शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

फलटण तालुक्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तरडगाव : कृषी योजना विषयक सर्व आवश्यक माहिती शेतकरी वर्गास देऊन त्या अंतर्गत उत्तम दर्जाची खते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तरडगाव : कृषी योजना विषयक सर्व आवश्यक माहिती शेतकरी वर्गास देऊन त्या अंतर्गत उत्तम दर्जाची खते बियाणे त्यांना पोहोच करावीत. तसेच कृषी संजीवनी मोहीम संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने राबवावी, अशा सूचना देत शेतकऱ्यांनी देखील त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार दीपक चव्हाण यांनी केले.

फलटण तालुक्यात २१ जून ते १ जुलै दरम्यान शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे. नुकताच या योजनेचा प्रारंभ रावडी बुद्रूक येथे झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास सत्यजितराजे नाईक-निंबाळकर, भगवानराव होळकर आदी उपस्थित होते.

या योजने अंतर्गत खरीप हंगामात शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार आहेे. यासाठी साधारण २५ शेतकऱ्यांचा एक गट तयार करावयाचा आहे . गटशेती पद्धतीनुसार त्यांना यामध्ये भाग घेता येणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान प्रदीप शिंदे यांच्या शेतात पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. यावेळी खरीप पूर्व तयारी, बांधावर खत वाटप, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करणे यासह कृषी योजना विषयक योजनांची माहिती देण्यात आली.

यावेळी प्रकल्प उपसंचालक विनयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी भास्कर कोळेकर, तालुका कृषी अधिकारी सुहास रणसिंग, पर्यवेक्षक बापूराव रुपनवर, डी. व्ही. पोरे, कृषी सहायक देवराम मदने, टी. एस. कुंभार, ए. एस. नाळे, डी. व्ही. पोरे, शरद खुडे, दादा अडसूळ, अमित रणवरे, आबा नाळे, जगन्नाथ सूळ, अनिल बोबडे, रामभाऊ कदम, सतीश झारगे, बापूराव करचे, सुहास भोसले आदी मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.