शहरं
Join us  
Trending Stories
1
संरक्षण करारानंतर सौदी अरेबियाची पाकिस्तानला आणखी एक मोठी भेट; ३० लाख लोकांना रोजगार मिळणार
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
भारतीय नौदलाची ताकद वाढणार! आज अँड्रोथ युद्धनौका मिळणार, जाणून काय आहे खास?
4
Mumbai Accident: दादरमध्ये अपघात, 'बेस्ट बस'ला टेम्पो ट्रॅव्हलरची धडक; एक ठार, चार जखमी
5
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
6
Indian shot dead: "मित्रा, तू बरा आहेस ना?" मदतीसाठी आलेल्या भारतीय व्यक्तीचीच गोळी घालून हत्या
7
VIRAL : 'सर डोकं दुखतंय...', कर्मचारी आजारी तरीही मॅनेजर सुट्टी देईना! संतापलेल्या तरुणानं काय केलं बघाच  
8
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
9
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
10
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
11
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
12
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
13
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
14
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
15
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
16
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
17
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
18
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
19
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
20
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत

water shortage : सातारा जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 12:31 IST

गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम खटाव तालुक्यात सुरुवात झाली. सध्या चार तालुक्यांतील ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झालेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरूटंचाईला प्रारंभ : चार तालुक्यांत सहा टँकर; गतवर्षी १८९

सातारा : गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम खटाव तालुक्यात सुरुवात झाली. सध्या चार तालुक्यांतील ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झालेत.जिल्ह्यात गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडला. सुरुवातीला मान्सूनचा, त्यानंतर परतीचा तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाला. म्हणजे एकणूच पाच महिने पाऊस जिल्ह्यात होता. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, तलाव पूर्ण भरून वाहिले. दुष्काळी भागातही पावसामुळे दैना उडाली होती. त्यामुळे यावर्षी टंचाईला उशिरा सुरुवात झाली आहे.दरवर्षी जिल्ह्यात जानेवारीपासूनच टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी होत असते; पण आता एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यात टँकर सुरू झालेत. जिल्ह्यात सुरुवातीला खटाव तालुक्यात १४ एप्रिलला टँकर सुरू झाला. गारवडी (आवळे पठार) येथे हा टँकर सुरू झाला आहे. यावर १४९ ग्रामस्थ आणि १०५ पशुधन अवलंबून आहे. यानंतर पाटण, वाई आणि माण तालुक्यात टँकर सुरू झाले.माण तालुक्यातील एक गाव आणि पाच वाड्यांसाठी एक टँकर सुरू आहे. यावर एक हजार लोक अवलंबून आहेत. हा टँकर मलवडी सर्कलमधील वारुगडसाठी सुरू झाला आहे. वाई तालुक्यातही मांढरदेवसाठी एक टँकर सुरू करण्यात आला आहे.

यावर १ हजार ४५५ ग्रामस्थ आणि ४५३ पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरी, अंब्रुळकरवाडी (भोसगाव) व चव्हाणवाडी (नाणेगाव), शिद्रुकवाडी, शिद्रुकवाडी वरची या गावांसाठी टँकर सुरू करण्यात आला आहे. पाटणमध्ये दान गावे चार वाड्यांसाठी तीन टँकर आहेत. यावर २ हजार ३०२ ग्रामस्थ आणि १ हजार ७४ पशुधन अवलंबून आहे.जिल्ह्यात सध्या ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झाले आहेत. यावर ४ हजार ८६१ ग्रामस्थ आणि १ हजार ६३२ पशुधन अवलंबून आहेत. आगामी काळात टँकरची संख्या वाढणार आहे. ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये त्यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे.गतवर्षी तीन लाख लोकांना पाणीपुरवठा२०१८ मध्ये पाऊस कमी झाला होता. त्यामुळे २०१९ मध्ये टंचाईची स्थिती तीव्र होती. दुष्काळामुळे गावोगावी पाणीपुरवठा करावा लागत होता. यामधून एकही तालुका सुटलेला नव्हता. गतवर्षी २१ एप्रिलला जिल्ह्यात १८९ टँकर सुरू होते.

यामाध्यमातून १६० गावे आणि ७३३ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात होता. तर ३ लाख ३ हजार नागरिक आणि १ लाख १५ हजार पशुधनाला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यावेळी सर्वाधित गावे आणि लोकसंख्या ही माण तालुक्यात होती. गतवर्षी २१ एप्रिल रोजी माणमध्ये ९५ टँकर सुरू होते.

टॅग्स :water shortageपाणीकपातSatara areaसातारा परिसर