे एकणूच पाच महिने पाऊस जिल्ह्यात होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव पूर्ण भरून वाहिले. दुष्काळी भागातही पावसामुळे दैना उडाली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईला उशिरा सुरुवात झाली आहे.दरवर्षी जिल्ह्यात जानेवारीपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असते; पण आता एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यात टँकर सुरू झालेत. जिल्ह्यात सुरुवातीला खटाव तालुक्यात १४ एप्रिलला टँकर सुरू झाला. गारवडी (आवळे पठार) येथे हा टँकर सुरू झाला आहे. यावर १४९ ग्रामस्थ आणि १०५ पशुधन अवलंबून आहे. यानंतर पाटण, वाई आणि माण तालुक्यात टँकर सुरू झाले.माण तालुक्यातील एक गाव आणि पाच वाड्यांसाठी एक टँकर सुरू आहे. यावर एक हजार लोक अवलंबून आहेत. हा टँकर मलवडी सर्कलमधील वारुगडसाठी सुरू झाला आहे. वाई तालुक्यातही मांढरदेवसाठी एक टँकर सुरू करण्यात आला आहे.

यावर १ हजार ४५५ ग्रामस्थ आणि ४५३ पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरी, अंब्रुळकरवाडी (भोसगाव) व चव्हाणवाडी (नाणेगाव), शिद्रुकवाडी, शिद्रुकवाडी वरची या गावांसाठी टँकर सुरू करण्यात आला आहे. पाटणमध्ये दान गावे चार वाड्यांसाठी तीन टँकर आहेत. यावर २ हजार ३०२ ग्रामस्थ आणि १ हजार ७४ पशुधन अवलंबून आहे.जिल्ह्यात सध्या ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झाले आहेत. यावर ४ हजार ८६१ ग्रामस्थ आणि १ हजार ६३२ पशुधन अवलंबून आहेत. आगामी काळात टँकरची संख्या वाढणार आहे. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.गतवर्षी तीन लाख लोकांना पाणीपुरवठा२०१८ मध्ये पाऊस कमी झाला होता. त्यामुळे २०१९ मध्ये टंचाईची स्थिती तीव्र होती. दुष्काळामुळे गावोगावी पाणीपुरवठा करावा लागत होता. यामधून एकही तालुका सुटलेला नव्हता. गतवर्षी २१ एप्रिलला जिल्ह्यात १८९ टँकर सुरू होते.

यामाध्यमातून १६० गावे आणि ७३३ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. तर ३ लाख ३ हजार नागरिक आणि १ लाख १५ हजार पशुधनाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी सर्वाधित गावे आणि लोकसंख्या ही माण तालुक्यात होती. गतवर्षी २१ एप्रिल रोजी माणमध्ये ९५ टँकर सुरू होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर