शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुलांना लागले शाळेचे वेध... पण लसीकरण ठरवणार पुढचे बेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:36 IST

सातारा : पूरग्रस्त परिस्थिती, त्यानंतर कोरोना आणि आता तिसरी लाट यामुळे मुलांच्या सलग तीन वर्षे शाळेत जाण्याला मोठा ब्रेक ...

सातारा : पूरग्रस्त परिस्थिती, त्यानंतर कोरोना आणि आता तिसरी लाट यामुळे मुलांच्या सलग तीन वर्षे शाळेत जाण्याला मोठा ब्रेक मिळाला. यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला आहे. घरात बसून वैतागलेल्या मुलांना शाळेचे वेध लागले आहेत, पण लसीकरण झाल्याशिवाय पुढचे चित्रच अस्पष्ट झाले आहे.

कोल्हापूर आणि सांगलीत २०१९ मध्ये उद्भवलेल्या पूरग्रस्त परिस्थितीपासून मुलांच्या शाळेत जाण्यात खंड पडत गेला. मार्च २०२० मध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि पंधरा पंधरा दिवसांचे लॉकडाऊन पडू लागल्याने मुलांचे शाळेत जाणे बंद होत गेले. कोविडची ही लाट काही दिवसांत संपेल आणि आपण पुन्हा नव्याने शाळेत जाऊ असे बालविश्व रंगवून विद्यार्थी बसले होते.

चौकट :

ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणाची तयारी

कोरोना संसर्गाची दुसरी लाट प्रभावी दिसत आहे. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील हे सांगता येत नाही. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षाप्रमाणे ऑनलाइन शिक्षणाची शाळांनी तयारी केली आहे. शिक्षकांनी अभ्यासक्रम कसा आणि किती वेळ शिकवायचा याचीची रंगीत तालीम केली आहे. कोरोनाचा संसर्ग ओसरला तर मागील वर्षात पाचवी ते बारावीसाठी केलेला ऑफलाइन शिक्षणाचा प्रयोग अवलंबिता येईल का, यावरही विचार सुरू आहे; पण या सर्व प्रयोगांचे भविष्य लसीकरणानंतर ठरणार आहे. मागील वर्षासारखे यंदा धोका पत्करण्याची पालकांची मानसिकता नाही.

शासन निर्णयानंतरच शाळांचा विचार

कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. ही लाट ओसरल्यानंतर शाळांबाबत शासन काय निर्णय घेईल, त्यावर पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे. १३ जूनपर्यंत शाळांना सुट्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू होईल; पण शाळा केव्हा सुरू करणार हे कोरोना महामारीच्या त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल, असे मत शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी व्यक्त केले.

विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक

कोरोना महामारीमुळे मागचे वर्ष ऑनलाइन शिक्षणात गेले. त्यामुळे विद्यार्थी शाळेप्रमाणे या शिक्षणात रमले नाहीत. मुलांना घरी जाऊन शिकविल्याने त्यांच्या अनेक शंकांचे निरसनही झाले. शैक्षणिक वर्ष संपून वरच्या वर्गात गेलेले विद्यार्थी अजूनही फोन करून ऑनलाइन क्लासचा अभ्यास पाठविणार का, असं विचारतात. त्यामुळे यावर्षी शाळा कधी सुरू होते याची आम्हाला उत्सुकता आहे.

- सतेशकुमार माळवे, दहीवडी

सलग वर्षभर घरात बसल्याने मुले कंटाळली आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग परिणामकारक नाही. आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत अभ्यास करण्याचा आनंद त्यांना घेताच येत नाही. लसीकरण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांना शिकवणे सुरक्षित आहे का, याबाबतही विचार होणे आवश्यक आहे. अर्थात महामारीचा संसर्ग किती प्रमाणात घटतोय यावरच हे अवलंबून आहे.

- दीपश्री सुकाळे, पालक

आधी शाळेत जायचा खूप कंटाळा यायचा; पण आता शाळेत जावेसे वाटायला लागले. ऑनलाइन शाळेमुळे मित्र भेटत नाहीत. त्यामुळे कधी एकदा शाळेत जातोय असे झालेय. कोरोनामुळे रोज शाळेत जाणे शक्य नसेल तर एक-दोन तासांसाठी शाळेत बोलावून आम्हाला सगळ्यांना भेटू द्यावे असे वाटते.

- एक विद्यार्थी

यंदा पहिलीत प्रवेश घेणारे विद्यार्थी मागील वर्षात मोठा गट व अंगणवाडीतील शिक्षणाला मुकले आहेत. त्यामुळे पहिलीतील त्यांचा प्रवेश उत्सुकतेचा राहणार आहे. १३ जूनपर्यंत शाळांना सुटी आहे. नवीन शैक्षणिक वर्ष केव्हा सुरू होणार हे अद्याप जाहीर झाले नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार हेही अनिश्चितच दिसत आहे.

कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण सुरू झाले आहे. लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग कितपत राहणार, दुसऱ्या लाटेत मुलांचा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुलांनाही लस देणार का, लस दिली तरीही शाळा सुरू करणार का, याबाबत उत्सुकता आहेच.