शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

CoronaVirus Lockdown : निर्यात होणारी फळं लॉकडाऊनमुळे शेतात कुजली, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:48 IST

नसीर शिकलगार फलटण : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असताना तीन महिन्यांपासून बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देनिर्यात होणारी फळं लॉकडाऊनमुळे शेतात कुजली, शेतकऱ्यांचे नुकसान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यापासून फटका

नसीर शिकलगारफलटण : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असताना तीन महिन्यांपासून बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला उठाव नाही. फळे व भाजीपाला अक्षरश: रानात सोडून द्यावा लागला आहे. अशा परिस्थितीत फलटण पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पवारवाडी येथील शेतकरी सचिन ऊर्फ बाबा वरे यांच्या कलिंगड व टरबूज तर आसू येथील शिवाजीराव शेडगे यांच्या कोबी पिकाचे नुकसान झाले आहे. गोखळी, पवारवाडी, मुंजवडी येथील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. बाबा वरे या युवकाने जानेवारीत ८० गुंठ्यात आठ प्रकारच्या कलिंगड व टरबुजाची लागवड केली.

दोन एकरांत लागवड करून दोन लाख रुपये खर्च केला. २२ मार्च रोजी ही फळे तोडणीला आली अन् कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊन केला. त्यामुळे त्यांना देशी-विदेशी बाजारपेठ मिळू शकली नाही.बांधावर विक्री करूनही भांडवलही निघाले नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. खचून न जाता लॉकडाऊन जूनमध्ये उठेल, अशा आशेने आणि किमान भांडवल तरी मिळावे, या उद्देशाने त्यांनी त्याच गादी वाफ्यावर पुन्हा कलिंगडाची लागवड केली.

जूनमध्येही लॉकडाऊन उठले नसल्याने पुन्हा बाजारपेठेअभावी घोर निराशा झाली. सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचे वरे सांगतात. यावेळेस मात्र त्यांनी ग्रामीण भागाबरोबरच बारामती, फलटण शहरातील चौकाचौकात फळे विकण्याचा संकल्प केला आणि त्याची सुरुवातही तीन दिवसांपासून केली आहे. परंतु आधुनिक पद्धतीच्या या कलिंगडाला ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळत नाही.आसूचे शिवाजीराव शेडगे यांनी उसाच्या एक एकरात आंतरपीक म्हणून कोबीचे पीक घेतले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्याही कोबीला बाजारपेठेअभावी उठाव मिळाला नाही. परिणामी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेडगे यांनीही संपूर्ण एक एकराचा प्लॉट रोटर करून जमिनीत गाडला. त्यांचेही सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव शेडगे यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरfruitsफळे