शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : निर्यात होणारी फळं लॉकडाऊनमुळे शेतात कुजली, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:48 IST

नसीर शिकलगार फलटण : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असताना तीन महिन्यांपासून बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांच्या ...

ठळक मुद्देनिर्यात होणारी फळं लॉकडाऊनमुळे शेतात कुजली, शेतकऱ्यांचे नुकसान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर केल्यापासून फटका

नसीर शिकलगारफलटण : कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन झाला असताना तीन महिन्यांपासून बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे बाजारपेठेमुळे शेतकऱ्यांच्या कुठल्याही मालाला उठाव नाही. फळे व भाजीपाला अक्षरश: रानात सोडून द्यावा लागला आहे. अशा परिस्थितीत फलटण पूर्व भागातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.पवारवाडी येथील शेतकरी सचिन ऊर्फ बाबा वरे यांच्या कलिंगड व टरबूज तर आसू येथील शिवाजीराव शेडगे यांच्या कोबी पिकाचे नुकसान झाले आहे. गोखळी, पवारवाडी, मुंजवडी येथील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. बाबा वरे या युवकाने जानेवारीत ८० गुंठ्यात आठ प्रकारच्या कलिंगड व टरबुजाची लागवड केली.

दोन एकरांत लागवड करून दोन लाख रुपये खर्च केला. २२ मार्च रोजी ही फळे तोडणीला आली अन् कोरोनाच्या संकटामुळे देश लॉकडाऊन केला. त्यामुळे त्यांना देशी-विदेशी बाजारपेठ मिळू शकली नाही.बांधावर विक्री करूनही भांडवलही निघाले नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. खचून न जाता लॉकडाऊन जूनमध्ये उठेल, अशा आशेने आणि किमान भांडवल तरी मिळावे, या उद्देशाने त्यांनी त्याच गादी वाफ्यावर पुन्हा कलिंगडाची लागवड केली.

जूनमध्येही लॉकडाऊन उठले नसल्याने पुन्हा बाजारपेठेअभावी घोर निराशा झाली. सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचे वरे सांगतात. यावेळेस मात्र त्यांनी ग्रामीण भागाबरोबरच बारामती, फलटण शहरातील चौकाचौकात फळे विकण्याचा संकल्प केला आणि त्याची सुरुवातही तीन दिवसांपासून केली आहे. परंतु आधुनिक पद्धतीच्या या कलिंगडाला ग्रामीण भागात फारसा प्रतिसाद मिळत नाही.आसूचे शिवाजीराव शेडगे यांनी उसाच्या एक एकरात आंतरपीक म्हणून कोबीचे पीक घेतले आहे. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्याही कोबीला बाजारपेठेअभावी उठाव मिळाला नाही. परिणामी उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेडगे यांनीही संपूर्ण एक एकराचा प्लॉट रोटर करून जमिनीत गाडला. त्यांचेही सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेअभावी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव शेडगे यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरfruitsफळे