शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

साताऱ्यातील तरुणाईकडून अजिंक्‍यताऱ्याची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 13:15 IST

Swachh Bharat Abhiyan, Fort, Satara area सातारा म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! गडांवरचे हे अराजक दूर करण्याचा निश्‍चय साताऱ्यातील तरुणाईने केला आणि २९ ऑक्‍टोबर या एकाच दिवशी अजिंक्‍यतारा किल्ल्यावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.

ठळक मुद्देसाताऱ्यातील तरुणाईकडून अजिंक्‍यताऱ्याची स्वच्छताचार ते पाच तास साफसफाई

सातारा : सातारा म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! या वीरभूमीची शान असलेल्या जिल्ह्यात असंख्य किल्ले उभे राहिले. इतिहासातील अनेक गोष्टींची साक्ष असलेला हा ऐतिहासिक ठेवा जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. मात्र, आज या साऱ्या ठेव्याला घाण, कचऱ्याचा वेढा पडला आहे. गडांवरचे हे अराजक दूर करण्याचा निश्‍चय साताऱ्यातील तरुणाईने केला आणि २९ ऑक्‍टोबर या एकाच दिवशी अजिंक्‍यतारा किल्ल्यावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला.अनेक युवकांनी या कार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना किल्ल्यावरील भाग वाटून दिले. प्रत्येकाने वाटून दिलेल्या भागाची स्वच्छता केली. किल्ल्यावर चार ते पाच तास झालेल्या या साफसफाईत प्लास्टिकच्या पिशव्या, पाकिटे, बाटल्या गोळा करण्यात आल्या.

किल्ल्यावर दोन ते तीन पोती कचरा जमा करण्यात आला. हा कचरा गोळा करण्यात युवक पुढाकार घेत असताना तो करण्यातही गडावर जाणारे तरुणच आघाडीवर असल्याची खंत प्रिया तोरस्कर हिने व्यक्त केली. शिवप्रेमाने भारावलेल्या तरुणाईच्या या उपक्रमाचे साताऱ्यात सर्वत्र कौतुक होत आहे. या मोहिमेत प्रिया तोरस्कर, तेजस सुपेकर, अभिजीत सुर्वे, प्रणाली ढवळे यांनी सहभाग घेतला होता. 

टॅग्स :FortगडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSatara areaसातारा परिसर