शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

‘हर..हर.. महादेव’च्या गजरात रंगला ध्वज बांधण्याचा सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:29 IST

दहिवडी : शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ‘हर..हर महादेव’च्या जयघोषाने शिंगणापुरातील वातावरण भक्तिमय झाले होते.श्री शंभू-महादेवाच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी मानाचे पागोटे बांधण्याचा कार्यक्रम पार पडला. महादेवाचे मुख्य मंदिर ते अमृतेश्वर ...

ठळक मुद्देशिंगणापूर यात्रा : राज्यभरातील हजारो भाविकांची उपस्थिती

दहिवडी : शिखर शिंगणापूर येथील शिव-पार्वती विवाह सोहळ्यानिमित्त मुख्य मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कलशापर्यंत ध्वज बांधण्याचा कार्यक्रम रविवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. ‘हर..हर महादेव’च्या जयघोषाने शिंगणापुरातील वातावरण भक्तिमय झाले होते.श्री शंभू-महादेवाच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. रविवारी मानाचे पागोटे बांधण्याचा कार्यक्रम पार पडला. महादेवाचे मुख्य मंदिर ते अमृतेश्वर (बळी) मंदिराच्या कलाशापर्यंत ध्वज बांधण्यात आला. मराठवाड्यातील आपेगाव व औसगाव (ता. कळस, जि. उस्मानाबाद) येथील साळी व कोष्टी समाजाला यंदा ध्वज बांधण्याचा मान मिळाला.रविवारी दुपारी दोन वाजता ध्वजाचे आगमन झाले. यानंतर वाजत-गाजत ध्वज मंदिर परिसरात आणण्यात आला. दुपारी चार वाजता ध्वज बांधण्याचा कार्यक्रम सुरू झाला. ध्वजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली. हा साहसी सोहळा पाहण्यासाठी राज्यभरातील हजारो भाविकांनी शिंगणापुरात हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर रात्री बारा वाजता शिव-पार्वती विवाह सोहळा पार पडतो. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शिंगणापूर येथे कडेकोट पोलीस बंदोबस्त होता.अशी आहे प्रथाध्वज म्हणजे देवाचे मानाचे पागोटे. या पागोट्याला देवाचे वस्त्र म्हणूनही संबोधले जाते. सुमारे दीडशे मीटर लांबीचे हे वस्त्र विणण्याचे काम मानकरी वर्षभर करत असतात. या वस्त्राची गुढीपाडव्याला पूजा करून मानकरी हे वस्त्र शिखर शिंगणापूरला घेऊन येतात. यानंतर ध्वज बांधण्याचा कार्यक्रम पार पडतो.असा बांधलो जातो ध्वजप्रारंभी शिव मंदिराला ध्वजाचे एक टोक बांधले जाते. त्यानंतर हा ध्वज दोन्ही मंदिरांच्या मध्यावर आणला जातो. ध्वजाचे दुसरे टोक अमृतेश्वर मंदिराच्या कळसापर्यंत कासऱ्याने खेचले जाते. तीन-चार व्यक्ती हा ध्वज वर खेचून घेतात. ध्वज बांधण्याची कसरत दोन तास चालते. ध्वज सुटू नये, याशिवाय मंदिरावरून खाली येऊ नये, याची दक्षता घेतली जाते. हा ध्वज उतरला की यात्रेचा समारोप होतो.