शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

स्वच्छ ग्राम स्पर्धेत सातारा जिल्ह्यात चोरांबे प्रथम, सुपने द्वितीय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:17 IST

जिल्हास्तरावरील निकाल जाहीर : पालकमंत्र्यांच्या हस्ते गाैरव होणार

सातारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा २०२३-२४ वर्षाचा निकाल जाहीर झाला असून, जिल्हास्तरावर जावळी तालुक्यातील चोरांबे गावाने प्रथम क्रमांक पटकावलाय. तर कऱ्हाड तालुक्यातील सुपने द्वितीय आणि अंभेरी, ता. खटाव गावाने तृतीय क्रमांक मिळवला आहे. १ मे रोजी या गावांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गाैरविण्यात येणार आहे.गावांची संपूर्ण स्वच्छता त्याचबरोबर ग्रामीण जनतेत स्वच्छते विषयक वर्तणुकीत बदल घडवून आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्ह्यात राबवले जात आहे. या अभियानाअंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत यश मिळविणाऱ्या गावांचा गाैरव करण्यात येतो. स्पर्धेअंतर्गत सातारा जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये चोरांबे गावास ६ लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. सुपने ग्रामपंचायतीला ४ लाख आणि अंभेरी गावाला ३ लाखांचा पुरस्कार मिळाला आहे.स्वच्छ ग्राम स्पर्धेतील प्रथम तीन ग्रामपंचायती व विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना १ मे रोजी साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते गाैरविण्यात येणार आहे. पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांनी केले आहे.

विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना ५० हजार..या स्पर्धे अंतर्गत ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कारही देण्यात येतो. यामधील गावांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. कऱ्हाड तालुक्यातील हजारमाचीला घनकचरा, सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापनचा दिवंगत वसंतराव नाईक पुरस्कार मिळाला आहे, तर बेलोशी ता. जावळी गावाला पाणी गुणवत्ता आणि व्यवस्थापनचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार तर कोरेगाव तालुक्यातील गोगावलेवाडीला शाैचालय व्यवस्थापनचा दिवंगत आबासाहेब खेडकर पुरस्कार मिळाला आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातील स्वच्छतेत सातत्य राखल्यामुळे पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचे विशेष कौतुक आहे. जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतीने घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनकडे विशेष लक्ष द्यावे. तसेच १ मे पासून सुरु होणारे ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे अभियानही यशस्वी करावे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरgram panchayatग्राम पंचायत