शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मुलांना लागले शाळेचे वेध... पण लसीकरण ठरवणार पुढचे बेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:36 IST

सातारा : पूरग्रस्त परिस्थिती, त्यानंतर कोरोना आणि आता तिसरी लाट यामुळे मुलांच्या सलग तीन वर्षे शाळेत जाण्याला मोठा ब्रेक ...

सातारा : पूरग्रस्त परिस्थिती, त्यानंतर कोरोना आणि आता तिसरी लाट यामुळे मुलांच्या सलग तीन वर्षे शाळेत जाण्याला मोठा ब्रेक मिळाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. घरात बसून वैतागलेल्या मुलांना शाळेचे वेध लागले आहेत, पण लसीकरण झाल्याशिवाय पुढचे चित्रच अस्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर आणि सांगलीत २०१९ मध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीपासून मुलांच्या शाळेत जाण्यात खंड पडत गेला. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि पंधरा पंधरा दिवसांचे लॉकडाऊन पडू लागल्याने मुलांचे शाळेत जाणे बंद होत गेले. कोविडची ही लाट काही दिवसांत संपेल आणि आपण पुन्हा नव्याने शाळेत जाऊ असे बालविश्व रंगवून विद्यार्थी बसले होते.

चौकट :

ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणाची तयारी

कोरोना संसर्गाची दुसरी लाट प्रभावी दिसत आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे ऑनलाइन शिक्षणाची शाळांनी तयारी केली आहे. शिक्षकांनी अभ्यासक्रम कसा आणि किती वेळ शिकवायचा याचीची रंगीत तालीम केली आहे. कोरोनाचा संसर्ग ओसरला तर मागील वर्षात पाचवी ते बारावीसाठी केलेला ऑफलाइन शिक्षणाचा प्रयोग अवलंबिता येईल का, यावरही विचार सुरू आहे; पण या सर्व प्रयोगांचे भविष्य लसीकरणानंतर ठरणार आहे. मागील वर्षासारखे यंदा धोका पत्करण्याची पालकांची मानसिकता नाही.

शासन निर्णयानंतरच शाळांचा विचार

कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. ही लाट ओसरल्यानंतर शाळांबाबत शासन काय निर्णय घेईल, त्यावर पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे. १३ जूनपर्यंत शाळांना सुट्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होईल; पण शाळा केव्हा सुरू करणार हे कोरोना महामारीच्या त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असे मत शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक

कोरोना महामारीमुळे मागचे वर्ष ऑनलाइन शिक्षणात गेले. त्यामुळे विद्यार्थी शाळेप्रमाणे या शिक्षणात रमले नाहीत. मुलांना घरी जाऊन शिकविल्याने त्यांच्या अनेक शंकांचे निरसनही झाले. शैक्षणिक वर्ष संपून वरच्या वर्गात गेलेले विद्यार्थी अजूनही फोन करून ऑनलाइन क्लासचा अभ्यास पाठविणार का, असं विचारतात. त्यामुळे यावर्षी शाळा कधी सुरू होते याची आम्हाला उत्सुकता आहे.

- सतेशकुमार माळवे, दहीवडी

सलग वर्षभर घरात बसल्याने मुले कंटाळली आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग परिणामकारक नाही. आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत अभ्यास करण्याचा आनंद त्यांना घेताच येत नाही. लसीकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना शिकवणे सुरक्षित आहे का, याबाबतही विचार होणे आवश्यक आहे. अर्थात महामारीचा संसर्ग किती प्रमाणात घटतोय यावरच हे अवलंबून आहे.

- दीपश्री सुकाळे, पालक

आधी शाळेत जायचा खूप कंटाळा यायचा; पण आता शाळेत जावेसे वाटायला लागले. ऑनलाइन शाळेमुळे मित्र भेटत नाहीत. त्यामुळे कधी एकदा शाळेत जातोय असे झालेय. कोरोनामुळे रोज शाळेत जाणे शक्य नसेल तर एक-दोन तासांसाठी शाळेत बोलावून आम्हाला सगळ्यांना भेटू द्यावे असे वाटते.

- एक विद्यार्थी

यंदा पहिलीत प्रवेश घेणारे विद्यार्थी मागील वर्षात मोठा गट व अंगणवाडीतील शिक्षणाला मुकले आहेत. त्यामुळे पहिलीतील त्यांचा प्रवेश उत्सुकतेचा राहणार आहे. १३ जूनपर्यंत शाळांना सुटी आहे. नवीन शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार हे अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार हेही अनिश्चितच दिसत आहे.

कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग कितपत राहणार, दुसऱ्या लाटेत मुलांचा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुलांनाही लस देणार का, लस दिली तरीही शाळा सुरू करणार का, याबाबत उत्सुकता आहेच.