शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा केंद्र सरकारचा घाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:42 IST

सातारा : केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणनेत ओबीसी समाजाची जनगणना होणार नसल्याने नुकतेच जाहीर केले आहे. ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा ...

सातारा : केंद्र सरकारने २०२१ च्या जनगणनेत ओबीसी समाजाची जनगणना होणार नसल्याने नुकतेच जाहीर केले आहे. ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा घाट केंद्र सरकारकडून सुरू आहे. त्यातच राज्यात भाजपवाले ओबीसी आरक्षणासाठी आंदोलने करून नौटंकी करत असल्याची खरमरीत टीका वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केली.

साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या संवाद मेळाव्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी हॉटेल लेक व्ह्यू येथे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी, महाराष्ट्र प्रदेश सदस्य महिला आघाडी अंजनाताई गायकवाड, जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत उपस्थित होते.

ठाकूर पुढे म्हणाल्या, सध्या सर्वत्र ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. ओबीसींचे आरक्षण संपण्याचा घाट केंद्र सरकार घालत आहे. त्यातच नुकतेच त्यांनी २०२१ च्या जनगणनेत ओबीसींची जनगणना होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहे. असे असताना महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते ओबीसी आरक्षणप्रश्नी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरत असून, ही त्यांची नौटंकी सुरू आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात ओबीसींची जनगणना करणार, असे जाहीर केले होते. त्यातून माघार घेतली असून, पळपुटे सरकार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच नियमांच्या अधीन राहून ओबीसी राजकीय आरक्षणाचा अध्यादेश काढू, असे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले आहे. हा अध्यादेश म्हणजे ओबीसी मते मिळवण्यासाठी चाललेले नाटक आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची वाट लावण्याचे राजकारण केंद्र सरकार खेळत आहे. या फसवणुकीच्या षङ्यंत्रापासून ओबीसींनी सावध राहावे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने ''इम्पिरिकल डेटा''ची अट घातली आहे. सरकारने डेटा नाही आणि डेटा देण्याचा त्यांचा विचारही नाही, असा डेटा ते उपलब्ध करून देतील, तो न्यायालयात टिकण्याची शक्यता नाही. या फसवणुकीपासून ओबीसींनी सावध राहणे गरजेचे आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न ही या दोन्ही सरकारमुळेच रेंगाळला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

एक प्रभाग एक सदस्य हा मंत्रिमंडळातील निर्णय संविधानाच्या कायद्याला धरून नाही. त्याला वंचित बहुजन आघाडीचा विरोध असून, लवकरच त्याला उत्तर दिले जाईल. आरोग्य विभागाच्या होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय योग्य नसून, त्यामुळे परीक्षार्थींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. त्या उमेदवारांवर एकप्रकारे अन्याय झाला आहे. त्यातच महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या असून, त्यात स्थानिक नेत्यांचा सहभाग असल्याच्या अनेक घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. त्याविरोधात लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.