शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

मोबाईलमुळं हरवलं सुटीतलं बालपण, मुलं तासन्तास नेटवर : रानावनातील मजा ठरलीय दुरापास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:09 IST

सुटीची मज्जाच आजकाल मोबाईलच्या, आॅनलाईनच्या जमान्यात हरवून गेल्यानं मामाचा गावसुद्धा असून परका झालंय, मौज मस्ती, रानावनात फिरणं सर्वच दुरापास्त होऊन गेलंय, जणू बालपणच पुन्हा जीवन शोधण्याची व आठवण्याची फक्त एक आठवणच राहणार आहे, आजची पिढी मोबाईलच्या विश्वात एवढी व्यस्त झालीय की त्याची उन्हाळी सुटीतील आपलं बालपणसुद्धा विसरलंय.

ठळक मुद्देमोबाईलमुळं हरवलं सुटीतलं बालपण, मुलं तासन्तास नेटवर रानावनातील मजा ठरलीय दुरापास्त

दिलीप पाडळेपाचगणी : सुटीची मज्जाच आजकाल मोबाईलच्या, आॅनलाईनच्या जमान्यात हरवून गेल्यानं मामाचा गावसुद्धा असून परका झालंय, मौज मस्ती, रानावनात फिरणं सर्वच दुरापास्त होऊन गेलंय, जणू बालपणच पुन्हा जीवन शोधण्याची व आठवण्याची फक्त एक आठवणच राहणार आहे, आजची पिढी मोबाईलच्या विश्वात एवढी व्यस्त झालीय की त्याची उन्हाळी सुटीतील आपलं बालपणसुद्धा विसरलंय.उन्हाळी सुटी म्हटली की बालचमू हरकून जायचा, ती एक वेगळीच मज्जा होती. केव्हा एकदा परीक्षा होतीय आणि कधी एकदा धमाल करायला मिळतेय, असं वाटायचं. गावगावीच्या जत्रा करायच्या, आठ-दहा वर्षांपूर्वी तर लग्नाला जायचं ते वऱ्हाडी बनून बैलगाडीतून, भर दुपारी नदी विहिरीवर तासन्तास पोहण्याचा आनंद घ्यायचा. पाचगणी परिसरात तर डोंगरकपारीतून दिवसभर फिरायचं.

जांभूळ, आंबे, करवंद, टेमबुर्ण यासारखी फळ घरी न आणता रानातच शेतात खड्डा खणून मातीत पुरायची, त्यावर पुन्हा मातीचा ढिगारा लावून आडी करायची. रानातच फळ पिकवून खायची, रानावनात भटकंती करायची, झाडांवर कोठे मधाचा पोळ दिसतंय का पाहायचं, झाडांच्या सानिध्यातच सुरपाट्या खेळत बसायचं. मामाच्या गावाला पण जायचं, हेच बालपण मोबाईलच्या जमान्यात दिसेनासं झालंय.आताची लहान मुलांची बालपणांची गोडीच मोबाईलने हिरावून घेतलीय. मनसोक्त, मनमुराद, बालपणातील खोडकर धमाल, मस्ती मोबाईलच्या आॅनलाईन जमान्यानं दूर केली आहे. सदैव ही पिढी मोबाईलमध्ये हरवून गेल्याची पाहावयास मिळत आहे.खोड्या, दंगा मस्ती गेली कुठे?नेटन हरवलंय बालपण, देईल कोण शहाणपण, असं म्हणण्याची वेळ या पिढीवर येऊ शकते. आज शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही हीच परिस्थिती दिसत आहे.

उन्हाळी सुटीची मज्जा, बालपणीच्या खोडकर दंगा, मस्ती न घालविता बालपणच हरवून स्वत:ला मोबाईलच्या नेटमध्ये गुंतवून घेतेय आणि विसरून जातेय की पुन्हा पुन्हा नाही येत ही बालपणीचं जीवन, त्यात खूप रंग भरायचे असतात, तेच रंग उभ्या आयुष्यात आठवणींची शिदोरी म्हणून जपून ठेवायची असतात. तीच आठवण उद्या भावी आयुष्यात, अचानक उतारवयात नजरेसमोर एक यादगार आठवण देणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूरchildren's dayबालदिन