शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
4
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
5
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
6
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
7
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
8
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
9
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
10
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
11
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
12
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
13
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
14
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
15
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
16
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
17
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
18
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
19
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याला पडलेले भगदाड तीन तासांत बंद, लोकसहभागातून उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:02 IST

अवकाळी पावसाने माण नदीला महापूर आला आणि कधीच न भरलेला बंधारा अवघ्या तासाभरातच भरला. शेतकरी आनंदले खरे; पण या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने या आनंदावर विरजन पडले. मात्र, यामुळे खचून न जाता नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होताच ग्रामस्थांनी लोकसहभागातून अवघ्या तीन तासांत बंधारा तुंबवला. त्यामुळे रिकामा झालेला बंधारा आता पाण्याने भरणार असल्याने गोंदवलेकरांचे चेहरे पुन्हा खुलले आहेत.

ठळक मुद्देबंधाऱ्याला पडलेले भगदाड तीन तासांत बंद, लोकसहभागातून उपक्रमबंधारा पाण्याने भरणार असल्याने गोंदवलेकरांचे चेहरे खुलले

दहिवडी : अवकाळी पावसाने माण नदीला महापूर आला आणि कधीच न भरलेला बंधारा अवघ्या तासाभरातच भरला. शेतकरी आनंदले खरे; पण या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने या आनंदावर विरजन पडले. मात्र, यामुळे खचून न जाता नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होताच ग्रामस्थांनी लोकसहभागातून अवघ्या तीन तासांत बंधारा तुंबवला. त्यामुळे रिकामा झालेला बंधारा आता पाण्याने भरणार असल्याने गोंदवलेकरांचे चेहरे पुन्हा खुलले आहेत.दुष्काळी माणला पाणी मिळावे म्हणून जिहे-कटापूर योजनेतून माण नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकीच गोंदवले बुद्रुक येथील इनाम शिवाराजवळ देखील एक बंधारा आहे. या बंधाऱ्याला पूर्वी लोखंडी फळ्या होत्या. त्याही वेळेत बसविल्या जाण्यात दिरंगाई होत होती.

तसेच फळ्या बसविल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाणी वाया जाई. त्यामुळे हा बंधारा पाणीसाठा होण्यासाठी फारसा उपयोगी पडत नव्हता. बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील काहीच हालचाल होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकसहभागातून डागडुजी केली.कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या लोखंडी फळ्यांच्या जागी काँक्रिटीकरण करून संपूर्ण बंधारा बंदिस्त करण्यात आला अन् बंधारा दुरुस्त झाला. पावसाने मात्र सलग तीन वर्षे ओढ दिल्याने दुरुस्त झालेला हा बंधारा रिकामाच राहिल्याने शेतकरी चिंतेत होते. यंदाच्या पावसाने मात्र बंधारा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून वाहिला.

भविष्यातील शेतीची चिंता आता मिटली असल्याने सर्वांनीच सुस्कारा सोडला खरा; पण नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे बंधाऱ्याच्या कडेची माती वाहून मोठे भगदाड पडले. परिणामी अवघ्या तीन ते चार दिवसांतच हा बंधारा पुन्हा रिकामा झाला. त्यामुळे शेतीला पाणी मिळविण्याचा चंग बांधलेले शेतकरी हवालदिल झाले; पण, जिद्द कायम होतीच.

क ाहीही करून बंधाऱ्यात पाणीसाठा करण्यासाठी पुन्हा सर्वजण एकवटले. नदीला पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बंधाऱ्याचे हे भगदाड बुजविण्यासाठी अडचण निर्माण झाल्याने हा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत होते. गेल्या चार दिवसांपूर्वी प्रवाह कमी होताच लाभक्षेत्रातील पंचवीस तीस शेतकऱ्यांनी पंचवीस हजारांहून अधिक रक्कम जमाझाली.नियोजनासाठी प्रयत्न गरजेचेमाण नदीला पाण्याची धार सुरू असल्याने आठवडाभरात या बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा राहू शकतो. त्यामुळे या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रातील पाण्यावाचून पडून असणाऱ्या सुमारे पन्नास एकर शेतजमिनी ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु भविष्यातील पाण्याच्या नियोजनासाठी या बंधाऱ्याला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 

इनाम शिवारातील शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी या एकमेव बंधाऱ्याचा उपयोग होतो. त्यामुळे आम्ही शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून तातडीने या बंधाऱ्यांची डागडुजी केली आहे.-बाळासाहेब पाटील,शेतकरी, गोंदवले बुद्रुक

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर