शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

वाहून गेलेला बंधारा पंधरा दिवसांपासून पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 17:16 IST

dam, satara, farmar मराठानगर (गुंडेवाडी) येथे येरळानदी पात्रामध्ये २०१२ मध्ये बांधलेल्या बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी हा बंधारा वाहून गेल्याने या परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे. दरम्यान, संबंधित विभागाने याचा पंचनामा केला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

ठळक मुद्देवाहून गेलेला बंधारा पंधरा दिवसांपासून पंचनाम्याच्या प्रतीक्षेतमराठानगर गावांचा शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

मायणी : मराठानगर (गुंडेवाडी) येथे येरळानदी पात्रामध्ये २०१२ मध्ये बांधलेल्या बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी हा बंधारा वाहून गेल्याने या परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे. दरम्यान, संबंधित विभागाने याचा पंचनामा केला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी की, मराठानगर (गुंडेवाडी) येथील शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी येरळा नदीवर २०१२ मध्ये बंधारा बांधण्यात आला होता.

पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाणी साठ्यात नसल्याने हे पाणी उन्हाळ्यामध्ये बंधाऱ्यात राहत नसल्याने गावातील ग्रामस्थांनी संबंधित लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरुन बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवून घेतली होती.गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे येरळा नदीपात्रात असलेला बंधारा १६ सप्टेंबर रोजी वाहून गेला. नदीपात्रातून सध्या पाणी वाहत असूनही बंधारा नसल्याने पाणीसाठा होत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये व येणाऱ्या उन्हाळ्यात या परिसरातील शेतीपाणी प्रश्न व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.

बंधारा वाहून गेल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कोणीही संबंधित अधिकारी या बंधाऱ्याच्या पंचनामा करण्यासाठी फिरकला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.शेकडो बागायती क्षेत्र अडचणीतयेरळा नदी पात्रात असलेल्या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेकडो एकर क्षेत्र बागायत झाले आहे. तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला होता. मात्र हा बंधारा वाहून गेल्याने हे दोन्ही प्रश्न गंभीर झाले आहेत.

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर