शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दर नसल्याने मिरची तिखट, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट : खर्चही निघत नसल्याने चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:22 IST

खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरामध्ये मिरचीची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, सध्या मिरचीला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. त्यातच खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे.

ठळक मुद्देदर नसल्याने मिरची तिखट, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट खर्चही निघत नसल्याने चिंता

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसरामध्ये मिरचीची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र, सध्या मिरचीला चांगला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी पूर्णपणे अडचणीत आला आहे. त्यातच खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे.खटाव तालुक्यात अगोदरच पिण्यासाठी पाणी नाही. त्यातच शेतकरी ठिबकच्या माध्यमातून अशा प्रकारची पिके घेत असतात. अशा स्थितीत येथील शेतकऱ्यांनी मिरची घेतली आहे; पण या मिरचीला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत आहे.यामुळे मिरचीसाठी केलेला खर्चसुद्धा निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आलेले आहे. त्यातच मिरचीसारखी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी टँकरने पाणी आणले. परिणामी खर्चाचे प्रमाण वाढले आहे. त्यातच कमी दरामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे. दर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्चसुद्धा निघणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.बाजारपेठेत योग्य भाव मिळत नसल्यामुळे तोडणीचा खर्चसुद्धा परवडत नाही. आता कोणत्या पिकांकडे वळावे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस शेती अडचणीत येऊ लागल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.सिमला मिरचीची लागण करण्यासाठी साधरणत: एका एकरास दहा ते अकरा हजार रोपे लागतात. एका रोपाची किंमत दोन रुपये २० पैसे, मलचिंग पेपर, ठिबक सिंचन, लागवडीसाठी मजूर तसेच औषध फवारणी असा मिळून एकरी एक लाखापर्यंत खर्च येतो.

या पिकाला आजच्या बाजारात दहा रुपये दर मिळत आहे. आज एका मजुराला एका दिवसाला ३५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेती करण्याऐवजी कामाला जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.

मिरचीची लागण करण्यास खर्च जास्त आला आहे. त्यातच दराची घसरण झाल्यामुळे तोडणीचे सुद्धा पैसे निघत नाहीत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. अशा पिकांच्या संदर्भात शासनाने योग्य पावले उचलण्याची गरज आहे.- अरविंद शिंदे, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीSatara areaसातारा परिसर