शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विटांनीच भरलं नदीचं पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 10:57 PM

विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलठण : वाढत्या शहरीकरणामुळे जुन्या इमारती, वाडे पाडून टोलेजंग टॉवर उभारले जात आहे. पाडलेल्या इमारतीतील दगडगोटे, विटा, माती बाणगंगा नदीत आणून टाकले जात आहे. यामुळे प्रदूषण होत असल्याने नदीची प्रकृती धोक्यात आली आहे. यामुळे निसर्गावर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला.सीतामाईच्या डोंगर कड्यावरून वाहन येणारी बाणगंगा ...

विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलठण : वाढत्या शहरीकरणामुळे जुन्या इमारती, वाडे पाडून टोलेजंग टॉवर उभारले जात आहे. पाडलेल्या इमारतीतील दगडगोटे, विटा, माती बाणगंगा नदीत आणून टाकले जात आहे. यामुळे प्रदूषण होत असल्याने नदीची प्रकृती धोक्यात आली आहे. यामुळे निसर्गावर विपरित परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला.सीतामाईच्या डोंगर कड्यावरून वाहन येणारी बाणगंगा नदी उपळवे, दालवडी, मांडवखडक, कुरवली, तावडीमार्गे फलटण शहराच्या माध्यमातून प्रवेश करत पुढे कांबळेश्वर, सोमंथळीजवळ नीरा नदीला मिळते. बाणगंगा कधीकाळी चार महिने वाहत होती. आपल्या परिसंस्थेवर ती अनेकांना जगवत होती. शेती, पशुपक्षी यांना वरदान ठरत होती. मोठा पाऊस झाल्यावर ती तिचं अस्तित्व सिद्ध करते.बाणगंगा नदीच्या दुर्लक्षामुळे तिची नैसर्गिक प्रकृती हरवत चालली आहे. पद्मावती मंदिर परिसरातून नदी फलटणकडे धाव घेते. येथूनच तिचा संघर्ष सुरू होतो. फलटण झपाट्याने वाढत आहे. उंच उंच इमारती उभ्या राहत आहेत. जुन्या इमारतींचा राडा रोडा दगड, वीट, माती टाकण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे बाणगंगेचं पात्र असा नागरिकांचा समज झाला आहे. यामुळे नदीचे पात्र अडवले जात आहे. पात्र अरुंद होत आहे. या घाणीमुळे पावसाळ्यात पाणी व्यवस्थित पूर्ण क्षमतेने वाहू शकत नाही. परिणामी दुसऱ्या बाजूने पात्र विस्तारताना दिसते. यामुळे नदीपात्राशेजारील घरांना धोका निर्माण करतो. शनी मंदिराजवळ असणारा परिसर धोक्यात आहे.प्रशासनाची डोळेझाकबाणगंगेचे पात्र पूर्वी बºयापैकी स्वच्छ होते; पण फलटणच्या वाढत्या विस्ताराने बाणगंगेच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उभे आहेत. फक्त राडा रोडाच नाही तर अनेक प्रकारची मानवी अतिक्रमने पाहायला मिळतात. प्रशासन डोळ्यावर हात ठेवून आहे. बाणगंगेच्या नैसर्गिक प्रकृतीशी कोणत्याही प्रकारे तडजोड होऊ नये व तिची जपणूक व्हावी म्हणून आणखी खूप प्रयत्न होणे आवश्यक आहेत.