शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे; ५ जुलैला होणारा ठाकरे बंधुंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

महावितरणच्या कारभाराचा उद्योजक करणार पंचनामा

By admin | Updated: January 13, 2015 00:07 IST

दरवाढीचा निषेध : उद्योजकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

कुपवाड : अकार्यक्षमता, गळती आणि भ्रष्टाचार लपवून ठेवून महावितरण देशातील सर्वाधिक महागडा वीज दर उद्योजकांवर लादत आहे. त्यांच्या चुकीचे खापर ग्राहकांवर फोडून हा वाढीव वीज दर महावितरण पुढे रेटत आहे. या वाढीव वीज दरवाढीचा जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांनी निषेध नोंदवून, माध्यमाद्वारे महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा पंचनामा करण्याचा निर्णय आज उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला. लवकरच यासंदर्भात आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांना भेटण्याचा निर्णयही औद्योगिक संघटनांनी यावेळी घेतला.महावितरणकडून वाढविण्यात आलेल्या वीज दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मिरजेतील सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव होगाडे होते. आमदार खाडे, असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके प्रमुख उपस्थित होते.यावेळी होगाडे म्हणाले की, देशात इतर राज्यांच्या तुलनेत दीडपट महाग वीज दर उद्योजकांवर लादला आहे. अकार्यक्षमता, गळती, भ्रष्टाचाराचा कळस महावितरणमध्ये झाला आहे. ही खोटी आकडेवारी टाळून महावितरणने उद्योग वाढण्यासाठी प्रयत्न करावेत.यावेळी कृष्णा व्हॅली चेंबरचे माजी उपाध्यक्ष सतीश मालू म्हणाले की, वस्त्रोद्योगाला ६५ टक्केच्या जवळपास वीज दरवाढ केली आहे. त्यामुळे वस्त्रोद्योग संपणार आहे. वसंतदादा सोसायटीचे अध्यक्ष सचिन पाटील म्हणाले की, नव्या वीज दरवाढीला स्थगिती द्यावी आणि जुन्या दरानेच वीज बिले भरून घ्यावीत. उद्योजक दीपक शिंदे, पलूसचे उमेश पाटील, कृष्णा व्हॅलीचे उपाध्यक्ष रमेश आरवाडे आदींची भाषणे झाली़ संजय अराणके यांनी स्वागत केले़ सतीश वाघ यांनी आभार मानले़ यावेळी दीपक मर्दा, अनंत चिमड, प्रकाश शहा, पांडुरंग रूपनर, हेमंत महाबळ, विनोद पाटील, हर्षल खरे, के. एस़ भंडारे, विजय भगत, अण्णासाहेब कोरे, एस़ जी़ तायशेट्टी, गणेश निकम, विजय भोसले, अजय खांबे, बी. एस. सूर्यवंशी आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)माजी ऊर्जा सचिवावर हल्लाबोल...खोट्या गळतीसह शेतकऱ्यांची बोगस आकडेवारी सादर करून गोलमाल करणारे माजी ऊर्जा सचिव अजय मेहता यांच्यावर आजच्या उद्योजकांच्या बैठकीत संघटनांकडून कडाडून टीका करण्यात आली. तसेच खाडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वीज दर वाढीवर तोडगा न निघाल्यास जिल्ह्यात उद्योग बंदसह मोर्चा आदी आंदोलने करण्याचा निर्णयही यावेळी औद्योगिक संघटनांच्यावतीने सर्वानुमते घेण्यात आला.