शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना आणि सामाजिक संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:37 IST

जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना आणखीनच तीव्र स्वरूप धारण करीत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र स्वरूपाची आहे. दोन हजारांच्या ...

जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून कोरोना आणखीनच तीव्र स्वरूप धारण करीत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र स्वरूपाची आहे. दोन हजारांच्या घरात रुग्ण रोज वाढत आहेत. साखळी कशी तोडायची हे प्रशासनासमोर आव्हान असले तरी केवळ कोरोना बाधित आणि आरोग्य विभाग एवढ्यावर हा प्रश्न मिटत नाही. वाढत्या रुग्ण संख्येबरोबर अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. बाधित रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी बेड अपुरे पडत आहेत. ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांना रात्रीचा दिवस करावा लागतोय. घरात एकटेच ज्येष्ठ नागरिक असतील किंवा मर्यादित कुटुंब व्यवस्थेतील नवरा-बायको दोघेही बाधित असतील तर अशावेळी इंजेक्शन कोण पुरविणार ही अडचण निर्माण होते. प्रशासन सर्वच पातळीवर पुरेल अशी अपेक्षाही ठेवणे योग्य नाही. तेव्हा सामाजिक संघटनांनी स्वतःचे नेटवर्क तयार केले तर या रुग्णांना वेळीच योग्य मदत मिळण्यास मदत होऊ शकते.

बदलत्या काळानुसार कुटुंबे छोटी होत गेली आहेत. पती, पत्नी दोघे बाधित असतील तर त्यांच्या लहान मुलांचे काय करायचे? त्यांचा खाण्यापिण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेकांचे नातेवाईक दूर जिल्ह्यात असतील तर जोडपे अनेकदा धोका पत्करून बाळाला जवळ ठेवतात. बाधित आई-वडील बेडरूममध्ये तर लहान मुले हॉलमध्ये थांबत आहेत. आईबाप आणि मुलांमधील सर्वांना दुःखदायक असते. मुलांना हॉलमध्येच सात-आठ दिवस ठेवण्याची वेळ येत आहे. अशा आई-वडिलांना कोरोनापेक्षा मुलांचा विरह आणि त्यांचे हाल याचा जास्त त्रास होतो. अशा संकटात सामाजिक संघटनांनी महाविद्यालयीन तरुणींची मदत घेऊन काही दिवसांसाठी मुलांचे पालकत्व स्वीकारले तर आई-वडिलांचा निम्मा आजार कुठल्या कुठे पळून जाईल आणि त्यावर मात करणे सोपे जाणार आहे.

ग्रामीण भागातून अनेकदा रुग्णांसोबत नातेवाईक येतात. रुग्णाच्या खाण्यापिण्याची सोय दवाखान्यातून होते. मात्र, नातेवाईकांच्या पोटाचे हाल होतात. बाहेर लाॅकडाऊन असल्याने हॉटेलमध्ये जेवता येत नाही. अशा प्रसंगी साताऱ्यातील रोटरी क्लब, देवस्थान ट्रस्टनी पुढाकार घेऊन अन्नदानाचा उपक्रम राबविल्याची गरज आहे.

चौकट

समुपदेशनातून मानसिक आधार

वर्षभरापासून सातत्याने लॉकडाऊन होत आहे. यामुळे अनेक उद्योगधंदे अडचणीत आले आहेत. सरकारी नोकरदार सोडले तर खासगी क्षेत्रातील सर्वांच्याच डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. माझे, माझ्या कुटुंबाचे भविष्यात काय होईल, ही चिंता प्रत्येकाला सतावत आहे. त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशकांची फळी तयार होणे गरजेचे आहे. अशा बेरोजगार तरुणांचे समुपदेशन करून त्यांच्यात पॉझिटिव्हिटी तयार करण्याची गरज आहे.