शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

कमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 13:45 IST

मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी ह्यकमळह्ण फुलले नाही. तरीदेखील काँगे्रसची वाताहत सुरू राहिली. सर्वच ठिकाणी टप्प्या-टप्प्याने काँगे्रसची पडझड होत गेली. काँगे्रसचा हात आणि पायही गाळात चालला असला तरी तो ओढून काढण्याचा प्रयत्न प्रमुख नेत्यांकडून होताना दिसत नाही. गेल्या चार महिन्यांपासून काँगे्रसचे जिल्हाध्यक्षपद रिकामे आहे. या परिस्थितीत कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत.

ठळक मुद्देकमळ न फुलता काँगे्रसचा हात गाळात, सातारा जिल्ह्यातील स्थितीविधानसभा निवडणुकीत तयारीचा अभाव; गत चार महिन्यांपासून पक्ष नेतृत्वाविना

सागर गुजर 

सातारा : मागील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी एकाही ठिकाणी कमळ फुलले नाही. तरीदेखील काँगे्रसची वाताहत सुरू राहिली. सर्वच ठिकाणी टप्प्या-टप्प्याने काँगे्रसची पडझड होत गेली. काँगे्रसचा हात आणि पायही गाळात चालला असला तरी तो ओढून काढण्याचा प्रयत्न प्रमुख नेत्यांकडून होताना दिसत नाही. गेल्या चार महिन्यांपासून काँगे्रसचे जिल्हाध्यक्षपद रिकामे आहे. या परिस्थितीत कार्यकर्ते दिशाहीन झाले आहेत.संपूर्ण देशात मोदी लाटेमुळे २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही काँगे्रसला बाजूला सारून भाजपने राज्याची सत्ता काबीज केली. संपूर्ण देशात आणि राज्यात भाजपचा वारू वेगाने पुढे जात होता. तरीदेखील सातारा जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना विशेष यश मिळवता आले नव्हते. जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघात कमळ फुलले नव्हते. तसेच शिवसेनेलाही पाटण वगळता कुठेही चमक दाखवता आली नाही.जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा मजूर फेडरेशन, बाजार समित्या यांच्या निवडणुका त्यानंतर झाल्या तरी देखील भाजपला रोखून धरून राष्ट्रवादीने या सर्वच संस्थांवर आपला वरचष्मा ठेवला. सत्ताधारी भाजपशी राष्ट्रवादीने दोन हात केले.हे एका बाजूला सुरु असताना काँगे्रस मात्र अंतर्गत वादात गुरफटली होती. काँगे्रसचे जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या आमदार आनंदराव पाटील यांना ज्यांनी तीव्रतेने विरोध केला, तीच मंडळी काँगे्रससोबत राहिली नाहीत. जे काठावर राहून काँगे्रसची वाताहत पाहत होते, त्यांनी ऐनवेळी बुडून जाण्याच्या भीतीने भाजपच्या नौकेत पाय ठेवला.

आमदार आनंदराव पाटील यांना बाजूला करून पक्षाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व दिले. निंबाळकर मोठा बदल करणार, राष्ट्रवादीला चारीमुंड्या चित करणार, अशा वल्गना काँगे्रस कार्यकर्ते व्यक्त करत होते, तेव्हाच वाईचे माजी आमदार मदन भोसले यांनी काँगे्रस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

भोसलेंच्या कार्यकर्त्यांना तत्कालीन जिल्हाध्यक्ष रणजितसिंह यांनी प्रायश्चित्त दिले. भोसले यांना मानणाऱ्या जिल्ह्यातील विविध तालुक्यांची कार्यकारिणी त्यांनी बरखास्त केल्या. काँगे्रसची कार्यकारिणी बरखास्त करणारे जिल्हाध्यक्षच भाजपच्या कळपात जाऊन बसले.सध्याच्या घडीला वाई शहर-तालुका, खंडाळा, सातारा तालुका, महाबळेश्वर, फलटण शहर- तालुका इथल्या काँगे्रसच्या कार्यकारिणी बरखास्त झालेल्या आहेत. जावळी, कोरेगाव, माण-खटाव, कऱ्हाड उत्तरमधील काँगे्रसच्या कार्यकर्त्यांना नेमकी भूमिका काय घ्यायची? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. तर कऱ्हाड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटात मनोमिलन झाले की नाही? याबाबतही कार्यकर्त्यांना स्पष्ट कळालेले नाही.

मलकापूर नगरपालिका आणि कऱ्हाड दक्षिणमधील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काका-बाबा गटांचे मनोमिलन झाले. मात्र, या दोन प्रमुख नेत्यांमधील अबोला कायम आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँगे्रसचे विचार पेरत अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी प्रचार हाती घेतलाय; परंतु या ठिकाणी काँग्रसचे कार्यकर्ते अजूनही एकजुटीने कामाला लागलेले दिसत नाहीत.जिल्हा परिषद व पंचायत समितींमध्ये काँगे्रसचे सदस्यत्व लक्षणीयरीत्या घटले आहे. सध्याच्या घडीला बिदाल (अरुण गोरे), वाठार किरोली (भीमराव पाटील), पुसेसावळी (सुनीता कदम), विंग (शंकर खबाले-पाटील), कोपर्डे (निवास थोरात), वारुंजी (मंगल गलांडे) हे सात जिल्हा परिषद गट काँगे्रसच्या ताब्यात राहिले आहेत. शून्य असणाऱ्या भाजपने जिल्हा परिषदेत सातवर मजल मारली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत गटातटांत विभागलेली काँगे्रसची शकले पडत असताना ते जोडण्यासाठी कोण पुढाकार घेणार? हा प्रश्न आहे.काँगे्रसकडे कऱ्हाड दक्षिण आणि माण-खटाव या दोन जागा येऊ शकतात. त्या हाती पडतील, अशी काँगे्रस नेत्यांची अपेक्षा आहे. राज्यात भाजप आक्रमक आहे. या परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत वाटाघाटी करताना हट्ट धरून चालणार नाही. यातून दोन्ही पक्षांचे नुकसान होऊ शकते, अशी भावना काँगे्रसच्या जाणकार कार्यकर्त्यांमध्ये आहे.

काँगे्रसने जिल्ह्यात सुवर्णकाळ अनुभवला आहे. काँगे्रस कार्यकर्ता अभिमानाने कुठल्याही निवडणुकीला सामोरे जायला तयार होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. १९९९ साली काँगे्रसच्या वाहनात बसायला कोणी तयार नव्हतं, तीच परिस्थिती आताही आहे. आम्ही अजूनही आशावादी आहोत. काँगे्रसची पडझड थांबवण्यासाठी पक्षाची एकजूट आवश्यक आहे.- अ‍ॅड. विजयराव कणसे,कार्याध्यक्ष, काँगे्रस 

टॅग्स :congressकाँग्रेसSatara areaसातारा परिसर