शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?
5
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
6
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
7
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
8
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
9
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
10
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
11
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
12
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
13
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
14
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
15
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
16
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
17
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
18
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
19
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
20
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर

मोबाईलमुळं हरवलं सुटीतलं बालपण, मुलं तासन्तास नेटवर : रानावनातील मजा ठरलीय दुरापास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:09 IST

सुटीची मज्जाच आजकाल मोबाईलच्या, आॅनलाईनच्या जमान्यात हरवून गेल्यानं मामाचा गावसुद्धा असून परका झालंय, मौज मस्ती, रानावनात फिरणं सर्वच दुरापास्त होऊन गेलंय, जणू बालपणच पुन्हा जीवन शोधण्याची व आठवण्याची फक्त एक आठवणच राहणार आहे, आजची पिढी मोबाईलच्या विश्वात एवढी व्यस्त झालीय की त्याची उन्हाळी सुटीतील आपलं बालपणसुद्धा विसरलंय.

ठळक मुद्देमोबाईलमुळं हरवलं सुटीतलं बालपण, मुलं तासन्तास नेटवर रानावनातील मजा ठरलीय दुरापास्त

दिलीप पाडळेपाचगणी : सुटीची मज्जाच आजकाल मोबाईलच्या, आॅनलाईनच्या जमान्यात हरवून गेल्यानं मामाचा गावसुद्धा असून परका झालंय, मौज मस्ती, रानावनात फिरणं सर्वच दुरापास्त होऊन गेलंय, जणू बालपणच पुन्हा जीवन शोधण्याची व आठवण्याची फक्त एक आठवणच राहणार आहे, आजची पिढी मोबाईलच्या विश्वात एवढी व्यस्त झालीय की त्याची उन्हाळी सुटीतील आपलं बालपणसुद्धा विसरलंय.उन्हाळी सुटी म्हटली की बालचमू हरकून जायचा, ती एक वेगळीच मज्जा होती. केव्हा एकदा परीक्षा होतीय आणि कधी एकदा धमाल करायला मिळतेय, असं वाटायचं. गावगावीच्या जत्रा करायच्या, आठ-दहा वर्षांपूर्वी तर लग्नाला जायचं ते वऱ्हाडी बनून बैलगाडीतून, भर दुपारी नदी विहिरीवर तासन्तास पोहण्याचा आनंद घ्यायचा. पाचगणी परिसरात तर डोंगरकपारीतून दिवसभर फिरायचं.

जांभूळ, आंबे, करवंद, टेमबुर्ण यासारखी फळ घरी न आणता रानातच शेतात खड्डा खणून मातीत पुरायची, त्यावर पुन्हा मातीचा ढिगारा लावून आडी करायची. रानातच फळ पिकवून खायची, रानावनात भटकंती करायची, झाडांवर कोठे मधाचा पोळ दिसतंय का पाहायचं, झाडांच्या सानिध्यातच सुरपाट्या खेळत बसायचं. मामाच्या गावाला पण जायचं, हेच बालपण मोबाईलच्या जमान्यात दिसेनासं झालंय.आताची लहान मुलांची बालपणांची गोडीच मोबाईलने हिरावून घेतलीय. मनसोक्त, मनमुराद, बालपणातील खोडकर धमाल, मस्ती मोबाईलच्या आॅनलाईन जमान्यानं दूर केली आहे. सदैव ही पिढी मोबाईलमध्ये हरवून गेल्याची पाहावयास मिळत आहे.खोड्या, दंगा मस्ती गेली कुठे?नेटन हरवलंय बालपण, देईल कोण शहाणपण, असं म्हणण्याची वेळ या पिढीवर येऊ शकते. आज शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही हीच परिस्थिती दिसत आहे.

उन्हाळी सुटीची मज्जा, बालपणीच्या खोडकर दंगा, मस्ती न घालविता बालपणच हरवून स्वत:ला मोबाईलच्या नेटमध्ये गुंतवून घेतेय आणि विसरून जातेय की पुन्हा पुन्हा नाही येत ही बालपणीचं जीवन, त्यात खूप रंग भरायचे असतात, तेच रंग उभ्या आयुष्यात आठवणींची शिदोरी म्हणून जपून ठेवायची असतात. तीच आठवण उद्या भावी आयुष्यात, अचानक उतारवयात नजरेसमोर एक यादगार आठवण देणार आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूरchildren's dayबालदिन