शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

कोरड्या तलावासाठी पालिकेत बालकांची जलक्रीडा

By admin | Updated: March 31, 2015 00:20 IST

शिवसेनेचे ‘अंघोळ घालो’ आंदोलन : पोहोण्याच्या तलावाची दुरुस्ती करून खुला करण्याची मागणी

सातारा : उन्हाळ्याची सुटी म्हटलं की पाण्यात मनसोक्त डुंबावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण आता नदी, विहिरी पूर्वीसारख्या खळाळत नाहीत. कमी पर्जन्यमानामुळं नदीपात्रात पाण्याचा ठिपूसही नजरेस पडत नाही. पिण्याच्या पाण्याची जिथं ओरड, तिथं पोहोण्यासाठी पाणी कुठून येणार? अशावेळी मुलांना पोहोण्याचा आनंद मिळविण्यासाठी हक्काचं एकमेव ठिकाण होतं ते नगरपालिकेचा पोहोण्याचा तलाव. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा तलाव नादुरुस्त असून बंद आहे. या तलावाची दुरुस्ती करून मुलांना पोहोण्यासाठी खुला करावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी नगरपालिकेच्या पायरीवर मुलांना अंघोळ घालून प्रशासनाचा निषेध नोंदविला.यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट यांना निवेदन देण्यात आले. उपतालुकाप्रमुख हरिदास मोरे, ज्ञानेश्वर नलवडे, आतिष ननावरे, विभागप्रमुख नंदू केसरकर, रोहिदास वाघ, उपशहरप्रमुख प्रवीण शहाणे, रमेश बोराटे, मंगेश जाधव, संतोष शेलार, बापू तोरस्कर, राजू शेडगे, सागर दयाळ, संतोष शेंडे, बापू नलावडे, दत्ता नलावडे, मनोज नलावडे, अजित नलावडे, बबन फाळके आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुख्याधिकाऱ्यांची पळापळशिवसेनेच्या वतीने पालिकेत ‘अंघोळ घालो आंदोलन’ सुरू असल्याची माहिती मिळताच मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी आपल्या केबिनमध्ये बसून न राहता आंदोलनस्थळी धाव घेतली. यावेळी किशोर पंडित यांनी बापट यांना निवेदनाची प्रत देऊन पोहोण्याचा तलाव दुरुस्त करून त्वरित खुला करावा, अशी मागणी केली. त्यानंतर बापट यांनी तो अधिकार मला नाही, असे सांगितले. यावर पंडित यांनी आक्रमक भूमिका घेत ही बाब तुमच्या अधिकारात येते. परंतु तुम्ही हात झटकत आहात, असा आरोप करत यावर तोडगा काढण्याची मागणी केली. यावर बापट यांनी हा विषय सर्व नगरसेवकांनी सभेत उपस्थित केल्यास तसा प्रस्ताव पुढे पाठविता येईल, असे सांगितले. नगराध्यक्षांच्या गाडीलाही अंघोळ ‘अंघोळ घालो आंदोलन’ झाल्यानंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर आंदोलक पालिकेबाहेर पडत असतानाच गेटसमोर लावलेल्या नगराध्यक्षांच्या गाडीलाही बादलीभर पाण्याने आंघोळ घालून घोषणाबाजी करण्यात आली.घरच्या बादलीत पालिकेचे पाणी!गेल्या चार दिवसांपासून या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची तयारी सुरू होती. या आंदोलनासाठी कार्यकर्त्यांनी घरूनच बादल्या आणल्या होत्या. पालिका गेटवर असणाऱ्या नळाचे पाणी बादलीत भरून मुलांना अंघोळ घालण्यात आली.