शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी ३.० सरकारच्या कॅबिनेटचा फॉर्म्युला ठरला; महाराष्ट्रातून कुणाला मिळणार संधी?
2
भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल
3
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातही भाजपच एक नंबरचा पक्ष, पण कसा? फडणवीसांनी सांगितलं...
4
...तर INDIA आघाडीनं आणखी ९ जागा जिंकल्या असत्या; महाराष्ट्रातील ४ जागांचा समावेश
5
"एखादं मंत्रिपद मिळावं म्हणून शिंदे गटाची आदळआपट सुरु"; राजकीय भूकंपावरुन सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर
6
विरोधकांच्या 'या' ४ नॅरेटिव्हमुळं महायुतीला बसला फटका; देवेंद्र फडणवीसांचं विश्लेषण
7
SBIच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या उड्या; एक्सपर्ट म्हणाले, "१००० च्या वर जाणार..."
8
चीनमधून एक बातमी आली अन् सोनं 'धडाम'...; गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढण्याची शक्यता!
9
"राज्यातला निकाल अनपेक्षित, पवारांनाही चार जागा येतील असं वाटत...." आशिष शेलार स्पष्टच बोलले
10
देवेंद्र फडणवीसांचा मित्रपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना सल्ला; "आता ही वेळ जाहीरपणे..."
11
Flipkart पूर्वी PhonePe चा येणार आयपीओ, काय आहे प्लॅन; जाणून घ्या
12
'भिंतीवरचं पेंटिंग मिटवशील पण सत्य...?', दलजीत कौरने पुन्हा पतीवर साधला निशाणा
13
जोडी नंबर १! भाऊ-बहिणीची कमाल, होणार डेप्युटी कलेक्टर; सांगितला यशाचा 'सुवर्ण मंत्र'
14
"नितीश कुमारांना इंडिया आघाडीने दिलेली पंतप्रधानपदाची ऑफर"; JDU चा मोठा दावा
15
Dhananjay Munde : "मी व पंकजाताईंनी अत्यंत जिव्हारी लागणारा पराभव..."; धनंजय मुंडेंचं जिल्हावासीयांना आवाहन
16
Rahul Gandhi : 'राहुल गांधींना विरोधी पक्षनेते करा', काँग्रेस CWC बैठकीत ठराव मंजूर
17
तुरुंगात होते चंद्राबाबू नायडू, मुलावरही होतं संकट, TDPच्या विजयातील महत्त्वाची व्यक्ती 'ब्राह्मणी' कोण माहितीये?
18
समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक दुसऱ्या ट्रकवर आदळला; एक जण ठार, एक गंभीर
19
मोदी ३.० मंत्रिमंडळात कुणा-कुणाला मिळू शकते जागा, सामोर आली यादी, या नावांची सुरू आहे चर्चा!
20
सैफ-करिनाच्या रिसेप्शन पार्टीत 'पंचायत' फेम हा अभिनेता होता वेटर, 'मिर्झापूर'मध्येही केलंय काम

काँग्रेसकडून आयुर्वेद संपविण्याचे काम: मोदींमुळे आयुर्वेदाला अच्छे दिन- CM प्रमोद सावंत

By शीतल पाटील | Published: November 30, 2023 9:02 PM

सांगलीतील बापट बाल मंदिर शाळेजवळील चौकाला वैद्यराज आ. वा. दातारशास्त्री चौक नामकरण सोहळा मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत झाला.

सांगली : भारतात आयुर्वेदाची मोठी परंपरा आहे. इंग्रजांच्या काळात आयुर्वेद संपविण्याचे काम झाले. त्यानंतर गेल्या ६० वर्षात काँग्रेस राजवटीतही आयुर्वेदाबाबत फारसे प्रयत्न झाले नाहीत. देशात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आयुर्वेदाला अच्छे दिन आले, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी सांगलीत केले.

सांगलीतील बापट बाल मंदिर शाळेजवळील चौकाला वैद्यराज आ. वा. दातारशास्त्री चौक नामकरण सोहळा मुख्यमंत्री सावंत यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. डाॅ. सावंत म्हणाले की, आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. मोदीमुळे आयुर्वेदाला अच्छे दिन आले. आयुष मंत्रालय स्थापन केले. दिल्लीत आयुर्वेद एम्स सुरू केले. इंग्रजांनी आयुर्वेद संपविण्याचे काम केले. काँग्रेसनेही आयुर्वेद जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत.

आता जगाला आयुर्वेदाचे महत्व कळले आहे. १४० देशात आयुर्वेद व योगा पोहोचला आहे. आयुर्वेद वैद्यांना विदेशातही प्रॅक्टीस करण्यास मान्यता मिळाली. कोरोनानंतर आयुर्वेदाचे महत्व वाढले. वेलनेस टुरिझममध्येही आयुर्वेदला महत्व आहे. परदेशातून अनेकजण आयुर्वेदिक उपचारासाठी देशात येत आहेत. त्यामुळे वैद्यांनी वेलनेस टुरिझमकडेही लक्ष द्यावे.दातारशास्त्रींनी पाच भौतिक चिकित्सा पद्धती उदयास आणली. गुरू-शिष्य परंपरेतून ही पद्धती पुढील पिढीत रुजली आहे. त्यांचे कार्य सुरु ठेवण्याचे काम आयुर्वेद व्यासपीठाकडून केले जात आहे. 

तीन राज्यात भाजपची सत्ता

पाच राज्याच्या निवडणुका पार पडल्या. यापैकी तीन राज्यात भाजपची सत्ता येईल. तर दोन राज्यात भाजपची स्थिती चांगली असेल, असा दावाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतsatara-pcसातारा