शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

चाफळला सुवर्ण कलश सोहळा अखंडितपणे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:42 IST

चाफळ : मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक दिवंगत अरविंदशेठ मफतलाल यांनी चाफळला श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर चाफळचे सामाजिक कार्यकर्ते दिवंगत पुंडलिक ...

चाफळ : मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक दिवंगत अरविंदशेठ मफतलाल यांनी चाफळला श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर चाफळचे सामाजिक कार्यकर्ते दिवंगत पुंडलिक हरी पाटील यांनी चाफळ विभागातील जपधारकांच्यावतीने सुवर्ण श्रीफळ पूजन व त्या सुवर्ण श्रीफळाचा नारळी पौर्णिमेला समुद्रास अर्पण सोहळा सुरू केला होता. तो आजही अखंडितपणे सुरू आहे. यावर्षी त्यांचे नातू सागर शिरीष पाटील व अमोल दत्तात्रय पवार यांनी हा सोहळा जपधारकांच्यावतीने पार पाडला. यावेळी चाफळचे सरपंच आशिष पवार यांच्यासह रामनाम जपधारकांची उपस्थित होती.

तीर्थक्षेत्र पर्यटनस्थळाचा दर्जा लाभलेल्या चाफळच्या या श्रीराम मंदिराचा हा पुण्यसोहळा दरवर्षी साजरा केला जातो. १९७७ मध्ये चाफळसह परिसरात दुष्काळ पडला होता. या दरम्यान चाफळचे सामाजिक कार्यकर्ते दिवंगत पुंडलिक हरी पाटील यांनी उद्योजक दिवंगत अरविंदशेठ मफतलाल यांच्या सहकार्याने चाफळ विभागातील ग्रामस्थांना एकत्र केले. चाफळच्या श्रीराम मंदिरात ‘श्रीराम जय राम, जय जय राम’ नामाचा तीन हजार कोटी वेळा जप सुरू केला होता. तेव्हापासून ही जपाची परंपरा सुरू झाली व ती आजही अखंडितपणे सुरू आहे.

दिवंगत पुंडलिक पाटील यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र चाफळचे लोकनियुक्त सरपंच दिवंगत सूर्यकांत पाटील यांनी ही परंपरा जोपासली होती. नुकतेच त्यांचे निधन झाल्याने त्यांचे पुतणे सागर पाटील व सोसायटीचे सचिव अमोल पवार यांनी पुढाकार घेत ही परंपरा सुरू ठेवली आहे. येथील श्रीराम मंदिरात नुकतेच या सुवर्ण नारळाचे पूजन चाफळचे नूतन सरपंच आशिष पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सागर पाटील, अमोल पवार, काकासो कोळी यांच्यासह रामनाम जपधारक उपस्थित होते.

चौकट

सुवर्ण नारळ म्हणजे नक्की काय

चाफळ विभागातील जपधारकांच्यावतीने एक नारळ तयार केला जातो. त्या नारळास सोनेरी रंगाच्या कागदाने सजवले जाते. त्याला सुवर्णकलश म्हटले जाते. या कलशाचे सर्वप्रथम रामंदिरात पूजन केले जाते. त्यानंतर चाफळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ज्येष्ठ जपधारकांच्या हस्ते पूजन करत तो भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात येतो. नारळी पौर्णिमेदिवशी हा सुवर्ण कलश मुंबई दादर येथील शिवाजी पार्क येथे समुद्रात अर्पण केला जातो. उत्सवाचे यंदा ४४ वे वर्षे आहे.