शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

कोरड्या तलावासाठी पालिकेत बालकांची जलक्रीडा

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

शिवसेनेचे ‘अंघोळ घालो’ आंदोलन : पोहोण्याच्या तलावाची दुरुस्ती करून खुला करण्याची मागणी

सातारा : उन्हाळ्याची सुटी म्हटलं की पाण्यात मनसोक्त डुंबावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण आता नदी, विहिरी पूर्वीसारख्या खळाळत नाहीत. कमी पर्जन्यमानामुळं नदीपात्रात पाण्याचा ठिपूसही नजरेस पडत नाही. पिण्याच्या पाण्याची जिथं ओरड, तिथं पोहोण्यासाठी पाणी कुठून येणार? अशावेळी मुलांना पोहोण्याचा आनंद मिळविण्यासाठी हक्काचं एकमेव ठिकाण होतं ते नगरपालिकेचा पोहोण्याचा तलाव. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा तलाव नादुरुस्त असून बंद आहे. या तलावाची दुरुस्ती करून मुलांना पोहोण्यासाठी खुला करावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी नगरपालिकेच्या पायरीवर मुलांना अंघोळ घालून प्रशासनाचा निषेध नोंदविला.यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन देण्यात आले. उपतालुकाप्रमुख हरिदास मोरे, ज्ञानेश्वर नलवडे, आतिष ननावरे, विभागप्रमुख नंदू केसरकर, रोहिदास वाघ, उपशहरप्रमुख प्रवीण शहाणे, रमेश बोराटे, मंगेश जाधव, संतोष शेलार, बापू तोरस्कर, राजू शेडगे, सागर दयाळ, संतोष शेंडे, बापू नलावडे, दत्ता नलावडे, मनोज नलावडे, अजित नलावडे, बबन फाळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्याधिकाऱ्यांची पळापळशिवसेनेच्या वतीने पालिकेत ‘अंघोळ घालो आंदोलन’ सुरू असल्याची माहिती मिळताच मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आपल्या केबिनमध्ये बसून न राहता आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी किशोर पंडित यांनी बापट यांना निवेदनाची प्रत देऊन पोहोण्याचा तलाव दुरुस्त करून त्वरित खुला करावा, अशी मागणी केली. त्यानंतर बापट यांनी तो अधिकार मला नाही, असे सांगितले. यावर पंडित यांनी आक्रमक भूमिका घेत ही बाब तुमच्या अधिकारात येते. परंतु तुम्ही हात झटकत आहात, असा आरोप करत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. यावर बापट यांनी हा विषय सर्व नगरसेवकांनी सभेत उपस्थित केल्यास तसा प्रस्ताव पुढे पाठविता येईल, असे सांगितले. नगराध्यक्षांच्या गाडीलाही अंघोळ ‘अंघोळ घालो आंदोलन’ झाल्यानंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आंदोलक पालिकेबाहेर पडत असतानाच गेटसमोर लावलेल्या नगराध्यक्षांच्या गाडीलाही बादलीभर पाण्याने आंघोळ घालून घोषणाबाजी करण्यात आली.घरच्या बादलीत पालिकेचे पाणी!गेल्या चार दिवसांपासून या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची तयारी सुरू होती. या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांनी घरूनच बादल्या आणल्या होत्या. पालिका गेटवर असणाऱ्या नळाचे पाणी बादलीत भरून मुलांना अंघोळ घालण्यात आली.