शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

काँग्रेस अपयश झटकणार; स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी! 

By नितीन काळेल | Updated: December 9, 2024 21:57 IST

जिल्हास्तरावर लवकरच बैठक : जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार!

सातारा : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस तसेच महाविकास आघाडीलाही जिल्ह्यात दारुण पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे काँग्रेसमध्ये निराशेचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांत आत्मविश्वास भरण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी लवकरच जिल्हास्तरावर पक्षाची बैठक घेऊन जिल्हा परिषद, पालिका निवडणुकीबाबत रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. 

सातारा जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला. येथील आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवरही काँग्रेसचाच वरचष्मा; पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेसची वज्रमूठ ढिली झाली. बहुतांशी नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साथ दिली. त्यामुळे सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरला; पण राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला भाजपने पाच वर्षांत भगदाडे पाडली. तर आताच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वर्चस्वाला महायुतीने उद्ध्वस्त केले. 

महायुतीमुळे आघाडीचा एकही आमदार झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस आणि उद्धवसेनेलाही येथे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे कोणी राहिलेले नाही. अशातच पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. यासाठी विधानसभेतील अपयश धुवून काढायचे आणि निराशा झटकून निवडणुकीला सामोरे जायचे, असा निर्धार राष्ट्रीय काँग्रेसने केला आहे. यासाठी पक्षाची रविवारी साताऱ्यात बैठक झाली.

काँग्रेस कमिटीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ईव्हीएम विरोधात सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर जिल्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष  डॉ. सुरेश जाधव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, राजेंद्र शेलार, प्रा. विश्वंभर बाबर, ॲड. श्रीकांत चव्हाण, ॲड. दत्ता धनवडे, निवास थोरात, अन्वर पाशा खान, रजनी पवार, संदीप माने, रजनी पवार, संदीप माने, मनोजकुमार तपासे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत विधानसभा निवडणुकीबाबत विचारमंथन करण्यात आले. अपयशाच्या कारणांवर विचार करण्यात आला. तसेच आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांची निवडणूक होणार आहे. यासाठी तीन-चार महिने निवडणुकीचा माहोल असणार आहे. त्यामुळे निवडणूक पुढील काही दिवसांत कधीही जाहीर होऊ शकते. यासाठी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी आतापासूनच सतर्क राहावे. 

विधानसभेपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ताकदीने काम करावे लागेल. पक्ष मजबूत करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरावर बैठक घेऊ. यामुळे सर्वच तालुक्यांत गावपातळीपर्यंत तयारी करा, अशी सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची जोरदार तयारी केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.

पराभवाने खचून जाऊ नका...साताऱ्यातील बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन करताना विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचून जाऊ नका. अपयश ढकलून आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला सामोरे जायचे आहे. कारण, या निवडणुकाच लोकशाहीचा पाया आहेत. यासाठी तयारी करा, अशी सूचना केल्याची माहितीही मिळत आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर