शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मोहिमेत ४० पोती कचरा गोळा

By admin | Updated: June 5, 2015 00:14 IST

कास परिसर : पर्यावरण संतुलनाचे महत्व केले अधोरेखित -- गूड न्यूज

पेट्री : शहराच्या पश्चिमेस कास तलावावर गेल्या तीन दिवसांपासून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत तब्बल ४० पोती कचरा गोळा करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी छोटीशी चिमुरडीदेखील कचरा गोळा करत होती. एकप्रकारे ती पर्यावरणाचे संतुलन राखण्यासंदर्भात सातारकरांना जाणीव करुन देत होती.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कास पठार, कास तलावाची ओळख आहे. याठिकाणी असंख्य पर्यटक येत असतात. परिसरात राजरोसपणे होणाऱ्या पार्ट्यामुळे बिअर, व्हिस्कीच्या बाटल्यांसमवेत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्मोकोलच्या डिशेस, पेले सर्वत्र परिसरात पसरल्याने कास तलावावर घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच दगडांवर फोडलेल्या दारुच्या बाटल्यामुळे काचांचा ढीग पसरत आहे. यामुळे कास तलाव काच तलाव झाल्याचे दिसत असते. हे चित्र पाहून बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांच्यात नाराजी होवू नये याकारणास्तव कन्हैय्यालाल राजपुरोहित, माधव मोघे व त्यांच्या अनेक सहकारी मित्रांनी कोणाचीही मदत न घेता गेल्या तीन दिवसांपासून कास तलाव परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.दरम्यान, प्लास्टिक, थर्मोकॉल डिशेस, पेले, दारुच्या बाटल्यासमवेत ४० पोती कचरा गोळा करण्यात आला. यावेळी कास गावातील काही स्थानिक गरजू ग्रामस्थांना रोजगार देवून त्यांच्याकडून कचरा गोळा करण्यात आला. याअगोदरही कन्हैय्यालाल राजपुरोहित व त्यांच्या मित्रमंडळींनी आसपासच्या ग्रामस्थांच्या मदतीने कचरा गोळा केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत फिरायला येणाऱ्या व्यक्तींनादेखील सहभागी करुन घेतले जाते. तसेच कासपठारावर फुलांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सातारा ते कास या मार्गावर प्रती १ कि़ मी. अंतरावर कासपर्यंत पर्यावरण जनजागृती संदर्भातील सुवचने असणारे फ्लेक्स बसविणार असल्याची माहिती कन्हैय्यालाल राजपुरोहित यांनी यावेळी दिली. पर्यटकांसाठी उपाययोजना करण्याची गरज...आंतरराष्ट्रीय दर्जाचे जैवविविधता असणाऱ्या या पर्यटनस्थळी दरवर्षी लाखो पर्यटक फिरायला येतात. परंतू पर्यटकांच्या सोयीसाठी कोणतीही स्वच्छता गृहाची व्यवस्था येथे दिसत नाही. तसेच केलेला कचरा टाकण्यासाठी कोठेही डस्टबिन नाही. यासाठी पालिका व संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वाढत्या पर्यटकांच्या सोयीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.कास तलावाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाण्यात खोलवर सूर्यकिरणे पोहचत असल्याने पाण्याचा दर्जा सर्वोत्कृष्ट आहे. वाहने, कपडे धुवून पाणी प्रदुषित होवू नये यासाठी उपाययोजना करावी. तसेच वेळोवेळी कारवाई होणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षकाची देखील नेमणूक व्हावी.- माधव मोघे, स्वच्छताप्रेमी साताराकोणाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वत:पासून स्वच्छतेस सुरूवात करून पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे. कास म्हणजे निसर्गत: आपल्यासाठी जणू स्वर्गच आहे. परंतु या परिसरात फिरायला येणाऱ्यांकडून कोणताही कचरा होणार नाही यासाठी स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पावसाळ्यात कचरा पाण्यात मिसळू नये, यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.-कन्हैय्यालाल राजपुरोहित, स्वच्छताप्रेमी नागरिक, सातारा