शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

कॉँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीतून सरकारला सळो की पळो करू : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:52 IST

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के लोकांनी स्वीकारले. उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आपल्यातील मतविभाजन टाळले असते,

ठळक मुद्देवडगाव हवेलीत विश्वजित कदम यांचा सत्कार

वडगाव हवेली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के लोकांनी स्वीकारले. उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आपल्यातील मतविभाजन टाळले असते, तर भाजपला सत्ता अशक्य होती. काँगे्रस विचाराचे सर्वजण एकत्र आलो तर केंद्र व राज्यातील सरकारला सळो की पळो करू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे आमदार विश्वजित कदम यांची विधानसभेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार व गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्र्रजित मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, सुनील पाटील, कºहाडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, शिवराज मोरे, राजेंद्र्र चव्हाण, मनोहर शिंदे, पैलवान नानासाहेब पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, प्रतापराव देशमुख, संयोजक व जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, दुर्गेश मोहिते, उमेश साळुंखे आदींची उपस्थिती होती.आमदार विश्वजित कदम म्हणाले, ‘पतंगराव कदम यांनी ४५ वर्षे केलेल्या सेवेची पुण्याई मला बिनविरोध होण्यामध्ये कामी आली. महाराष्ट्राचे संरक्षण व शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यातील जनतेच्या हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.’

यावेळी आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्र्रजित मोहिते, अजितराव पाटील, डॉ. सुधीर जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. शंकर जगताप यांनी स्वागत केले. जयवंतराव जगताप यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.मोदी सरकारकडून योजनांचे बारसे : जयकुमार गोरेकार्यक्रमप्रसंगी जयकुमार गोरे म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने काँग्रेसने राबवलेल्या योजनांचे बारसे घालून जुन्या योजनांची केवळ नावे बदलण्याचे काम केले. आघाडी सरकारच्या काळातील गॅसचा दर भाजप सरकारने दुप्पट केला. शेतकºयांचे तर यांनी बेहाल केले आहेत. त्यामुळे हे जुलमी सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.एकाच व्यासपीठावर पाच आमदारवडगाव हवेली येथे आमदार विश्वजित कदम सत्कार कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी या कार्यक्रमास पाच आमदार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील यांच्या एकत्रित आल्यामुळे नागरिकांच्यात हा चर्चेचा विषय ठरला.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसर