शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कॉँगे्रसवाल्यांनो.. हवेतून खाली या !

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

वाल्मिकींचा घरचा आहेर : बैठकीतील कमी उपस्थिती पाहून तीव्र नाराजी

सातारा : ‘काँग्रेसचा हात गरिबांच्या साथीला, असं फक्त आपण म्हणत असतो. गरिबांना मारलं, लुटलं जात आहे, तरीही आपण त्यांना साथ मात्र देत नाही. त्यामुळेच आता दिल्लीत अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले आहेत. काँग्रेसची ही स्थिती बदलायची असेल, तर आपल्याला हवेतून खाली आले पाहिजे; तरच पक्ष मजबूत होईल,’ अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी श्योराज जीवन वाल्मिकी यांनी सर्वांनाच सुनावत घरचा आहेर दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी बैठकीला कमी उपस्थिती पाहून नाराजी व्यक्त करीत जिल्हा काँग्रेसबद्दल नापसंतीही व्यक्त केली. येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित बैठकीत त्यांनी मार्गदर्शन करतानाच पक्षासाठी योगदान देण्यास सर्वांनाच बजावले. यावेळी आमदार आनंदराव पाटील, अ‍ॅड. विजयराव कणसे, साहेबराव जाधव, बाबूराव जंगम गुरुजी, मनोजकुमार तपासे, रजनी पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रथम वाल्मिकी यांचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. वाल्मिकी यांनी पक्षाला घरचा आहेर देतानाच दिल्लीपासून ते गावपातळीपर्यंतचा पक्षाची बाजू पदाधिकाऱ्यांच्या समोर आणली. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुकही केले. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आपल्या देशात साधी सुई बनत नव्हती; पण काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यापासून देशाचा विकास होऊ लागला. पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली. पक्षाने देशावर अनेक वर्षे राज्य केले. पण, आज पक्षाची स्थिती कमकुवत आहे. याला कारणे काय आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. गरिबांचे कैवारी म्हणत असलो तरी आपण तसे वागतो का, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण गरिबांच्या बाजूने आपण राहत नाही. दिल्लीत केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना काँग्रेसची म्हणजेच गरीब आणि झोपडपट्टीतील लोकांची मते मिळाली आहेत. आपल्याला पुन्हा मजबूत व्हावे लागेल. त्यासाठी हवेतून आपल्याला खाली यावे लागेल. सर्वांनी चिंतन, मनन करावे व पक्षाच्या वाढीस हातभार लावावा.’आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात पूर्वी काँग्रेसचा एक आमदार होता. आज दोन आमदार पक्षाचे आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे संघटन सुरू आहे. आगामी काळात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे.’अ‍ॅड. कणसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पक्षाचे नुकसान झाल्याची तोफ डागली. ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत मरगळ आली आहे. याला अनेक कारणे आहेत. जिल्ह्यात आज भाजपचा एकही आमदार नाही. आज दिल्लीतील निकालाने देशातील जनता कोणाची गुलाम नाही, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे यापुढे आपण कसे लोकांपुढे जायचे, याचा विचार करण्याची आज खरी गरज आहे. (प्रतिनिधी)आठपैकी पाच पालिका कॉँग्रेसच्या !बैठकीत मार्गदर्शन करताना विजयराव कणसे यांनी जिल्ह्यातील आठपैकी पाच नगरपालिका पक्षाकडे आहेत, असे सांगितले. हे एकताच , उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते चमकून एकमेकांकडे पाहू लागले. सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते.