शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
2
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
3
जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श करण्यासाठी वाकले..., पाटणा विमानतळावरील 'आदराचं' अद्भुत दृश्य - Video
4
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
5
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
6
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
7
IND vs SA: शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल बॅटिंग कोचने दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
8
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
9
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
10
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
11
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
12
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
13
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
14
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
15
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
16
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
17
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
18
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
19
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
20
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ठणठणीत असलेल्या अनेकांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या आप्तांसह मित्रपरिवारात अचानक झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोविडच्या दुसऱ्या लाटेत ठणठणीत असलेल्या अनेकांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या आप्तांसह मित्रपरिवारात अचानक झालेल्या एक्झिटने खबरदारीचा उपाय म्हणून अनेकांनी मृत्यूुपत्र तयार केले आहे. जगलो तर सोबत ठेवू आणि गेलोच तर कुटुंबाला दिशा देऊन जाऊ, हा त्यामागचा उद्देश!

सातारा जिल्ह्यात कोरोना संकटाने भयावह रूप धारण केले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोविड मृत्यूचा दर अधिक असल्याने अनेकांना आयुष्याविषयी प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. हिंदू कायद्यानुसार भारतीयांना त्यांच्या मृत्यूपूर्वी मृत्युपत्र किंवा वारसदार ठरविण्याचे तसेच संपत्ती वाटपाचे अधिकार आहेत. आपल्या पश्चात संपत्तीवरून कुटुंबात कटुता येऊ नये, या उद्देशाने पूर्वी सेवानिवृत्तीनंतर किंवा ६० वर्षांनंतर मृत्युपत्र करण्यात येत होती. कोरोनामुळे सर्वांनाच अकाली मृत्यूची भीती वाटत आहे. त्यामुळे श्रीमंतांसह मध्यमवर्गीयही मृत्युपत्र तयार करून ठेवत आहेत.

कोरोनामुळे अशाश्वत जगणं आणि अकाली मृत्यूची भीती अनेकांच्या मनात वाढली आहे. त्यामुळे सुशिक्षित व समजूतदार नागरिक त्यांच्या संपत्तीची विभागणी करून हयातीतच याबाबत स्पष्टता ठेवत आहेत. विशेष म्हणजे मृत्युपत्र तयार केल्यानंतर त्याची माहिती कुटुंबीयांनाही देण्यात येते.

या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.

१) तीन बॉक्स

१ आपण कष्टाने कमावलेली इस्टेट आपल्या जवळच्या व्यक्तीला मिळावी ही प्रत्येकाचीच इच्छा असते. ती भलत्याच व्यक्तीने गिळंकृत करू नये, या हेतूने मृत्युपत्र केले आहे.

२ कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. माणसाच्या जिवाची खात्री राहिलेली नाही. अनेक कुटुंबेच्या कुटुंबे कोरोनाने गिळंकृत केली. आपलादेखील काही भरोसा नाही, हे लक्षात आल्याने पत्नीच्या नावावर मृत्युपत्र केले.

३ माझ्या पुण्यातील एका मित्राचं संपूर्ण कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं. तो स्वतः, त्याची पत्नी आणि मोठा मुलगा मृत्युमुखी पडले. आता त्यांचा सर्वात लहान मुलगा आहे, अजूनही सज्ञान नाही. तो सज्ञान होईपर्यंत आम्हालाच त्याच्या इस्टेटीबाबत काळजी लागून राहिली आहे.

२) दोन वकिलांचे कोट्‌स

कोट.

कोरोनामुळे जीवनामध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. बहुतांश लोक आरोग्य आणि आर्थिक चिंतेने ग्रासलेले आहेत. आपल्यानंतर मागे काय होईल, ही भीतीदेखील वाटत असल्याने मिळकतीमध्ये वाद नको म्हणून लोक मृत्युपत्र करून घेत आहेत.

-अॅड. विकास उथळे

कोट..

मृत्युपत्र हे माणूस जिवंत आहे, तोपर्यंत केवळ कागद असते. माणूस जिवंत असताना कुठल्याही वेळी ते बदलू शकतो. मुलांनी चांगला सांभाळ करावा या हेतूने देखील लोक मृत्युपत्र करतात. भविष्यामध्ये प्रॉपर्टीवरून वाद होऊ नयेत, या हेतूने लोक मृत्युपत्र करू लागले आहेत.

अॅड. धनाजी शेलार

३) दुपटीने संख्या वाढली (बॉक्स)

कोरोनाआधी महिन्याकाठी मृत्युपत्र नोटरी करणाऱ्यांची संख्या ४० इतकी होती. आता मार्च २०२१ च्या आकडेवारीनुसार ती ७३ वर पोचली आहे.