शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

कमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 13:45 IST

मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी ह्यकमळह्ण फुलले नाही. तरीदेखील काँगे्रसची वाताहत सुरू राहिली. सर्वच ठिकाणी टप्प्या-टप्प्याने काँगे्रसची पडझड होत गेली. काँगे्रसचा हात आणि पायही गाळात चालला असला तरी तो ओढून काढण्याचा प्रयत्न प्रमुख नेत्यांकडून होताना दिसत नाही. गेल्या चार महिन्यांपासून काँगे्रसचे जिल्हाध्यक्षपद रिकामे आहे. या परिस्थितीत कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत.

ठळक मुद्देकमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थितीविधानसभा निवडणुकीत तयारीचा अभाव; गत चार महिन्यांपासून पक्ष नेतृत्वाविना

सागर गुजर 

सातारा : मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी कमळ फुलले नाही. तरीदेखील काँगे्रसची वाताहत सुरू राहिली. सर्वच ठिकाणी टप्प्या-टप्प्याने काँगे्रसची पडझड होत गेली. काँगे्रसचा हात आणि पायही गाळात चालला असला तरी तो ओढून काढण्याचा प्रयत्न प्रमुख नेत्यांकडून होताना दिसत नाही. गेल्या चार महिन्यांपासून काँगे्रसचे जिल्हाध्यक्षपद रिकामे आहे. या परिस्थितीत कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत.संपूर्ण देशात मोदी लाटेमुळे २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही काँगे्रसला बाजूला सारून भाजपने राज्याची सत्ता काबीज केली. संपूर्ण देशात आणि राज्यात भाजपचा वारू वेगाने पुढे जात होता. तरीदेखील सातारा जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना विशेष यश मिळवता आले नव्हते. जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघात कमळ फुलले नव्हते. तसेच शिवसेनेलाही पाटण वगळता कुठेही चमक दाखवता आली नाही.जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा मजूर फेडरेशन, बाजार समित्या यांच्या निवडणुका त्यानंतर झाल्या तरी देखील भाजपला रोखून धरून राष्ट्रवादीने या सर्वच संस्थांवर आपला वरचष्मा ठेवला. सत्ताधारी भाजपशी राष्ट्रवादीने दोन हात केले.हे एका बाजूला सुरु असताना काँगे्रस मात्र अंतर्गत वादात गुरफटली होती. काँगे्रसचे जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या आमदार आनंदराव पाटील यांना ज्यांनी तीव्रतेने विरोध केला, तीच मंडळी काँगे्रससोबत राहिली नाहीत. जे काठावर राहून काँगे्रसची वाताहत पाहत होते, त्यांनी ऐनवेळी बुडून जाण्याच्या भीतीने भाजपच्या नौकेत पाय ठेवला.

आमदार आनंदराव पाटील यांना बाजूला करून पक्षाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व दिले. निंबाळकर मोठा बदल करणार, राष्ट्रवादीला चारीमुंड्या चित करणार, अशा वल्गना काँगे्रस कार्यकर्ते व्यक्त करत होते, तेव्हाच वाईचे माजी आमदार मदन भोसले यांनी काँगे्रस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

भोसलेंच्या कार्यकर्त्यांना तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह यांनी प्रायश्चित्त दिले. भोसले यांना मानणाऱ्या जिल्ह्यातील विविध तालुक्यांची कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केल्या. काँगे्रसची कार्यकारिणी बरखास्त करणारे जिल्हाध्यक्षच भाजपच्या कळपात जाऊन बसले.सध्याच्या घडीला वाई शहर-तालुका, खंडाळा, सातारा तालुका, महाबळेश्वर, फलटण शहर- तालुका इथल्या काँगे्रसच्या कार्यकारिणी बरखास्त झालेल्या आहेत. जावळी, कोरेगाव, माण-खटाव, कऱ्हाड उत्तरमधील काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना नेमकी भूमिका काय घ्यायची? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तर कऱ्हाड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात मनोमिलन झाले की नाही? याबाबतही कार्यकर्त्यांना स्पष्ट कळालेले नाही.

मलकापूर नगरपालिका आणि कऱ्हाड दक्षिणमधील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काका-बाबा गटांचे मनोमिलन झाले. मात्र, या दोन प्रमुख नेत्यांमधील अबोला कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँगे्रसचे विचार पेरत अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी प्रचार हाती घेतलाय; परंतु या ठिकाणी काँग्रसचे कार्यकर्ते अजूनही एकजुटीने कामाला लागलेले दिसत नाहीत.जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये काँगे्रसचे सदस्यत्व लक्षणीयरीत्या घटले आहे. सध्याच्या घडीला बिदाल (अरुण गोरे), वाठार किरोली (भीमराव पाटील), पुसेसावळी (सुनीता कदम), विंग (शंकर खबाले-पाटील), कोपर्डे (निवास थोरात), वारुंजी (मंगल गलांडे) हे सात जिल्हा परिषद गट काँगे्रसच्या ताब्यात राहिले आहेत. शून्य असणाऱ्या भाजपने जिल्हा परिषदेत सातवर मजल मारली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत गटातटांत विभागलेली काँगे्रसची शकले पडत असताना ते जोडण्यासाठी कोण पुढाकार घेणार? हा प्रश्न आहे.काँगे्रसकडे कऱ्हाड दक्षिण आणि माण-खटाव या दोन जागा येऊ शकतात. त्या हाती पडतील, अशी काँगे्रस नेत्यांची अपेक्षा आहे. राज्यात भाजप आक्रमक आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी करताना हट्ट धरून चालणार नाही. यातून दोन्ही पक्षांचे नुकसान होऊ शकते, अशी भावना काँगे्रसच्या जाणकार कार्यकर्त्यांमध्ये आहे.

काँगे्रसने जिल्ह्यात सुवर्णकाळ अनुभवला आहे. काँगे्रस कार्यकर्ता अभिमानाने कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायला तयार होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. १९९९ साली काँगे्रसच्या वाहनात बसायला कोणी तयार नव्हतं, तीच परिस्थिती आताही आहे. आम्ही अजूनही आशावादी आहोत. काँगे्रसची पडझड थांबवण्यासाठी पक्षाची एकजूट आवश्यक आहे.- अ‍ॅड. विजयराव कणसे,कार्याध्यक्ष, काँगे्रस 

टॅग्स :congressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर