शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

काँग्रेसला हवा राष्ट्रवादीचा वारू रोखणारा

By admin | Updated: May 23, 2014 22:55 IST

जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील कायम राहणार ? : जयकुमार गोरे, मदन भोसले, धैर्यशील कदम, रणजितसिंह यांची नावे चर्चेत

मोहन मस्कर-पाटील, सातारा काँग्रेसची जिल्हास्तरीय कार्यकारिणी आणि ब्लॉक कमिटी बरखास्त करण्याची प्रक्रिया नवी दिल्लीपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्रातही त्याचे वारे लवकरच पोहोचणार आहे. सातारा जिल्हाही त्यातून सुटणार नसून जिल्हाध्यक्ष तसेच अन्य कार्यकारिणी निवडही नव्याने होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा वारु रोखणारा जिल्हाध्यक्ष काँग्रेसला हवा आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी आनंदराव पाटील कायम राहणार की अन्य कोण या पदावर विराजमान होणार याकडे अनेकांच्या नजरा आहेत. दरम्यान, जिल्हाध्यक्षपदासाठी आ. जयकुमार गोरे, माजी आ. मदन भोसले, धैर्यशील कदम आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची नावे चर्चेत आली आहेत. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर प्रमुख नेते काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीच्या मागे गेली. परिणामी जिल्ह्यातील सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिली. तीनवर्षांपूर्वी मुख्यमंत्रिपदी पृथ्वीराज चव्हाण आले आणि जिल्हा काँग्रेसमध्ये चैतन्य आले. मात्र, हे फार काळ टिकू शकले नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत त्याची प्रचिती आली कारण बहुतांशी पदाधिकारी ‘शॅडो मुख्यमंत्री’ असल्याच्या थाटात वावरत होते. सुशांत मोरे यांनी ‘लाल दिवा’ प्रकरणात केलेल्या आरोपामुळे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील अडचणीत आले. आघाडीच्या उमेदवाराला ‘कºहाड दक्षिण’मधून मतदान कमी झाले. राज्यात दोन ठिकाणी अपवाद वगळता लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काँग्रेसची पाटी कोरी राहिली. सातारा जिल्ह्याचा विचार करता ‘कºहाड दक्षिण’, ‘माण’ वगळता कोठेही समाधानकारक चित्र नाही. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा वारू रोखण्यासाठी निर्णायक रणनीती आखण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत. जिल्हास्तरावरील कार्यकारिणी बरखास्त झाल्यास अध्यक्षपद बदलले जाणार आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी सद्यातरी प्रबळ दावेदार आ. जयकुमार गोरे आणि मदन भोसले आहेत. मात्र, मुख्यमंत्री म्हणतील तोच अध्यक्षपदी विराजमान होणार, हे देखील तितकेच सत्य आहे. असा रुबाब पुन्हा येईल का..? मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असताना मोरारजी देसाई वाघोली, ता. कोरेगाव येथे होते. त्यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीला भेट देण्याचा निर्णय घेतला. कार्यालयाच्या पायर्‍या चढत असतानाच जिल्हाध्यक्ष स्वामी रामानंद भारतींनी त्यांना रोखले. ‘मला कल्पना न देता तुम्ही जिल्ह्यात आलाच कसे, अशी थेट विचारणा मोरारजीभार्इंना झाली. मोरारजीभार्इंवर तोंडसुख सुरू असताना वसंतदादा आणि किसन वीर बाजूलाच उभे राहून ऐकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते. मोरारजीभार्इंनी शिस्त मोडली; परिणामी त्यांनी माफी मागितली. अर्थातच काँग्रेसच्या शिस्तीचा तो एक भाग होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना कोणत्या जिल्ह्यात जायचे असले तर जिल्हाध्यक्षांना त्याची कल्पना द्यावी लागायची. मुख्यमंत्र्यांपेक्षाही जिल्हाध्यक्षपदाचा रुबाब नेहमीच मोठा असतो हे भारतींना दाखवायचे होते आणि त्यांनी ते मोरारजीभार्इंना दाखवून दिले. आक्रमक चेहर्‍याचा शोध राष्ट्रवादीला रोखण्यासाठी काँग्रेसला आक्रमक नेतृत्व हवे आहे. सध्यातरी आ. गोरे आणि रणजितसिंह नाईक-निंबाळकर वगळता दुसरा कोणताही आक्रमक चेहरा नाही. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदासाठी त्यांच्याही नावाचा विचार अंतिम क्षणी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. इच्छुकांच्या मात्र सावध प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांचे राजकीय सख्य लक्षात घेता कोणी विरोधात बोलत नाही. जिल्हाध्यक्षपदाच्या अनुषंगाने आ. गोरे यांच्याशी संपर्क साधला असता ‘आज ना उद्या ती जबाबदारी माझ्याकडे येऊ शकते,’ असे सांगितले. त्यांनी मदन भोसले यांच्या नावावरही सहमती दर्शविली. धैर्यशील कदम यांनीही ‘पक्षाने जबाबदारी दिली तर स्वीकारू,’ असे स्पष्ट केले.