शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

CoronaVirus Lockdown : निर्यात होणारी फळं लॉकडाऊनमुळे शेतात कुजली, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:48 IST

नसीर शिकलगार फलटण : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असताना तीन महिन्यांपासून बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देनिर्यात होणारी फळं लॉकडाऊनमुळे शेतात कुजली, शेतकऱ्यांचे नुकसान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यापासून फटका

नसीर शिकलगारफलटण : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असताना तीन महिन्यांपासून बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला उठाव नाही. फळे व भाजीपाला अक्षरश: रानात सोडून द्यावा लागला आहे. अशा परिस्थितीत फलटण पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पवारवाडी येथील शेतकरी सचिन ऊर्फ बाबा वरे यांच्या कलिंगड व टरबूज तर आसू येथील शिवाजीराव शेडगे यांच्या कोबी पिकाचे नुकसान झाले आहे. गोखळी, पवारवाडी, मुंजवडी येथील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. बाबा वरे या युवकाने जानेवारीत ८० गुंठ्यात आठ प्रकारच्या कलिंगड व टरबुजाची लागवड केली.

दोन एकरांत लागवड करून दोन लाख रुपये खर्च केला. २२ मार्च रोजी ही फळे तोडणीला आली अन् कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊन केला. त्यामुळे त्यांना देशी-विदेशी बाजारपेठ मिळू शकली नाही.बांधावर विक्री करूनही भांडवलही निघाले नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. खचून न जाता लॉकडाऊन जूनमध्ये उठेल, अशा आशेने आणि किमान भांडवल तरी मिळावे, या उद्देशाने त्यांनी त्याच गादी वाफ्यावर पुन्हा कलिंगडाची लागवड केली.

जूनमध्येही लॉकडाऊन उठले नसल्याने पुन्हा बाजारपेठेअभावी घोर निराशा झाली. सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचे वरे सांगतात. यावेळेस मात्र त्यांनी ग्रामीण भागाबरोबरच बारामती, फलटण शहरातील चौकाचौकात फळे विकण्याचा संकल्प केला आणि त्याची सुरुवातही तीन दिवसांपासून केली आहे. परंतु आधुनिक पद्धतीच्या या कलिंगडाला ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळत नाही.आसूचे शिवाजीराव शेडगे यांनी उसाच्या एक एकरात आंतरपीक म्हणून कोबीचे पीक घेतले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्याही कोबीला बाजारपेठेअभावी उठाव मिळाला नाही. परिणामी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेडगे यांनीही संपूर्ण एक एकराचा प्लॉट रोटर करून जमिनीत गाडला. त्यांचेही सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव शेडगे यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरfruitsफळे