शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

कोरोना बाधित अन् मृतांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाचा कहर सुरू होता. मात्र, त्यानंतर टप्प्याटप्प्याने बाधित आणि मृतांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाचा कहर सुरू होता. मात्र, त्यानंतर टप्प्याटप्प्याने बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी झाले. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात बाधित अन् मृतांचे प्रमाण अर्ध्यावर आले. १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली, तर २६ जणांचा बळी गेला. त्याचबरोबर ९७९ जणांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. सुरुवातीला कोरोना बाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २० तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोना बाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यात तर कोरोनाने कहर केला. कधी ६००, ७०० तर कधी ८०० च्यावर कोरोना बाधित सापडू लागले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३७ हजार पार झाला. तसेच मृत्यमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढली. असे असले तरी ऑक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले.

नोव्हेंबर महिना दिलासादायक ठरला. ऑक्टोबरच्या तुलनेत निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. या महिन्यात अवघे ४ हजार ४५० बाधित निष्पन्न झाले, तर ६ हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला आहे. डिसेंबरमध्ये हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३ हजार ५५२ वाढले, तर ३ हजार ३१२ जण मुक्त झाले. ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.

जानेवारी महिन्यात तर डिसेंबरच्या तुलनेत प्रमाण अर्ध्यावर आले. नवीन १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. असे असले तरी कोरोनामुक्त कमी झाले. ९७९ जण बरे झाले आहेत.

चौकट :

जिल्ह्यात ५४ हजार जणांची कोरोनावर मात

जिल्ह्यात आतापर्यंत ५६ हजार ६०२ कोरोनाचे रुग्ण स्पष्ट झाले आहेत, तर ५४ हजार ५१ जणांनी कोरोनावर मात केली. त्याचबरोबर १ हजार ८४९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या बाधित अन् मृतांचे प्रमाण कमी झाले आहे.

कोट :

जिल्ह्यातील कोरोना बाधित संख्या कमी झाली आहे. ही बाब सुखावह आहे. तरीही गाफील राहून चालणार नाही. यापुढेही लोकांनी शासकीय नियमांचे पालन करावे. तरच कोरोनावर आपल्याला पूर्णपणे मात करणे शक्य होईल.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

\\\\\\\\\\\\\\\\\\\