शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मुख्यमंत्र्यांचे आशांना ७ तर गटप्रवर्तकांना १० हजार मानधनवाढीबद्दल आश्वासन

By नितीन काळेल | Updated: November 6, 2023 19:12 IST

संघटनेबरोबर चर्चा : १७ ऑक्टोबरपासूनचा संप सुरूच

सातारा : आशा सेविका आणि गटप्रवर्तक विविध मागण्यांसाठी १८ दिवसांपासून संपावर असून रविवारी संघटनेच्या वतीने दरे येथील गावी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात आली. यावेळी आशांना ७ तर गटप्रवर्तकांना १० हजार मानधन वाढीसाह शासकीय सेवेत समायोजनची मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे. यामुळे याबाबत लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे.

याबाबत माहिती अशी की, दि. १८ आॅक्टोबरपासून आशा व गटप्रवर्तक फेडरेशन आणि कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप सुरू आहे. तर १ नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याबरोबरच झालेल्या चर्चेत आशा सेविकेला ७ हजार आणि गटप्रवर्तकांना ६ हजार २०० रुपयांची वाढ तसेच दिवाळीला दोन हजारांचा बोनसला मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे स्वागत फेडरेशनच्या अध्यक्षा काॅ. आनंदी अवघडे व कृती समितीने केले. पण, गटप्रवर्तक या आशांच्या वरिष्ठ असल्याने त्यांच्या अपुऱ्या मानधनवाढीवर संघटनेने आक्षेप घेऊन १० हजार रुपये मानधनवाढ होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्णय कृती समितीने घेतला. त्यातच मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे गावी आले होते. त्यावेळी काॅ. आनंदी अवघडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ त्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी आशांना ७ हजार आणि गटप्रवर्तकांना १० हजार रुपये मानधन वाढ आणि गटप्रवर्तकांना शासकीय सेवेत समायोजनसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे मान्य केले. तसेच बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय होईल, असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आशा सेविका आणि गटप्रवर्तकांच्या मानधनवाढीबद्दल आश्वासन दिले आहे. या निर्णयाचे स्वागत. पण, मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर होत नाहीतोपर्यंत संप सुरूच राहील असा निर्णय कृती समितीने घेतला आहे. तसेच संपूर्ण मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहणार आहे.

- काॅ. आनंदी अवघडे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदे