शहरं
Join us  
Trending Stories
1
मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?
2
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
5
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
6
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
7
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
8
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
9
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
10
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
11
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
13
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
14
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
15
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
16
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
17
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
18
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
19
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित रुग्णांचा गावात बिनधास्त वावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे विभागात कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशन असतानाही बिनधास्त गावातून फिरताना दिसत आहेत. बाधितांचे नाव आरोग्य ...

कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कोळे विभागात कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशन असतानाही बिनधास्त गावातून फिरताना दिसत आहेत. बाधितांचे नाव आरोग्य विभागाकडून गोपनीय ठेवण्यात येत असल्याने नेमके बाधित कोण हे ओळखणे लोकांना कठीण झाले आहे. परिणामी बाधितांच्या संपर्कात आल्याने ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करणे प्रशासनासमोर आव्हान आहे.

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात दिसू लागली आहे. बाधितांचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासनाकडून कडक लॉकडाऊन अवलंबून शहरांमधील संख्या कमी करण्यास यश आले आहे. मात्र, ग्रामीण भागात प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाल्याचे परिणाम म्हणूनच गावागावांतून दररोज रुग्ण वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामीण भागात शेती मुख्य व्यवसाय असल्याने सध्या शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. त्यासाठी बरीच शिथिलता दिली गेले आहे. किंबहुना खरीप हंगामासाठी शिथिलता असणे आवश्यक आहे. मात्र, या शिथिलतेचा कोरोना पॉझिटिव्ह असलेले रुग्ण गैरफायदा उठवत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह असणारे रुग्ण घर सोडून बाहेर फिरताना दिसत आहेत. प्रत्येक गावात हीच परिस्थिती आहे. युवक वर्गाला कोणतेही गांभीर्य दिसून येत नाही. दुचाकीवरून विनाकारण प्रवास करत आहेत.

(चौकट)

बाधितांची नावे सोशल मीडियावर टाका..

ग्रामीण भागात बाधित रुग्ण गावातून बिनधास्त फिरत असल्याने नेमके बाधित कोण हे लवकर लक्षात येत नाही. परिणामी गावोगावी असणाऱ्या व्हाॅट्सअॅप ग्रुपवर गावच्या रुग्णांची यादी प्रसारित करण्याची परवानगी प्रशासनाने देणे गरजेचे आहे. कोरोनाबाधित रुग्णांची नावे गोपनीय ठेवण्याचे धोरण प्रशासनाने अवलंबले असल्याने ग्रामीण भागात रुग्णवाढ होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

(चौकट)

वाड्या-वस्त्यांवर कोरोनाचा विळखा..

आरोग्य यंत्रणेकडून प्रत्येक गावच्या दक्षता कमिटी, सरपंच, पोलीस पाटील यांना या रुग्णांची माहिती दिली जाते; परंतु ती गोपनीय असल्याकारणाने सार्वजनिक करता येत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण इतर लोकांच्या लक्षात येत नाहीत. एखाद्या वस्तीवर रुग्ण सापडला तर गोपनीय कारणामुळे शेजारी राहणाऱ्या कुटुंबांनाही समजत नाही. शिवाय रुग्णही आपण बाधित आहोत, त्याचं गांभीर्य बाळगत नाहीत. परिणामी ग्रामीण भागामध्ये वाड्या-वस्त्यावर रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. तरी प्रशासनाने ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.