शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

बिलांसाठी वीज वितरण कंपनीचा शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:53 IST

यावेळी महावितरणचे कऱ्हाड कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे, शाखा अभियंता यादव, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, रयत क्रांती संघटनेचे ...

यावेळी महावितरणचे कऱ्हाड कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे, शाखा अभियंता यादव, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अविनाश नलवडे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन नलवडे, माजी सरपंच बाळासाहेब नलवडे, सोसायटीचे अध्यक्ष प्रल्हाद नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष संपतराव नलवडे, रघुनाथ नलवडे व शेतकरी उपस्थित होते.

कृषिपंप वीज धोरण संकल्पना शेतकऱ्यांपुढे मांडत असताना नवाळे यांनी, शेतकऱ्यांनी आपली शेतीपंपाची बिले वेळेवर भरल्यानंतर जमा होणाऱ्या रकमेचा वापर कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांसाठी करण्यात येणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी बिल वेळेत भरण्याबाबतचे महावितरणचे धोरण अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर या धोरणाचे शेतकरी स्वागतच करतील, अशी भूमिका रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी मांडली.

सचिन नलवडे म्हणाले, राज्य सरकारने थकीत कर्जदार शेतकऱ्यांची दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली, तेव्हा नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर मदत करण्याचे जाहीर केले. परंतु अद्याप त्यांना ती मदत मिळाली नाही. कोरोना महामारीच्या काळात आज सर्व स्तरातील जनता अडचणीत आहे. तशीच शेतकऱ्यांचीही आर्थिक परिस्थिती ठीक नाही. त्यामुळे सरकारने ती ५० हजारांची मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावी किंवा त्या रकमेतून ही वीज बिलाची रक्कम वळती करून घेऊन उरलेली रक्कम शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी केली.

- चौकट

... अशी मिळणार सवलत

सवलत: मुदत

५० टक्के : ३१ डिसेंबर २०२१ अखेर

३० टक्के : ३१ डिसेंबर २०२२ अखेर

२० टक्के : ३१ डिसेंबर २०२३ अखेर

- चौकट

सवलत मिळविण्यासाठी बिल भरा

तीस मीटरच्या आत सर्व कनेक्शन तात्काळ देण्यात येणार आहेत. यापेक्षा जास्त अंतर असलेल्या ग्राहकांना विविध प्रणाली पर्याय उपलब्ध करून कनेक्शन देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नवाळे यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्राहकांनी सवलतींचा फायदा घेण्यासाठी वेळीच बिल भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

फोटो :

कॅप्शन : पार्ले, ता. कऱ्हाड येथे वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त अभियंता नवाळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अविनाश नलवडे, सचिन नलवडे आदी उपस्थित होते.