शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
2
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
3
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
4
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
5
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
6
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
7
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
8
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
9
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
10
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
11
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
12
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
13
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
14
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
15
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
16
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
17
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल
18
राजा रघुवंशीची हत्या, सोनम झालेली बेपत्ता; एकाच वेळी १२० पोलीस करत होते 'ऑपरेशन हनिमून'!
19
सॉफ्टवेअर इंजिनिअर झटक्यात कोडिंग करायला गेले अन् चॅटजीपीटी बंद पडले! भारतीय युजर वैतागले 
20
CM फडणवीसांची नितेश राणेंना कठोर शब्दांत समज; म्हणाले, “तुमच्या मनात काही असले तरी...”

काँग्रेस अपयश झटकणार; स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी! 

By नितीन काळेल | Updated: December 9, 2024 21:57 IST

जिल्हास्तरावर लवकरच बैठक : जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार!

सातारा : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच महाविकास आघाडीलाही जिल्ह्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत आत्मविश्वास भरण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी लवकरच जिल्हास्तरावर पक्षाची बैठक घेऊन जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीबाबत रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

सातारा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. येथील आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवरही काँग्रेसचाच वरचष्मा; पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेसची वज्रमूठ ढिली झाली. बहुतांशी नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साथ दिली. त्यामुळे सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरला; पण राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला भाजपने पाच वर्षांत भगदाडे पाडली. तर आताच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वर्चस्वाला महायुतीने उद्ध्वस्त केले. 

महायुतीमुळे आघाडीचा एकही आमदार झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि उद्धवसेनेलाही येथे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे कोणी राहिलेले नाही. अशातच पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यासाठी विधानसभेतील अपयश धुवून काढायचे आणि निराशा झटकून निवडणुकीला सामोरे जायचे, असा निर्धार राष्ट्रीय काँग्रेसने केला आहे. यासाठी पक्षाची रविवारी साताऱ्यात बैठक झाली.

काँग्रेस कमिटीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ईव्हीएम विरोधात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष  डॉ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, प्रा. विश्वंभर बाबर, ॲड. श्रीकांत चव्हाण, ॲड. दत्ता धनवडे, निवास थोरात, अन्वर पाशा खान, रजनी पवार, संदीप माने, रजनी पवार, संदीप माने, मनोजकुमार तपासे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत विचारमंथन करण्यात आले. अपयशाच्या कारणांवर विचार करण्यात आला. तसेच आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. यासाठी तीन-चार महिने निवडणुकीचा माहोल असणार आहे. त्यामुळे निवडणूक पुढील काही दिवसांत कधीही जाहीर होऊ शकते. यासाठी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आतापासूनच सतर्क राहावे. 

विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ताकदीने काम करावे लागेल. पक्ष मजबूत करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरावर बैठक घेऊ. यामुळे सर्वच तालुक्यांत गावपातळीपर्यंत तयारी करा, अशी सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

पराभवाने खचून जाऊ नका...साताऱ्यातील बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाऊ नका. अपयश ढकलून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जायचे आहे. कारण, या निवडणुकाच लोकशाहीचा पाया आहेत. यासाठी तयारी करा, अशी सूचना केल्याची माहितीही मिळत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर