शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वीस वर्षे साथ देणारी चकदेव पठाराची शिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 23:41 IST

सातारा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खोºयात सातारा व चिपळूणला जोडणारा सेतू म्हणून परिचित असलेल्या लोखंडी शिडीला सत्तावीस वर्षे झाली आहेत.

ठळक मुद्देलोखंडी ‘सेतू’ देतोय आठवणींना उजाळा : साहसवीरांसह पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थानिक भूमिपुत्र व कर्मचाºयांच्या मदतीने हे साहित्य डोंगरावरील चकदेव पठारापर्यंत आणण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोयना-कांदाटी खोºयात सातारा व चिपळूणला जोडणारा सेतू म्हणून परिचित असलेल्या लोखंडी शिडीला सत्तावीस वर्षे झाली आहेत. ट्रेकिंगच्या आवडीमुळे या शिडीचे साक्षीदार असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या ‘सेतू’ला भेट देऊन आठवणींना उजाळा दिला.

जावळी खोºयातील अतिदुर्गम व मागासलेल्या कोयना-कांदाटी खोºयात कोयना धरणाच्या निर्मितीमुळे शिवसागर जलाशय सर्वदूर विस्तारला आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात अनेक पिढ्या जगणारे येथील भूमिपुत्र विस्थापित झाले. त्यापैकी काहीजण कोकण, ठाणे, रायगड, सोलापूर व सातारा जिल्ह्यात जागा मिळेल त्याठिकाणी स्थायिक झाले. मात्र, आजही अनेकजण आपल्या मातृभूमीच्या ओढीने येथील कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात.

जावळी तालुक्यातील सातारा जिल्ह्याचे शेवटचे टोक म्हणून चकदेव पठाराकडे पाहिले जाते. देशातील सर्वात कमी मतदान केंद्र म्हणून चकदेव शिंदीची नोंद झाली होती. या पठारावरून पलीकडे चिपळूण तालुक्यात जाण्यासाठी पूर्वी वेलाच्या शिडीचा वापर केला जात होता. या व्यतिरिक्त कोणतेही दळणवळणाचे साधन या ठिकाणी नव्हते. या शिडीचा वापर करून येथील ग्रामस्थ चिपळूणला बाजारहाट करण्यासाठी जात होते. १९९० मध्ये तत्कालीन शाखा अभियंता डी. एच. पवार यांनी माजी आमदार दिवंगत जी. जी. कदम यांच्या प्रयत्नामुळे वेलाच्या शिडीऐवजी लोखंडी शिडी बसविण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे १९९० मध्ये चकदेव पठारावर जाऊन लोखंडी शिडीसाठी माप घेण्यात आले. त्यानुसार सातारा येथे शिडी बनविण्याचे काम सुरू झाले. शिडीचा सांगडा व वेल्डिंगसाठी आवश्यक लागणारी यंत्रणा बामणोलीपासून लाँचने आणण्यात आली. त्यानंतर स्थानिक भूमिपुत्र व कर्मचाºयांच्या मदतीने हे साहित्य डोंगरावरील चकदेव पठारापर्यंत आणण्यात आले. त्या ठिकाणी शिडी तयार करून उताराला ही शिडी जोडून घेण्यात आली. शिडी जोडल्यानंतर चिपळूणला जाणे सोयीस्कर झाले. शिडीला सत्तावीस वर्षे झाल्यानंतर बांधकाम विभागाचे डी. एच. पवार, विजय बोबडे, सुनील चतुर, शाम मोने, भरत साळुंखे, शाखा अभियंता घनशाम पवार, गणेश कर्वे, नीलेश आगवेकर आदींनी या ‘सेतू’ला भेट देऊन आठवणींना उजाळा दिला.स्थानिकांच्या मदतीनेच मार्गक्रमणही शिडी लोखंडी कड्यामध्ये अडकविण्यात आली आहे. संपूर्ण जंगल परिसर असल्यामुळे या ठिकाणी एकट्याने प्रवास करणे धोक्याचे आहे. पहाटे पाच वाजता साताºयातून निघाल्यानंतर चकदेवला जाण्यासाठी दुपार होते. चकदेव येथे जंगम वस्ती असून, पूर्वसूचना दिली तर भात व आमटी खाण्यासाठी मिळते. या ठिकाणी शाळा, आरोग्य सुविधा नसल्यामुळे स्थानिकांच्या मदतीनेच मार्गक्रमण करावे लागते. येथील शंकराच्या मंदिरात दर्शन घेतल्याने थकवा दूर होतो, अशी माहिती पर्यटकांनी दिली.पर्यटकांसाठी ठरतेय पर्वणीचकदेव पठाराला अनेक पर्यटक भेटी देतात. पावसामुळे येथील नैसर्गिक सौंदर्य खुलून गेले आहे. फुलांचा रंगोत्सव सुरू झाल्याने हे मनोहरी दृश्य पर्यटकांसह ट्रेकिंगसाठी येणाºया साहसी वीरांना भुरळ घालत आहे. पर्यटकांना चकदेव, शिंदी व वळवण म्हणजे मिनी काश्मीर असल्याचा भास होत आहे. पर्यटन विभागाने या परिसराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पर्यटनप्रेमी व ग्रामस्थांमधून होत आहे.भूमिपुत्रांचे असेही सहकार्य..चकदेव, शिंदी व वळवणला भेट देणाºया पर्यटकांना येथील स्थानिक ग्रामस्थांचे नेहमीच सहकार्य मिळते. परतीचा प्रवास करणाºया पर्यटकांना शिवसागर जलाशयातून लाँचने बामणोलीला यावे लागते.यावेळी अंधार असल्यामुळे माहितीगार पर्यटकांना बामणोलीला सुखरूप घेऊन जातात. स्थानिक भूमिपुत्रांचा माणुसकीचा हा ओलावा आजही याठिकाणी पाहावयास मिळतो.