शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता मोहिमेत ४० पोती कचरा गोळा

By admin | Updated: June 5, 2015 00:14 IST

कास परिसर : पर्यावरण संतुलनाचे महत्व केले अधोरेखित -- गूड न्यूज

पेट्री : शहराच्या पश्चिमेस कास तलावावर गेल्या तीन दिवसांपासून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत तब्बल ४० पोती कचरा गोळा करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी छोटीशी चिमुरडीदेखील कचरा गोळा करत होती. एकप्रकारे ती पर्यावरणाचे संतुलन राखण्यासंदर्भात सातारकरांना जाणीव करुन देत होती.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कास पठार, कास तलावाची ओळख आहे. याठिकाणी असंख्य पर्यटक येत असतात. परिसरात राजरोसपणे होणाऱ्या पार्ट्यामुळे बिअर, व्हिस्कीच्या बाटल्यांसमवेत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्मोकोलच्या डिशेस, पेले सर्वत्र परिसरात पसरल्याने कास तलावावर घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच दगडांवर फोडलेल्या दारुच्या बाटल्यामुळे काचांचा ढीग पसरत आहे. यामुळे कास तलाव काच तलाव झाल्याचे दिसत असते. हे चित्र पाहून बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांच्यात नाराजी होवू नये याकारणास्तव कन्हैय्यालाल राजपुरोहित, माधव मोघे व त्यांच्या अनेक सहकारी मित्रांनी कोणाचीही मदत न घेता गेल्या तीन दिवसांपासून कास तलाव परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.दरम्यान, प्लास्टिक, थर्मोकॉल डिशेस, पेले, दारुच्या बाटल्यासमवेत ४० पोती कचरा गोळा करण्यात आला. यावेळी कास गावातील काही स्थानिक गरजू ग्रामस्थांना रोजगार देवून त्यांच्याकडून कचरा गोळा करण्यात आला. याअगोदरही कन्हैय्यालाल राजपुरोहित व त्यांच्या मित्रमंडळींनी आसपासच्या ग्रामस्थांच्या मदतीने कचरा गोळा केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत फिरायला येणाऱ्या व्यक्तींनादेखील सहभागी करुन घेतले जाते. तसेच कासपठारावर फुलांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सातारा ते कास या मार्गावर प्रती १ कि़ मी. अंतरावर कासपर्यंत पर्यावरण जनजागृती संदर्भातील सुवचने असणारे फ्लेक्स बसविणार असल्याची माहिती कन्हैय्यालाल राजपुरोहित यांनी यावेळी दिली. पर्यटकांसाठी उपाययोजना करण्याची गरज...आंतरराष्ट्रीय दर्जाचे जैवविविधता असणाऱ्या या पर्यटनस्थळी दरवर्षी लाखो पर्यटक फिरायला येतात. परंतू पर्यटकांच्या सोयीसाठी कोणतीही स्वच्छता गृहाची व्यवस्था येथे दिसत नाही. तसेच केलेला कचरा टाकण्यासाठी कोठेही डस्टबिन नाही. यासाठी पालिका व संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वाढत्या पर्यटकांच्या सोयीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.कास तलावाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाण्यात खोलवर सूर्यकिरणे पोहचत असल्याने पाण्याचा दर्जा सर्वोत्कृष्ट आहे. वाहने, कपडे धुवून पाणी प्रदुषित होवू नये यासाठी उपाययोजना करावी. तसेच वेळोवेळी कारवाई होणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षकाची देखील नेमणूक व्हावी.- माधव मोघे, स्वच्छताप्रेमी साताराकोणाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वत:पासून स्वच्छतेस सुरूवात करून पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे. कास म्हणजे निसर्गत: आपल्यासाठी जणू स्वर्गच आहे. परंतु या परिसरात फिरायला येणाऱ्यांकडून कोणताही कचरा होणार नाही यासाठी स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पावसाळ्यात कचरा पाण्यात मिसळू नये, यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.-कन्हैय्यालाल राजपुरोहित, स्वच्छताप्रेमी नागरिक, सातारा