शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

स्वच्छता मोहिमेत ४० पोती कचरा गोळा

By admin | Updated: June 5, 2015 00:14 IST

कास परिसर : पर्यावरण संतुलनाचे महत्व केले अधोरेखित -- गूड न्यूज

पेट्री : शहराच्या पश्चिमेस कास तलावावर गेल्या तीन दिवसांपासून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत तब्बल ४० पोती कचरा गोळा करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी छोटीशी चिमुरडीदेखील कचरा गोळा करत होती. एकप्रकारे ती पर्यावरणाचे संतुलन राखण्यासंदर्भात सातारकरांना जाणीव करुन देत होती.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कास पठार, कास तलावाची ओळख आहे. याठिकाणी असंख्य पर्यटक येत असतात. परिसरात राजरोसपणे होणाऱ्या पार्ट्यामुळे बिअर, व्हिस्कीच्या बाटल्यांसमवेत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्मोकोलच्या डिशेस, पेले सर्वत्र परिसरात पसरल्याने कास तलावावर घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच दगडांवर फोडलेल्या दारुच्या बाटल्यामुळे काचांचा ढीग पसरत आहे. यामुळे कास तलाव काच तलाव झाल्याचे दिसत असते. हे चित्र पाहून बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांच्यात नाराजी होवू नये याकारणास्तव कन्हैय्यालाल राजपुरोहित, माधव मोघे व त्यांच्या अनेक सहकारी मित्रांनी कोणाचीही मदत न घेता गेल्या तीन दिवसांपासून कास तलाव परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.दरम्यान, प्लास्टिक, थर्मोकॉल डिशेस, पेले, दारुच्या बाटल्यासमवेत ४० पोती कचरा गोळा करण्यात आला. यावेळी कास गावातील काही स्थानिक गरजू ग्रामस्थांना रोजगार देवून त्यांच्याकडून कचरा गोळा करण्यात आला. याअगोदरही कन्हैय्यालाल राजपुरोहित व त्यांच्या मित्रमंडळींनी आसपासच्या ग्रामस्थांच्या मदतीने कचरा गोळा केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत फिरायला येणाऱ्या व्यक्तींनादेखील सहभागी करुन घेतले जाते. तसेच कासपठारावर फुलांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सातारा ते कास या मार्गावर प्रती १ कि़ मी. अंतरावर कासपर्यंत पर्यावरण जनजागृती संदर्भातील सुवचने असणारे फ्लेक्स बसविणार असल्याची माहिती कन्हैय्यालाल राजपुरोहित यांनी यावेळी दिली. पर्यटकांसाठी उपाययोजना करण्याची गरज...आंतरराष्ट्रीय दर्जाचे जैवविविधता असणाऱ्या या पर्यटनस्थळी दरवर्षी लाखो पर्यटक फिरायला येतात. परंतू पर्यटकांच्या सोयीसाठी कोणतीही स्वच्छता गृहाची व्यवस्था येथे दिसत नाही. तसेच केलेला कचरा टाकण्यासाठी कोठेही डस्टबिन नाही. यासाठी पालिका व संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वाढत्या पर्यटकांच्या सोयीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.कास तलावाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाण्यात खोलवर सूर्यकिरणे पोहचत असल्याने पाण्याचा दर्जा सर्वोत्कृष्ट आहे. वाहने, कपडे धुवून पाणी प्रदुषित होवू नये यासाठी उपाययोजना करावी. तसेच वेळोवेळी कारवाई होणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षकाची देखील नेमणूक व्हावी.- माधव मोघे, स्वच्छताप्रेमी साताराकोणाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वत:पासून स्वच्छतेस सुरूवात करून पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे. कास म्हणजे निसर्गत: आपल्यासाठी जणू स्वर्गच आहे. परंतु या परिसरात फिरायला येणाऱ्यांकडून कोणताही कचरा होणार नाही यासाठी स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पावसाळ्यात कचरा पाण्यात मिसळू नये, यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.-कन्हैय्यालाल राजपुरोहित, स्वच्छताप्रेमी नागरिक, सातारा