शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

जखमी ‘हरियाल’ला वाचविण्यात अपयश मदत न मिळाल्याने मृत्यू झाल्याची तक्रार

By admin | Updated: November 14, 2014 23:19 IST

या पक्ष्याला वाचविण्यासाठी या विद्यार्थ्यांनी केलेली मोठी धावपळ व्यर्थ ठरली.

सातारा : महाराष्ट्राचा राज्यपक्षी असलेल्या ‘हरियाल’ पक्ष्याला जखमी अवस्थेत वेळेवर मदत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार, त्याला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी केली. महाविद्यालयाच्या जवळपास जखमी अवस्थेत सापडलेल्या या पक्ष्याला वाचविण्यासाठी या विद्यार्थ्यांनी केलेली मोठी धावपळ व्यर्थ ठरली. याबाबत हकीकत अशी, शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील काही विद्यार्थी चहा घेण्यासाठी बाहेर आले. ‘एमपीएससी’चा अभ्यास करण्यासाठी हे विद्यार्थी रोज सकाळी महाविद्यालयात येतात. परिसरातील गर्द झाडीत त्यांना काही हालचाल दिसल्याने हे विद्यार्थी झाडीकडे गेले. जखमी अवस्थेत धडपडत असलेला हरियाल पक्षी त्यांना दिसला. गर्द झाडीत मोठ्या कष्टाने शिरून त्यांनी पक्ष्याला ताब्यात घेतले. या प्रयत्नात एका विद्यार्थ्याला काटेही लागले. पक्ष्याला घेऊन सचिन जाधव, अतुल जाधव, गुरुदेव फाळके, अशोक राठोड, गौरव जमदाडे, सचिन काळेल हे विद्यार्थी वनखात्याच्या गोडोली येथील कार्यालयात गेले. परंतु तेथील व्यक्तींनी डॉक्टर नसल्याचे सांगितले. पक्ष्याला घेऊन विद्यार्थी सरकारी पशुचिकित्सालयाकडे गेले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही आणि पक्ष्याचा मृत्यू झाला. वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी किमान या पक्ष्याला ताब्यात घ्यायला हवे होते, असे मत या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. वेळेत मदत न मिळाल्यानेच त्याचा मृत्यू झाला, अशी तक्रार त्यांनी उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांच्याकडे केली. (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी हरियाल पक्ष्याला गोडोली रोपवाटिकेत आणले तेव्हा तेथे कर्मचारी उपस्थित नव्हते. केवळ वनमजूर तेथे काम करत होते. ते या पक्ष्याला ताब्यात घेऊ शकत नाहीत. कर्मचारी असते, तर त्यांनी पक्ष्याला नक्की ताब्यात घेतले असते. - एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक, सातारा